शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

सुरुवात तर झाली

By admin | Updated: November 30, 2015 00:31 IST

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याच मते संवाद, वाद आणि विवाद हा लोकशाहीचा आत्मा असताना तब्बल अठरा महिने देशातील विद्यमान सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात वाद-संवाद नव्हे

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याच मते संवाद, वाद आणि विवाद हा लोकशाहीचा आत्मा असताना तब्बल अठरा महिने देशातील विद्यमान सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात वाद-संवाद नव्हे तर अक्षय वितंडवाद आणि आरोप-प्रत्यारोपच होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेने परस्पर संवादाला किमान सुरुवात तर झाली आणि तीदेखील चांगली झाली. भारतासारख्या देशात दीड वर्ष सरकार एका ध्रुवावर आणि विरोधक व विशेषत: प्रमुख विरोधी पक्ष असलेली काँग्रेस दुसऱ्या ध्रुवावर ही बाब निश्चितच अयोग्य आणि लोकशाहीला मारक ठरणारी होती. शुक्रवारच्या चर्चेचा देकार पंतप्रधानांनी दिला आणि सोनिया गांधींनी तो तत्काळ स्वीकारला हेदेखील एक सुदृढतेचेच लक्षण मानले पाहिजे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील भाजपा किंवा रालोआच्या अल्पमतामुळे मोदींच्या पुढे कोणताही पर्यायच शिल्लक राहिला नव्हता आणि म्हणून मोदींना माघार घेणे क्रमप्राप्तच होते, हे कितीही खरे असले तरी शेवटी ‘देर आये, दुरुस्त आये’ हेही तितकेच खरे. देशाच्या आर्थिक सुधारणा हा खरे तर काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या जिव्हाळ्याचा विषय. परंतु तसे असताना त्यातही रोध निर्माण होत होता. विशेषत: वस्तू आणि सेवा कराचे तसेच दिवाळखोरीसंबंधीचे अशा दोन्ही विधेयकांचा आर्थिक सुधारणा व परकीय गुंतवणूक यांच्याशी अत्यंत निकटचा संबंध असूनही संसदेचे कामकाजच चालत नव्हते आणि त्यापायी चर्चाच होत नव्हती. त्यामुळे त्यांच्या मंजुरीचा प्रश्नच निर्माण होत नव्हता. परवाच्या चर्चेनंतर आता काँग्रेस अध्यक्ष या विषयावर पक्षांतर्गत चर्चा करणार आहेत व त्यानंतर पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. दरम्यान व्यंकय्या नायडू स्वतंत्रपणे काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा सुरू ठेवणार आहेत. याचा अर्थ पुन्हा मोदींच्याच विधानाचा आधार घ्यायचा तर आशेचा किरण दिसू लागला आहे. वस्तू आणि सेवा करासंबंधी काँग्रेस पक्ष ज्या मुद्द्यांच्या बाबतीत आग्रही आहे (कर आकारणीचा दर, त्याची पूर्वनिश्चित कमाल पातळी आणि तक्रार निवारणासाठी त्रयस्थ संस्था आदि) त्या मुद्द्यांवर चर्चा होऊन मार्ग निघू शकतो. पण चर्चा होत नाही हेच दुखणे होते व आता ते तरी नक्कीच बरे झाले आहे.