शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Earthquake : ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
2
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
3
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
4
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
5
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
6
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?
7
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
8
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
9
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
10
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
11
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
12
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
13
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
14
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
15
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
16
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
17
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
18
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
19
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
20
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी

कायद्याचे की वायद्याचे राज्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:30 IST

कायद्याचे राज्य काय असते, तर कायद्यासमोर सगळेच समान असतात. म्हणजे सर्वांना समान न्याय. कायद्याचे भय सगळ्यांनाच. ही मोजपट्टी असली तरी कायद्याची अंमलबजावणी तेवढी सक्षम असेल तरच कायद्याच्या राज्याची भाषा कळते.

- सुधीर महाजनकायद्याचे राज्य काय असते, तर कायद्यासमोर सगळेच समान असतात. म्हणजे सर्वांना समान न्याय. कायद्याचे भय सगळ्यांनाच. ही मोजपट्टी असली तरी कायद्याची अंमलबजावणी तेवढी सक्षम असेल तरच कायद्याच्या राज्याची भाषा कळते. नसता कायदा पुस्तकात आणि बाहेरची परिस्थिती ‘खुल्क खुदा का, मुल्क बादशहा का और अमल कंपनी सरकार का’ अशी स्थिती, मोगलाचे पतन झाल्यानंतर ही म्हण प्रचलित झाली होती. प्रदेश कुणाचा व कायदा कुणाचा, असा हा गोंधळ जो सध्या औरंगाबादेत दोन घटनांमध्ये पाहायला मिळाला. रस्ता रुंदीकरणासाठी महानगरपालिकेने ‘दमडी महल’ नावाची निजामकालीन इमारत पाडली, ती इतिहासप्रेमींचा विरोध असताना. पुढे याच रस्त्यावर एका इसमाचे अतिक्रमण होते; पण ते पाडणे आणि वाचवणे यातून राजकारणाचे रंग दिसले, त्यावरून दीड वर्षानंतर होणाºया सार्वत्रिक निवडणुकीची चाहूल लागली, कारण अतिक्रमित घर पाडण्याचा आग्रह एमआयएम करीत होते, तर ते घर पाडण्याला शिवसेनेतून विरोध होता. कारण घर पाडले गेले तर मराठा मतांवर परिणाम होऊ शकतो, म्हणून सेनेने घर वाचवण्याचा प्रयत्न केला. आश्चर्य म्हणजे ऐतिहासिक दमडी महल पाडताना कुणीही विरोध केला नव्हता. मतपेटीवर डोळा ठेवून शिवसेनेचा विरोध होता. खासदार चंद्रकांत खैरे यांनी हे घर वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. तिकडे एमआयएमने आक्रमक भूमिका घेतली, कारण येथेही मुस्लीम मतांचे राजकारण, पण विकासाचा मुद्दा पुढे केला. हे घर पाडण्याचा आग्रह म्हणजे खैरेंना विरोध हे त्यांचे समीकरण होते. शेवटी ते घर पाडण्यात आले.यानंतर दुसºया दिवशी नवीनच पदर उलगडला गेला. या कारवाईच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाने महापौरांच्या दालनात धरणे धरले. विशेष म्हणजे या संपूर्ण नाट्यात आजवर नसलेला हा मोर्चा अचानक कसा आला, हा प्रश्न सर्वांनाच पडला. घरमालकाला पर्यायी जागा द्यावी, अशी त्यांची मागणी होती आणि ती तेव्हा तरी महापौरांच्या उपस्थितीत आयुक्तांनी मंजूर केली. म्हणजे आता त्या घरमालकाला पर्यायी जागा द्यावी लागणार. या व्यक्तीने महसूल खात्याच्या जागेवर ३०-४० वर्षांपूर्वी अतिक्रमण केले होते, म्हणजे जागा महसूल खात्याची. महसूलने जागा द्यायची ठरविली, तर ती रेडी रेकनरनुसार द्यावी लागणार. म्हणजे मोफत नाही आणि दुसरा उद्भवलेला प्रश्न महसूलने जागा का द्यावी? आश्वासनानुसार महापालिकेने जागा द्यायची झाल्यास एकाला जागा देण्याची प्रथा रूढ झाली, तर शहराचा विकास आराखडा राबविताना किती लोकांना जागा देणार? म्हणजे शहराचा विकास आराखडा राबवताच येणार नाही. येथे हाच प्रश्न पुन्हा पडतो की, कायद्याचे राज्य आहे का? ही घटना नमुन्यादाखल, कारण ती ताजी म्हणून, पण पहिलीच नव्हे. कायदा गुंडाळणाºया अनेक घटना फाईलबंद आहेत. कायद्यापेक्षा वैयक्तिक हितसंबंध जेव्हा वरचढ ठरतात त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण होते. आता एकापाठोपाठ एक अशी निवडणुकांची साखळीच असल्याने मतपेढीवर नजर ठेवून तडजोडीच्या राजकारणाला उधाण येणार, हे वायद्याचे राज्यच म्हणायचे.

टॅग्स :newsबातम्या