शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सर्वमान्य तोडगाच आवश्यक

By admin | Updated: August 4, 2014 03:14 IST

अमृतसरचे सुवर्णमंदिर हे शिखांचे सर्वाधिक महत्त्वाचे व पवित्र धर्मस्थळ आहे

अमृतसरचे सुवर्णमंदिर हे शिखांचे सर्वाधिक महत्त्वाचे व पवित्र धर्मस्थळ आहे. त्याचे व्यवस्थापन ज्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीकडे आहे, ती भारतासह साऱ्या जगात असलेल्या शीख समाजाचे प्रतिनिधित्व करते, अशी श्रद्धा आहे. तिच्या अधिकार व व्यवस्थापन क्षेत्रात पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश ही राज्ये व चंदीगड यातील शिखांची धर्मस्थळे येतात. या समितीने केवळ धर्मकार्य करावे, हे अपेक्षित असले तरी ती राजकारणावरही आपले वर्चस्व गाजवीत असते. शीख समाज समृद्ध असल्यामुळे या धर्मस्थळांना मिळणाऱ्या देणग्या मोठ्या असतात. स्वाभाविकच या समितीचे आर्थिक बळही मोठे आहे. धर्मकारण, राजकारण व अर्थकारण अशा तिन्ही सामर्थ्यशाली बाबी नियंत्रणात असलेल्या या समितीचा शीख समाजावरील प्रभावही मोठा आहे. तिच्या निवडणुकांमध्ये अकाली दल, काँग्रेस, भाजपा व इतरही पक्ष आपापले झेंडे बाजूला ठेवून भाग घेतात. अकाली दल व काँग्रेस या पक्षांतील शीख पुढारी त्यात पुढे असतात. मात्र, १९२० साली झालेल्या स्थापनेपासून आतापर्यंत ही समिती बव्हंशी अकाली दलाला अनुकूल असलेल्यांच्या नियंत्रणातच अधिक राहिली. तो राजकीय पक्ष आहे आणि त्याचे भाजपाशी सख्य आहे. सध्या केंद्र, पंजाब व ही समिती या साऱ्यांत अकाली दलाचा दबदबा मोठा आहे. त्याचा धार्मिक व राजकीय असा दुहेरी लाभही त्याला मिळत आहे. त्याला आव्हान देऊ शकेल असा दुसरा पक्ष काँग्रेस हा आहे आणि अकाली दलाचे आव्हान मोडून काढायचे, तर त्या पक्षाला केवळ पंजाब, हरियाणा व हिमाचल प्रदेश यातील राजकारणातच बलशाली होणे पुरेसे नाही. गुरुद्वारा प्रबंधक समितीवरही त्याला आपले वर्चस्व निर्माण करणे गरजेचे आहे. ते होऊ शकत नसेल, तर त्या समितीचे अधिकार क्षेत्र कमी करणे त्याला आपल्या राजकारणासाठी आवश्यक वाटते. हरियाणातील काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा यांच्या पाठिंब्याच्या भरवशावर त्या राज्यातील कर्नाल व अन्य ठिकाणी असणाऱ्या गुरुद्वारांमधील काँग्रेसानुकूल शिखांनी एकत्र येऊन अमृतसरच्या प्रबंधक समितीचे नियंत्रण आमच्यावर नको, असा पवित्रा घेऊन हरियाणा गुरुद्वारा प्रबंधक समितीची स्थापना केली आहे व तशा आशयाचे विधेयक हरियाणा विधानसभेत मंजूरही केले आहे. मुळात गुरुद्वारा प्रबंधक समिती हीदेखील पंजाबच्या कायद्याने प्रस्थापित झाली आहे. हरियाणा हे वेगळे राज्य झाल्यामुळे आम्हालाही आमची वेगळी प्रबंधक समिती निर्माण करता येते, असा पवित्रा हे विधेयक आणणाऱ्यांनी घेतला आहे. यातून आपल्या अधिकाराला उभे होणारे आव्हान अकालींना कळणारे आहे. त्याचमुळे कर्नालच्या गुरुद्वारावर चाल करून जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी लागणारी पूर्वतयारीही केली. मात्र, या संघर्षातून त्या सीमावर्ती प्रदेशात हिंसाचार बळावेल आणि शेजारी देशाला त्याचा फायदा घेता येईल, हे लक्षात घेऊन मोदी सरकारने अकाली पुढाऱ्यांना दिल्लीत बोलावून घेऊन असा मोर्चा न नेण्याची गळ घातली व ती त्यांना मान्य करायला लावली. मोदी सरकारचे त्यासाठी अभिनंदन केले पाहिजे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव व त्या राज्याचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल त्याचसाठी मध्यंतरी दिल्लीला आले व मोदींकडून योग्य ती समज घेऊन परत गेले. मोर्चा त्यामुळे थांबला असला, तरी या घटनाक्रमाने पंजाब व हरियाणातील शीख समुदायांतील दुही मिटली मात्र नाही. हरियाणा विधानसभेने मंजूर केलेले या संबंधीचे विधेयक राज्यपालांसमोर मान्यतेसाठी थांबले आहे. त्यावर राज्यपालांनी सही केली, की त्याचा कायदा होईल. त्यामुळे राज्यपालांच्या संमतीआधीच तो राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठविण्याचा पवित्रा केंद्राने घेतला आहे. एवढ्या वादंगाच्या विषयावर तोडगा काढायचा आणि राजकीय विरोधाने पेटलेल्या एकाच धर्मसमुदायातील दोन वर्गांना तो मान्य करायला लावायचा, ही बाब अवघड व दिल्लीची परीक्षा पाहणारी आहे. म्हणूनच देशाची सुरक्षा व एकात्मता राखण्यासाठी त्यावर सर्वांना मान्य होईल, असा तोडगा निघणे आवश्यक आहे. तो अकाली दल व काँग्रेस यांना मान्य होणेही गरजेचे आहे. पंजाब आणि हरियाणातील शीख समुदायालाही तो आपला वाटावा, असाही तो असावा लागेल. या प्रयत्नात केंद्राला व त्यातील नव्या सरकारला यश मिळावे, असेच या घटकेला आपण म्हटले पाहिजे. धर्माचे राजकारण भाजपा, अकाली आणि शिवसेना याच पक्षांना करता येते, असे या घटनेकडे पाहता आपण समजण्याचे कारण नाही. तशा राजकारणात काँग्रेसही पुरेशी पारंगत आहे आणि त्या पक्षाने भाजपा व अकाली दलाच्या युतीचे आजवरचे धर्माचे राजकारण तिच्यावर उलटविले आहे. राजकारणाला राजकारणानेच तोंड दिले पाहिजे. त्यात धर्म आणला की न सुटणारे अवघड तिढे असे उभे होतात.