शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
4
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
5
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
6
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
7
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
8
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
9
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
10
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
11
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
12
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
13
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
14
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
15
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
16
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
17
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
18
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
19
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
20
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका

मोहोळात दगड?

By admin | Updated: February 29, 2016 02:48 IST

मुळातच आज देशात कुठे ना कुठे सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी आरक्षणाची मागणी केली जात असताना व या मागणीला हिंसक वळणदेखील मिळत असताना

मुळातच आज देशात कुठे ना कुठे सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी आरक्षणाची मागणी केली जात असताना व या मागणीला हिंसक वळणदेखील मिळत असताना नेमक्या याच काळात अनुसूचित जाती-जमातींसाठी प्राप्त राजकीय आरक्षणाचा विषय विचारार्थ घेऊन सर्वोच्च न्यायालय मोहोळात तर दगड भिरकावत नाही ना अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे. संसदेत म्हणजे लोकसभेत आज अनुसूचित जातीसाठी ७९, तर अनुसूचित जमातींसाठी ४० जागा आरक्षित आहेत व हे आरक्षण २०२० पर्यंत म्हणजे लोकसभेच्या पुढील निवडणुकीपर्यंत अंमलात राहणार आहे. राज्यघटनेतील ३३४ वे कलम अशा आरक्षणाची तरतूद करते. प्रारंभी हे आरक्षण विवक्षित मुदतीसाठी म्हणजे पन्नास वर्षांसाठी मर्यादित होते. या मुदतीत संबंधित सरकारांनी दहा-दहा वर्षांची वाढ केली आणि ९५व्या घटना दुरुस्तीने ही मुदत थेट २०२० पर्यंत वाढविली. या घटना दुरुस्तीला एका जनहित याचिकेच्या माध्यमातून २००० सालीच सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. घटनेनेच १४व्या कलमाद्वारे बहाल केलेल्या समान संधीच्या तरतुदीला या घटना दुरुस्तीमुळे छेद जातो, असा याचिकाकर्त्यांचा दावा होता. स्वाभाविकच सदर याचिका घटनापीठाकडे सुपूर्द केली गेली. पण सुनावणी मात्र ठप्प पडून राहिली. देशाचे नूतन सरन्यायाधीश तीरथसिंह ठाकूर यांनी दर सोमवारी आणि शुक्रवारी घटनापीठाने प्रलंबित प्रकरणांची सुनावणी करावी असा नियम केल्याने हे जुने प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठासमोर आता आले आहे. त्यावर सरकारतर्फे संबंधित याचिका कालबाह्य झाली असल्याचा आणि म्हणून ती विचारात घेऊ नये असा युक्तिवाद केला गेला. पण घटनापीठाने तो अमान्य करून सरकारला येत्या १४ तारखेपर्यंत आपली भूमिका लेखी स्वरूपात सादर करण्याचा आदेश दिला आहे. पंचायत राज कायद्यातील सुधारणेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती-जमातींबरोबरच अन्य मागासवर्ग आणि महिला यांनादेखील जे आरक्षण प्राप्त झाले आहे ते राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभेतही लागू केले जावे अशी मागणी जोर धरीत असतानाच सर्वोच्च न्यायालयाची ही सुनावणी सुरू होत आहे.