शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
3
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
4
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
5
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
6
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
7
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
8
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
9
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
10
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
11
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
12
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
13
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
14
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
15
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
16
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
17
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
18
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
19
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
20
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?

अस्वच्छ मानसिकता

By admin | Updated: February 17, 2016 02:45 IST

मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानांतर्गत दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महानगरांची स्वच्छता निकषानुसार जी क्रमवारी जाहीर झाली आहे,

मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानांतर्गत दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महानगरांची स्वच्छता निकषानुसार जी क्रमवारी जाहीर झाली आहे, त्यात म्हैसूरने प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर झारखंडमधील धनबाद शहर सर्वात गलिच्छ शहर ठरले आहे. मोदींचा मतदारसंघ असलेले वाराणसी शहरही यादीत तळाशीच आहे. मात्र यादीत वरच्या क्रमांकावर असलेल्या शहरांमधील स्वच्छतेच्या दृश्य स्वरूपात, स्वच्छ भारत अभियानानंतर बदल झाला काय, असा प्रश्न तेथील नागरिकाना विचारल्यास, उत्तर हमखास नकारार्थीच येईल. त्यामागचे कारण मानसिकतेत दडले आहे. मुळात स्वच्छतेची आवड असावी लागते, जिचा भारतीयांमध्ये जात्याच अभाव आहे. स्वच्छतेचा प्रारंभ घरापासून होतो, असे नेहमी म्हटले जाते. मात्र भारतात स्वच्छतेचा अंत घरातच होतो. घर अगदी आरशासारखे लख्ख राखणाऱ्यांना घरातील केर रस्त्यावर फेकण्यात काही चुकीचे आहे, असे अजिबात वाटत नाही. पाळलेल्या श्वानांना साखळी बांधून फिरायला घेऊन गेल्यानंतर त्याने दुसऱ्याच्या घरासमोर घाण करणे, हा तर श्वानाचा जन्मसिद्ध हक्कच वाटतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शहर स्वच्छ राखण्यासाठी पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध असाव्या लागतात. दुर्दैवाने बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याचा गंधच नाही. एखाद्या सुजाण नागरिकाने एखादे ‘रॅपर’ टाकण्यासाठी कचराकुंडीचा शोध घेतल्यास, त्याला ते ‘रॅपर’ बराच वेळ हातात वागवावे लागेल आणि शेवटी नाइलाजास्तव रस्त्यावरच फेकावे लागेल, अशीच बव्हंंशी शहरांची अवस्था आहे. त्यामुळेच शहरांमध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. रस्त्याच्या कडेला आडोसा शोधून मूत्र विसर्जन करण्यात काही वावगे आहे, असे कोणालाच वाटत नाही; जिथे कचराकुंड्याच नाहीत, तिथे प्रसाधनगृहांची काय अपेक्षा करायची? तिसरी बाब म्हणजे स्वच्छ भारत अभियान यशस्वी होऊ शकते आणि हा देश स्वच्छ होऊ शकतो, याबाबत नोकरशाहीच आश्वस्त दिसत नाही. काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतांश अधिकारी अभियानाची खिल्लीच उडवताना आढळतात. त्यामुळे नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नोकरशाही या तिन्ही पातळ्यांवर, मानसिकतेत सकारात्मक बदल जोवर घडून येत नाही, तोवर स्वच्छ भारत अभियानाच्या यशाची फार अपेक्षा करता येणार नाहीच!