शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

राज्य ‘ओलेच’ राहील

By admin | Updated: November 30, 2015 00:29 IST

केरळच्या पाठोपाठ बिहार राज्यदेखील संपूर्ण दारूमुक्त होणार असले तरी महाराष्ट्रात मात्र तसे काही होणार नाही, हे राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगून टाकले हे बरेच झाले.

केरळच्या पाठोपाठ बिहार राज्यदेखील संपूर्ण दारूमुक्त होणार असले तरी महाराष्ट्रात मात्र तसे काही होणार नाही, हे राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगून टाकले हे बरेच झाले. बिहारच्या मुख्यमंत्रिपदी तिसऱ्यांदा निवडून गेल्यानंतर नितीशकुमार यांनी येत्या आर्थिक वर्षापासून आपल्या राज्यात संपूर्ण दारूबंदी लागू केल्यानंतर साहजिकच खडसे यांच्याकडे तशी विचारणा केली गेली. दारूबंदीबाबत गुजरात आणि महाराष्ट्र तसे आघाडीवर होते. मोरारजी देसाई, बाळासाहेब भारदे आणि विठ्ठलराव पागे यांच्या आग्रहाखातर ही आघाडी होती. आज गुजरात अजूनही ‘कोरडे’ असले तरी महाराष्ट्राने आपल्या निर्मितीनंतर आठच वर्षांनी दारूबंदी शिथिल करण्यास प्रारंभ केला. कालांतराने संपूर्ण राज्य ओले झाले. नंतर आधी वर्धा आणि अलीकडेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पुन्हा दारूवर बंदी आली. ती कितपत यशस्वी ठरली आहे वा ठरते आहे, हा वेगळाच मुद्दा आहे. महसूलमंत्री या नात्याने खडसे यांच्या मते दारूपासून मिळणाऱ्या कोट्यवधींच्या उत्पन्नास मुकण्याइतके राज्य सरकार सधन आणि आर्थिकदृष्ट्या सुदृढ नाही. राज्याचे अर्थमंत्री असूनही सुधीर मुनगंटीवार हे मात्र चन्द्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीसाठी आग्रही होते, हे विशेष. पण यात एक वेगळाच विरोधाभासही आहे. दारू जितकी वाईट तितकेच डान्सबारदेखील वाईट असे अनेक समाजशास्त्रज्ञांचे मत आहे. यातील अर्धे मत स्वीकारून राज्य सरकार डान्सबारवरील बंदी मात्र उठवायला राजी नाही व त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यावर मात करण्याच्या मन:स्थितीत आहे. प्रश्न जर सरकारी तिजोरीत जमा होणाऱ्या उत्पन्नाचा असेल तर मग सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा स्वीकारायला काहीही हरकत नाही. पण तसे होताना दिसत नाही. याचे साधे कारण म्हणजे वैचारिक सुसंगततेचा अभाव. कोणतेही सरकार केवळ भावनांवर चालत नाही आणि चालविताही येत नाही म्हणून महसूलमंत्री दारूबंदीची शक्यता फेटाळून लावतात आणि त्याचवेळी मुख्यमंत्री मात्र डान्सबार पुन्हा सुरू करण्यास स्वच्छ नकार देतात. परिस्थितीच्या रेट्याच्या परिणामी अखेर व्यावहारिक निर्णय घेणेच सरकारला भाग पडत असते. कै. वसंतराव नाईक यांनी नेमके तेच केले होते आणि राज्यातील दारूला मुक्त केले होते.