शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

तरीही ‘ते’ कलम बदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 04:41 IST

विवाहित पुरुषाला ‘मैत्रीण’ असणे (आणि तिच्याशी त्याचे शारीरिक व अन्य संबंध असणे) अवैध नसले तरी विवाहित स्त्रीला मात्र ‘मित्र’ ठेवण्याची कायद्याची बंदी आहे.

विवाहित पुरुषाला ‘मैत्रीण’ असणे (आणि तिच्याशी त्याचे शारीरिक व अन्य संबंध असणे) अवैध नसले तरी विवाहित स्त्रीला मात्र ‘मित्र’ ठेवण्याची कायद्याची बंदी आहे. एका बहाद्दराने सरकारकडून माहितीच्या अधिकाराचा वापर करून प्राप्त केलेले हे ज्ञान देशातील सर्व गुलछब्बू पुरुषांना दिलासा देणारे आणि तशी प्रवृत्ती असणाऱ्या स्त्रियांना खट्टू करणारे आहे. कुटुंब संस्थेचा पाया मजबूत करून तिच्याशी जुळलेल्या नीतीच्या नियमांना बळकटी आणण्यासाठी केंद्र सरकारने व्यभिचारबंदीचा कायदा करायचे ठरवून तसे विधेयक चर्चेला घेतले आहे. त्यात ‘तसे स्वच्छंदपण’ करणा-या पुरुषांसोबत स्त्रियांनाही गुन्हेगार ठरविले जाणार आहे. हे विधेयक चर्चेला असताना आणि तशाच स्वरूपाचे खटले न्यायासनासमोर सुनावणीला आले असताना ही खळबळकारी व अनेकांना मनातून आनंदी करणारी माहिती पुढे आली आहे. विवाहित पुरुषाने विवाहाबाहेरचे संबंध राखायला या देशाच्या इतिहासाने व धर्मानेही कधीचीच परवानगी दिली आहे. अगदी १६ हजार १०८ बायका असणाºया पुरुषालाही एखादी राधा बाळगण्याची मुभा त्यात आहे. एकाहून अधिक लग्न करणे याला तर सर्वधर्मीय मान्यताच आहे. यातली अडचण स्त्रियांची आहे. त्यांना ही मुभा नाही. ज्या जमातीत बहुपतीत्वाच्या प्रथा आहेत त्यातही विवाहाबाहेरचे संबंध गैर व गुन्हा ठरणारे आहे. अगदी पाच पतींची अधिकृत पत्नी असलेल्या स्त्रीच्या मनात एखादा जास्तीच्या पुरुषाचा विचार येत असेल तर तेथे ‘जांभूळ आख्यान’ घडते, ही स्थिती आहे. जे लक्षात येत नाही आणि नजरेआड घडते ते सारेच चालत असते व चालूही असते. तसे चालणे हा अपराध नाही. मात्र ते उघड होणे हा अपराध आहे. आधुनिकतेची वाट, स्वातंत्र्याचा वापर, स्त्री-पुरुषांच्या समान अधिकारांची जाणीव आणि संधीची जास्तीची उपलब्धता यामुळे विवाहित स्त्रियांनाही विवाहित पुरुषांएवढीच अशी ‘मोकळीक’ घेता येण्याची शक्यता वाढली आहे. काहींच्या मते, अगदी कापालिक पंथाच्या मतेही असे होणे हे चांगले व आनंददायी आहे़ पण धर्माचे कर्मठपण, सरकारचा कायदेशीर खाक्या व कर्मठ माणसाच्या मतांची मागणी यामुळे ही ‘मोकळीक’ आता कायदेशीर होण्याची शक्यता संपली आहे. व्यभिचार हा गुन्हा असणे व त्याची शिक्षा स्त्री व पुरुष या दोघांनाही दिली जाणे हे सरकारच्या सध्याच्या विधेयकाचे सूत्र आहे. ते अनेक स्वतंत्रवृत्तीच्या स्त्री-ंपुरुषांना जाचक ठरणारे असले तरी इतिहास, संस्कृती व धर्म यांना ते ‘दृष्टीसमोर’ अमान्य आहे. कायदाही डोळ्यासमोर येणारे अपराधच पाहणार असल्याने आणि डोळ्याआड घडणारे अनेक अपराध त्याला कधीच दिसत नसल्याने यापुढे या स्वतंत्रवृत्तीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल एवढेच. सध्याही देशाच्या अनेक भागात मद्यपानाला कायद्याने बंदी आहे. मात्र तेथे यथेच्छ मद्यपान चालते. ते कायद्याला ठाऊकही असते. तसाच काहीसा प्रकार या व्यभिचार बंदीबाबत यापुढे आपल्या अनुभवाला येणार आहे. सगळीच माणसे वाईट व ‘तसली’ नसतात. त्यातून तशा स्त्रियांची संख्या तर फारच थोडी असते, पण थोडी असली तरी ती असते, हे मात्र खरे. आता अशा मोठ्या स्त्रियांना आणि ‘तसल्या’ पुरुषांना जास्तीची काळजी घ्यावी लागेल एवढेच़ तरीही त्यातली अन्यायकारक विषमता जी माहितीच्या अधिकाराने पुढे आणली आहे ती मात्र चिंत्य आहे. पुरुषांना व स्त्रियांना याही संदर्भात दोन वेगळे निकष व दोन वेगळे कायदे असणे हे घटनेला व समतेच्या अधिकाराला धरून नाही. त्यामुळे व्यभिचारबंदीचा कायदा होईल तेव्हा होवो, मात्र तो होण्याआधी सरकारने भादंसंचे ते अन्यायकारक कलम (४९८) तात्काळ दुरुस्त केले पाहिजे व जे स्वातंत्र्य पुरुषांना तेच स्त्रियांनाही देऊन स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित केली पाहिजे. जाता जाता सांगावीशी गोष्ट ही की, तुम्ही द्याल तरी आणि न द्याल तरी आपल्यातील हिकमती स्त्री-पुरुष त्यांना हवे ते स्वातंत्र्य घेणारच आहेत. त्यातून तुमच्या पोलिसांचे आणि कदाचित न्यायालयाचे काम वाढेल एवढेच. कायद्याने व्यवस्था बदलतात़ माणसांची मने बदलणे हे त्यांचे काम नव्हे, ती त्यांची क्षमताही नव्हे.

टॅग्स :relationshipरिलेशनशिप