शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

अस्वच्छ मानसिकता

By admin | Updated: February 17, 2016 02:45 IST

मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानांतर्गत दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महानगरांची स्वच्छता निकषानुसार जी क्रमवारी जाहीर झाली आहे,

मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानांतर्गत दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महानगरांची स्वच्छता निकषानुसार जी क्रमवारी जाहीर झाली आहे, त्यात म्हैसूरने प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर झारखंडमधील धनबाद शहर सर्वात गलिच्छ शहर ठरले आहे. मोदींचा मतदारसंघ असलेले वाराणसी शहरही यादीत तळाशीच आहे. मात्र यादीत वरच्या क्रमांकावर असलेल्या शहरांमधील स्वच्छतेच्या दृश्य स्वरूपात, स्वच्छ भारत अभियानानंतर बदल झाला काय, असा प्रश्न तेथील नागरिकाना विचारल्यास, उत्तर हमखास नकारार्थीच येईल. त्यामागचे कारण मानसिकतेत दडले आहे. मुळात स्वच्छतेची आवड असावी लागते, जिचा भारतीयांमध्ये जात्याच अभाव आहे. स्वच्छतेचा प्रारंभ घरापासून होतो, असे नेहमी म्हटले जाते. मात्र भारतात स्वच्छतेचा अंत घरातच होतो. घर अगदी आरशासारखे लख्ख राखणाऱ्यांना घरातील केर रस्त्यावर फेकण्यात काही चुकीचे आहे, असे अजिबात वाटत नाही. पाळलेल्या श्वानांना साखळी बांधून फिरायला घेऊन गेल्यानंतर त्याने दुसऱ्याच्या घरासमोर घाण करणे, हा तर श्वानाचा जन्मसिद्ध हक्कच वाटतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शहर स्वच्छ राखण्यासाठी पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध असाव्या लागतात. दुर्दैवाने बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याचा गंधच नाही. एखाद्या सुजाण नागरिकाने एखादे ‘रॅपर’ टाकण्यासाठी कचराकुंडीचा शोध घेतल्यास, त्याला ते ‘रॅपर’ बराच वेळ हातात वागवावे लागेल आणि शेवटी नाइलाजास्तव रस्त्यावरच फेकावे लागेल, अशीच बव्हंंशी शहरांची अवस्था आहे. त्यामुळेच शहरांमध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. रस्त्याच्या कडेला आडोसा शोधून मूत्र विसर्जन करण्यात काही वावगे आहे, असे कोणालाच वाटत नाही; जिथे कचराकुंड्याच नाहीत, तिथे प्रसाधनगृहांची काय अपेक्षा करायची? तिसरी बाब म्हणजे स्वच्छ भारत अभियान यशस्वी होऊ शकते आणि हा देश स्वच्छ होऊ शकतो, याबाबत नोकरशाहीच आश्वस्त दिसत नाही. काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतांश अधिकारी अभियानाची खिल्लीच उडवताना आढळतात. त्यामुळे नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नोकरशाही या तिन्ही पातळ्यांवर, मानसिकतेत सकारात्मक बदल जोवर घडून येत नाही, तोवर स्वच्छ भारत अभियानाच्या यशाची फार अपेक्षा करता येणार नाहीच!