शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

मोहोळात दगड?

By admin | Updated: February 29, 2016 02:48 IST

मुळातच आज देशात कुठे ना कुठे सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी आरक्षणाची मागणी केली जात असताना व या मागणीला हिंसक वळणदेखील मिळत असताना

मुळातच आज देशात कुठे ना कुठे सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी आरक्षणाची मागणी केली जात असताना व या मागणीला हिंसक वळणदेखील मिळत असताना नेमक्या याच काळात अनुसूचित जाती-जमातींसाठी प्राप्त राजकीय आरक्षणाचा विषय विचारार्थ घेऊन सर्वोच्च न्यायालय मोहोळात तर दगड भिरकावत नाही ना अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे. संसदेत म्हणजे लोकसभेत आज अनुसूचित जातीसाठी ७९, तर अनुसूचित जमातींसाठी ४० जागा आरक्षित आहेत व हे आरक्षण २०२० पर्यंत म्हणजे लोकसभेच्या पुढील निवडणुकीपर्यंत अंमलात राहणार आहे. राज्यघटनेतील ३३४ वे कलम अशा आरक्षणाची तरतूद करते. प्रारंभी हे आरक्षण विवक्षित मुदतीसाठी म्हणजे पन्नास वर्षांसाठी मर्यादित होते. या मुदतीत संबंधित सरकारांनी दहा-दहा वर्षांची वाढ केली आणि ९५व्या घटना दुरुस्तीने ही मुदत थेट २०२० पर्यंत वाढविली. या घटना दुरुस्तीला एका जनहित याचिकेच्या माध्यमातून २००० सालीच सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. घटनेनेच १४व्या कलमाद्वारे बहाल केलेल्या समान संधीच्या तरतुदीला या घटना दुरुस्तीमुळे छेद जातो, असा याचिकाकर्त्यांचा दावा होता. स्वाभाविकच सदर याचिका घटनापीठाकडे सुपूर्द केली गेली. पण सुनावणी मात्र ठप्प पडून राहिली. देशाचे नूतन सरन्यायाधीश तीरथसिंह ठाकूर यांनी दर सोमवारी आणि शुक्रवारी घटनापीठाने प्रलंबित प्रकरणांची सुनावणी करावी असा नियम केल्याने हे जुने प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठासमोर आता आले आहे. त्यावर सरकारतर्फे संबंधित याचिका कालबाह्य झाली असल्याचा आणि म्हणून ती विचारात घेऊ नये असा युक्तिवाद केला गेला. पण घटनापीठाने तो अमान्य करून सरकारला येत्या १४ तारखेपर्यंत आपली भूमिका लेखी स्वरूपात सादर करण्याचा आदेश दिला आहे. पंचायत राज कायद्यातील सुधारणेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती-जमातींबरोबरच अन्य मागासवर्ग आणि महिला यांनादेखील जे आरक्षण प्राप्त झाले आहे ते राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभेतही लागू केले जावे अशी मागणी जोर धरीत असतानाच सर्वोच्च न्यायालयाची ही सुनावणी सुरू होत आहे.