शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

सुरुवात तर झाली

By admin | Updated: November 30, 2015 00:31 IST

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याच मते संवाद, वाद आणि विवाद हा लोकशाहीचा आत्मा असताना तब्बल अठरा महिने देशातील विद्यमान सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात वाद-संवाद नव्हे

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याच मते संवाद, वाद आणि विवाद हा लोकशाहीचा आत्मा असताना तब्बल अठरा महिने देशातील विद्यमान सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात वाद-संवाद नव्हे तर अक्षय वितंडवाद आणि आरोप-प्रत्यारोपच होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेने परस्पर संवादाला किमान सुरुवात तर झाली आणि तीदेखील चांगली झाली. भारतासारख्या देशात दीड वर्ष सरकार एका ध्रुवावर आणि विरोधक व विशेषत: प्रमुख विरोधी पक्ष असलेली काँग्रेस दुसऱ्या ध्रुवावर ही बाब निश्चितच अयोग्य आणि लोकशाहीला मारक ठरणारी होती. शुक्रवारच्या चर्चेचा देकार पंतप्रधानांनी दिला आणि सोनिया गांधींनी तो तत्काळ स्वीकारला हेदेखील एक सुदृढतेचेच लक्षण मानले पाहिजे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील भाजपा किंवा रालोआच्या अल्पमतामुळे मोदींच्या पुढे कोणताही पर्यायच शिल्लक राहिला नव्हता आणि म्हणून मोदींना माघार घेणे क्रमप्राप्तच होते, हे कितीही खरे असले तरी शेवटी ‘देर आये, दुरुस्त आये’ हेही तितकेच खरे. देशाच्या आर्थिक सुधारणा हा खरे तर काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या जिव्हाळ्याचा विषय. परंतु तसे असताना त्यातही रोध निर्माण होत होता. विशेषत: वस्तू आणि सेवा कराचे तसेच दिवाळखोरीसंबंधीचे अशा दोन्ही विधेयकांचा आर्थिक सुधारणा व परकीय गुंतवणूक यांच्याशी अत्यंत निकटचा संबंध असूनही संसदेचे कामकाजच चालत नव्हते आणि त्यापायी चर्चाच होत नव्हती. त्यामुळे त्यांच्या मंजुरीचा प्रश्नच निर्माण होत नव्हता. परवाच्या चर्चेनंतर आता काँग्रेस अध्यक्ष या विषयावर पक्षांतर्गत चर्चा करणार आहेत व त्यानंतर पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. दरम्यान व्यंकय्या नायडू स्वतंत्रपणे काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा सुरू ठेवणार आहेत. याचा अर्थ पुन्हा मोदींच्याच विधानाचा आधार घ्यायचा तर आशेचा किरण दिसू लागला आहे. वस्तू आणि सेवा करासंबंधी काँग्रेस पक्ष ज्या मुद्द्यांच्या बाबतीत आग्रही आहे (कर आकारणीचा दर, त्याची पूर्वनिश्चित कमाल पातळी आणि तक्रार निवारणासाठी त्रयस्थ संस्था आदि) त्या मुद्द्यांवर चर्चा होऊन मार्ग निघू शकतो. पण चर्चा होत नाही हेच दुखणे होते व आता ते तरी नक्कीच बरे झाले आहे.