शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

...तरीही लांच्छनास्पदच!

By admin | Updated: May 13, 2016 03:14 IST

दिल्लीकरांसाठी एक शुभवर्तमान आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)ने गुरुवारी जारी केलेल्या नागरी हवा गुणवत्ता अहवालानुसार, भारताची राजधानी आता जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर नाही.

दिल्लीकरांसाठी एक शुभवर्तमान आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)ने गुरुवारी जारी केलेल्या नागरी हवा गुणवत्ता अहवालानुसार, भारताची राजधानी आता जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर नाही. तो शिक्का आता इराणमधील झाबोल शहराच्या माथी लागला आहे. अर्थात दिल्लीकरांनी फार जास्त खूश होण्यासारखीही स्थिती नाही; कारण जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्ली अकराव्या क्रमांकावर विराजमान आहेच! भारतीयांसाठी आणखी चिंताजनक बाब म्हणजे, या यादीत निम्मी म्हणजे तब्बल दहा शहरे आपल्याच देशातील आहेत. एवढेच नव्हे तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक प्रदूषित शहरेही भारतातीलच आहे. या यादीतील एक वगळता इतर सर्वच शहरे आशिया खंडातील असून, भारताखालोखाल चार शहरे चीनमधील आहेत, तर सौदी अरेबियातील तीन शहरांचा यादीत समावेश आहे. इराण व पाकिस्तानमधील प्रत्येकी एका शहराचा यादीत समावेश आहे, तर आशियाबाहेरील केवळ बामेंडा या मध्य आफ्रिकेतील कॅमेरून देशातील शहराला यादीत स्थान मिळाले आहे. याचाच अर्थ औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक विकसित अशा अमेरिका व युरोप या दोन्ही खंडांमधील एकाही शहराचा सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत समावेश होऊ शकला नाही. आॅस्टे्रलिया खंड आणि आशियातील औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक विकसित अशा जपान व दक्षिण कोरियासारख्या देशांमधीलही एकही शहर या यादीत नाही. औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या राष्ट्रांच्या पासंगालाही न पुरू शकणाऱ्या भारतासाठी ही बाब फारच लांच्छनास्पद म्हणावी लागेल ! दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर न ठरल्यासाठी, आपण केलेल्या उपाययोजना कारणीभूत ठरल्या असण्याची सुतराम शक्यता नाही; कारण २०१४ मधील अभ्यासाच्या तुलनेत, डब्ल्यूएचओने २०१५ मध्ये १,४०० जास्त शहरांचा समावेश केला होता. बहुधा त्यामुळेच दिल्ली पहिल्या क्रमांकावरून अकराव्या क्रमांकावर घसरली असावी. औद्योगिक विकासाचा वेग कायम राखत असताना वायू प्रदूषण कमी करणे हे खूप खर्चिक काम असले तरी, नागरिकांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन प्रत्येक देशाने त्या दृष्टीने प्रयास करणे अत्यंत गरजेचे आहे; कारण प्रदूषण कमी करण्यावरील खर्च कमी ठेवत असताना, आरोग्यविषयक सुविधांवरील खर्च आपोआपच वाढत असतो. त्यामुळे एकंदर गोळाबेरीज लक्षात घेता, थोडे खर्चिक ठरले तरी, वायू प्रदूषण किमान पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकच देशाने करायला हवा. विशेषत: मनुष्यबळाच्या आधारे जागतिक महासत्ता म्हणून पुढे येण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतासाठी तर ते फारच आवश्यक आहे; कारण रोगट मनुष्यबळाच्या आधारे कोणताही देश महासत्ता होऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन, आगामी काळात सर्वच क्षेत्रात जुनाट तंत्रज्ञानास सोडचिठ्ठी देऊन, मोठ्या प्रमाणात पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे अत्यंत गरजेचे आहे.