शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राज्य ‘ओलेच’ राहील

By admin | Updated: November 30, 2015 00:29 IST

केरळच्या पाठोपाठ बिहार राज्यदेखील संपूर्ण दारूमुक्त होणार असले तरी महाराष्ट्रात मात्र तसे काही होणार नाही, हे राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगून टाकले हे बरेच झाले.

केरळच्या पाठोपाठ बिहार राज्यदेखील संपूर्ण दारूमुक्त होणार असले तरी महाराष्ट्रात मात्र तसे काही होणार नाही, हे राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगून टाकले हे बरेच झाले. बिहारच्या मुख्यमंत्रिपदी तिसऱ्यांदा निवडून गेल्यानंतर नितीशकुमार यांनी येत्या आर्थिक वर्षापासून आपल्या राज्यात संपूर्ण दारूबंदी लागू केल्यानंतर साहजिकच खडसे यांच्याकडे तशी विचारणा केली गेली. दारूबंदीबाबत गुजरात आणि महाराष्ट्र तसे आघाडीवर होते. मोरारजी देसाई, बाळासाहेब भारदे आणि विठ्ठलराव पागे यांच्या आग्रहाखातर ही आघाडी होती. आज गुजरात अजूनही ‘कोरडे’ असले तरी महाराष्ट्राने आपल्या निर्मितीनंतर आठच वर्षांनी दारूबंदी शिथिल करण्यास प्रारंभ केला. कालांतराने संपूर्ण राज्य ओले झाले. नंतर आधी वर्धा आणि अलीकडेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पुन्हा दारूवर बंदी आली. ती कितपत यशस्वी ठरली आहे वा ठरते आहे, हा वेगळाच मुद्दा आहे. महसूलमंत्री या नात्याने खडसे यांच्या मते दारूपासून मिळणाऱ्या कोट्यवधींच्या उत्पन्नास मुकण्याइतके राज्य सरकार सधन आणि आर्थिकदृष्ट्या सुदृढ नाही. राज्याचे अर्थमंत्री असूनही सुधीर मुनगंटीवार हे मात्र चन्द्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीसाठी आग्रही होते, हे विशेष. पण यात एक वेगळाच विरोधाभासही आहे. दारू जितकी वाईट तितकेच डान्सबारदेखील वाईट असे अनेक समाजशास्त्रज्ञांचे मत आहे. यातील अर्धे मत स्वीकारून राज्य सरकार डान्सबारवरील बंदी मात्र उठवायला राजी नाही व त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यावर मात करण्याच्या मन:स्थितीत आहे. प्रश्न जर सरकारी तिजोरीत जमा होणाऱ्या उत्पन्नाचा असेल तर मग सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा स्वीकारायला काहीही हरकत नाही. पण तसे होताना दिसत नाही. याचे साधे कारण म्हणजे वैचारिक सुसंगततेचा अभाव. कोणतेही सरकार केवळ भावनांवर चालत नाही आणि चालविताही येत नाही म्हणून महसूलमंत्री दारूबंदीची शक्यता फेटाळून लावतात आणि त्याचवेळी मुख्यमंत्री मात्र डान्सबार पुन्हा सुरू करण्यास स्वच्छ नकार देतात. परिस्थितीच्या रेट्याच्या परिणामी अखेर व्यावहारिक निर्णय घेणेच सरकारला भाग पडत असते. कै. वसंतराव नाईक यांनी नेमके तेच केले होते आणि राज्यातील दारूला मुक्त केले होते.