शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाचत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

एस.टी. फायद्यात कधी अन् कशी येणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:58 IST

१८००० बस आणि दररोज ६० लाख प्रवाशांची वाहतूक करण्याची जबाबदारी एक लाख चार हजार कर्मचाऱ्यांवर आहे. एस.टी.कडून किती कर मिळतो याबरोबरच एक लाख चार हजार कर्मचाºयांचे कुटुंब कसे जगते याचाही विचार सरकारने केला पाहिजे.

- बाळासाहेब बोचरे‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेले राज्य परिवहन महामंडळ फायद्यात येईल आणि आपला पगार वाढेल ही आशा घेऊन बसलेल्या परिवहनच्या कर्मचाºयांच्या पदरी वर्षानुवर्षे निराशाच पडत आहे. कारण वर्षानुवर्षे महामंडळ तोट्यातच आहे. गेल्या पाच वर्षात २२१४ कोटींचा तोटा महामंडळाला झाला आहे. भविष्यात तोटा कमी होण्याची चिन्हे नाहीत. तोटा कमी करण्याची धोरणेही राबवली जात नाहीत. उलट तोटा वाढण्याच्या दृष्टीनेच पावले उचलली जात आहेत.राज्य शासनही कधीच एसटीकडे सहानुभूतीने पहात नाही. एस.टी.कडून किती कर राज्य शासनाच्या तिजोरीत जमा होतो याकडेच राज्य शासनाचे लक्ष आहे. बसमध्ये वायफाय हा चेष्टेचा विषय झाला आहे. गणवेशाचेही गौडबंगालच आहे. शिवशाही नावाची खासगी बस आमच्या मानगुटीवर बसते ही काय अशी भीती कर्मचाºयांना आहे. सरकारने कर कमी करण्याचा कधी विचार केला नाही किंवा एस.टी.ला डिझेलमध्ये सवलत दिली नाही. व्यावसायिक वाहनाप्रमाणे सगळे कर भरायचे आणि तोट्यात असली तरी सेवा द्यायची. रात्रंदिवस घराबाहेर असलेल्या चालक-वाहकांंना आपण काय वागणूक देतो. किती भत्ता देतो. त्यांचे निवारे कसे आहेत याचा कधी विचारच केलेला नाही. चालक-वाहकांना वाटेतला हॉटेलवाला गरमागरम जेवण देत होता. त्यातही एस.टी.ने मन घातले आणि हॉटेलवाल्याकडून प्रतिगाडी शुल्क वसूल करण्यास सुरुवात केल्याने त्या हॉटेलमध्ये आज चालक-वाहकांना कुणी पाणीही मोफत देत नाही.महामंडळाची बसस्थानके म्हणजे बाजार तळ करून ठेवली आहेत. त्यामधून मोठ्या प्रमाणात भाडे वसूल होते. बसस्थानकावरील जाहिराती, बसमधील जाहिराती हा उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. पार्सलचेही उत्पन्न चांगले आहे. तरीही एस. टी. तोट्यातच आहे. आता शिवशाहीमध्ये एस. टी.ने मोठी गुंतवणूक केली आहे. ५०० गाड्यांपैकी काही गाड्या या खासगी अन् भाडे तत्त्वावर घेतल्या आहेत. यामध्ये फायदा होतो की तोटा हे काळच ठरवेल. पण सध्याचा ५५० कोटींचा तोटा कमी करणे आणि पगारवाढ करणे याबाबत महामंडळ किंवा सरकारने कसलेच धोरण आखलेले नाही. भाडेवाढ हा केवळ एकच पर्याय महामंडळासमोर आहे. पण भाडेवाढ करून आपण खासगी वाहतुकीला मोठे करत आहोत हे महामंडळाच्या लक्षात आलेले नाही. प्रवासाचे अंतर, एस.टी.चे भाडे आणि एस.टी.ची उपलब्धता याचा विचार करता सर्वसामान्यालाही खासगी चारचाकी गाड्या परवडू लागल्या आहेत. त्यामुळे आज सर्वात अगोदर आपले कुटुंब वाचविण्याची वेळ महामंडळावर आली आहे. ज्या जिल्ह्यात एस.टी. तोट्यात आहे त्या जिल्ह्याच्या आरटीओंवर काही जबाबदारी टाकली तरी पुरेसे आहे. खासगीवर अंकुश आणि एस.टी.ने व्यवसायिक धोरण राबवले अन् सरकारने सहानुभूतीने पाहिले तरच एस.टी. वाचणार आहे आणि तरच कर्मचाºयांना भवितव्य आहे. १८००० बस आणि दररोज ६० लाख प्रवाशांची वाहतूक करण्याची जबाबदारी एक लाख चार हजार कर्मचाºयांवर आहे. एस.टी. कडून किती कर मिळतो याबरोबरच एक लाख चार हजार कर्मचाºयांचे कुटुंब कसे जगते याचाही विचार सरकारने केला पाहिजे.

टॅग्स :ST Strikeएसटी संप