शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

...तरीही लांच्छनास्पदच!

By admin | Updated: May 13, 2016 03:14 IST

दिल्लीकरांसाठी एक शुभवर्तमान आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)ने गुरुवारी जारी केलेल्या नागरी हवा गुणवत्ता अहवालानुसार, भारताची राजधानी आता जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर नाही.

दिल्लीकरांसाठी एक शुभवर्तमान आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)ने गुरुवारी जारी केलेल्या नागरी हवा गुणवत्ता अहवालानुसार, भारताची राजधानी आता जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर नाही. तो शिक्का आता इराणमधील झाबोल शहराच्या माथी लागला आहे. अर्थात दिल्लीकरांनी फार जास्त खूश होण्यासारखीही स्थिती नाही; कारण जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्ली अकराव्या क्रमांकावर विराजमान आहेच! भारतीयांसाठी आणखी चिंताजनक बाब म्हणजे, या यादीत निम्मी म्हणजे तब्बल दहा शहरे आपल्याच देशातील आहेत. एवढेच नव्हे तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक प्रदूषित शहरेही भारतातीलच आहे. या यादीतील एक वगळता इतर सर्वच शहरे आशिया खंडातील असून, भारताखालोखाल चार शहरे चीनमधील आहेत, तर सौदी अरेबियातील तीन शहरांचा यादीत समावेश आहे. इराण व पाकिस्तानमधील प्रत्येकी एका शहराचा यादीत समावेश आहे, तर आशियाबाहेरील केवळ बामेंडा या मध्य आफ्रिकेतील कॅमेरून देशातील शहराला यादीत स्थान मिळाले आहे. याचाच अर्थ औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक विकसित अशा अमेरिका व युरोप या दोन्ही खंडांमधील एकाही शहराचा सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत समावेश होऊ शकला नाही. आॅस्टे्रलिया खंड आणि आशियातील औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक विकसित अशा जपान व दक्षिण कोरियासारख्या देशांमधीलही एकही शहर या यादीत नाही. औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या राष्ट्रांच्या पासंगालाही न पुरू शकणाऱ्या भारतासाठी ही बाब फारच लांच्छनास्पद म्हणावी लागेल ! दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर न ठरल्यासाठी, आपण केलेल्या उपाययोजना कारणीभूत ठरल्या असण्याची सुतराम शक्यता नाही; कारण २०१४ मधील अभ्यासाच्या तुलनेत, डब्ल्यूएचओने २०१५ मध्ये १,४०० जास्त शहरांचा समावेश केला होता. बहुधा त्यामुळेच दिल्ली पहिल्या क्रमांकावरून अकराव्या क्रमांकावर घसरली असावी. औद्योगिक विकासाचा वेग कायम राखत असताना वायू प्रदूषण कमी करणे हे खूप खर्चिक काम असले तरी, नागरिकांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन प्रत्येक देशाने त्या दृष्टीने प्रयास करणे अत्यंत गरजेचे आहे; कारण प्रदूषण कमी करण्यावरील खर्च कमी ठेवत असताना, आरोग्यविषयक सुविधांवरील खर्च आपोआपच वाढत असतो. त्यामुळे एकंदर गोळाबेरीज लक्षात घेता, थोडे खर्चिक ठरले तरी, वायू प्रदूषण किमान पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकच देशाने करायला हवा. विशेषत: मनुष्यबळाच्या आधारे जागतिक महासत्ता म्हणून पुढे येण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतासाठी तर ते फारच आवश्यक आहे; कारण रोगट मनुष्यबळाच्या आधारे कोणताही देश महासत्ता होऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन, आगामी काळात सर्वच क्षेत्रात जुनाट तंत्रज्ञानास सोडचिठ्ठी देऊन, मोठ्या प्रमाणात पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे अत्यंत गरजेचे आहे.