शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

गुणांची ‘बरसात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 00:32 IST

दहावीचा निकाल लागलाय. गुणांची अक्षरश: बरसात झालीय. आता एक-दोन दिवसात ‘कट आॅफ’चा खेळ सुरू होईल. प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची जीवघेणी धडपड आणि मनाजोग्या कॉलेजात प्रवेश मिळाला नाही तर नैराश्य.

दहावीचा निकाल लागलाय. गुणांची अक्षरश: बरसात झालीय. आता एक-दोन दिवसात ‘कट आॅफ’चा खेळ सुरू होईल. प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची जीवघेणी धडपड आणि मनाजोग्या कॉलेजात प्रवेश मिळाला नाही तर नैराश्य. यंदा राज्यातील १२५ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेत. धक्कादायक म्हणजे चार हजारावर शाळांचा निकालही १०० टक्के लागलाय. निकालाच्या टक्केवारीत नागपूर विभागाने मात्र शेवटचा क्रमांक पटकाविला. अमरावती विभाग नागपूरच्या पुढे आहे. नागपूर विभागात जवळपास ८०,००० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत तर साडेतीन हजारावर मुलांना ९० टक्क्यांवर गुण मिळालेत. सर्व गुणवंतांचे मनापासून कौतुक. पण हे अभिनंदन करीत असताना मनात सहज विचार येतो; यापैकी नेमके किती विद्यार्थी बारावीत व त्यानंतरच्या स्पर्धा परीक्षांमध्ये एवढेच यश संपादित करतात. अलीकडच्या काही वर्षांपासून गुण फुगवट्याचा जो ‘ट्रेंड’ आलाय त्याने विद्यार्थी आणि विशेषत: पालकांना पार हुरळून टाकलेय. या गुणरंजनात ते एवढे गुरफटतात की बरेचदा मग गुणवत्तेचे भानच राहत नाही. आज शिक्षण ही एक बाजारपेठ झालीय. उत्तम शिक्षण म्हणजे भरपूर गुण हे एक समीकरण झाले असून, शिक्षणातून गुणवत्तेचा विकास करण्याचा हेतू पार मागे पडलेला दिसतोय. दुसरे महत्त्वाचे असे की, या ‘गुण’गानात जी मुले कमी गुण प्राप्त करतात अथवा अपयशी ठरतात त्यापैकी अनेक मुख्य प्रवाहातून बाहेर पडतात. नैराश्याच्या गर्तेत सापडतात. हा खेळ कुठेतरी थांबला पाहिजे. पुढील वर्षापासून गुणांची ही खैरात बंद करण्याचा विचार शिक्षण मंडळ करतेय, हे फार चांगले झाले. अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने निकाल प्रचंड वाढलाय. पण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा कस लागत नाही, ही बाब मंडळाच्या लक्षात आली यात आनंद मानायचा. त्यामुळे यापुढे गुणांवर नव्हे तर गुणवत्तेवर भर दिला जाईल, अशी अपेक्षा आहे. जगप्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट गुरू वॉरेन बफेट यांनी सांगितलंय, यशासाठी शाळेचे वर्ग करणे किंवा टॉपर असणेच आवश्यक नाही. खुद्द बफेट यांनासुद्धा हार्वर्डमध्ये प्रवेश मिळाला नव्हता, हे विशेष! बिल गेटस् आणि मार्क झुकेरबर्ग हे दोघेही पदवीधर नाहीत. हार्वर्डमधून अर्धवट शिक्षण सोडून बाहेर पडले. पण यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचले. याला काय म्हणायचे? गेटस् एकदा म्हणाले होते, मी कधीच टॉपर नव्हतो, पण आज सर्वश्रेष्ठ विद्यापीठातील ‘टॉपर्स’ माझे कर्मचारी आहेत. ही उदाहरणे यासाठी कारण शिक्षण ही एक नैसर्गिक कृती आहे, हे आम्ही समजून घेतले पाहिजे, तसेच आयुष्याची गणिते ही गुणांमुळे नव्हे तर गुणवत्तेतून सोडविली जाऊ शकतात, हे सुद्धा आम्हाला कळायला हवे.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८Education Sectorशिक्षण क्षेत्र