शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा कैवारी अन् शांतिदूत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 12:56 IST

जर शेतकरी सुखी नसतील तर समाजाची प्रगती होऊ शकत नाही. आपण शेतकरी आत्महत्या ताबडतोब थांबवायला हव्यात,” असे जागतिक मानवतावादी आणि आध्यात्मिक नेते, गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी अत्यंत चिंतेने सांगितले.

“जर शेतकरी सुखी नसतील तर समाजाची प्रगती होऊ शकत नाही. आपण शेतकरी आत्महत्या ताबडतोब थांबवायला हव्यात,” असे जागतिक मानवतावादी आणि आध्यात्मिक नेते, गुरुदेव श्री श्री रविशंकर अत्यंत चिंतेने सांगतात. गुरूदेव यांचे योगदान केवळ राज्याला जल-सकारात्मक आणि शेतीला फायदेशीर आणि सुरक्षित बनवण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्यापलीकडे मोफत सर्वांगीण शिक्षण, नदी स्रोतांचे पुनरुज्जीवन यासह पर्यावरण संवर्धन, वनीकरण, तुरुंग पुनर्वसन आणि ग्रामीण युवकांचे सक्षमीकरण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. 

‘माझ्या विहिरीत पाणी आहे!’ महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जालना जिल्ह्यातील वरुड गावातील शेतकरी, ४२ वर्षीय बाबा साहेब लोमटे आनंदाने सांगतात. लोमटे हे पाण्याअभावी वर्षातील सहा महिने शेती करायचे आणि उर्वरित वर्ष मुंबईत मजूर म्हणून काम करायचे. वर्षानुवर्षे, हवामानाचा अंदाज न आल्याने आणि पाण्याची तीव्र टंचाई यामुळे त्यांचे पीक उत्पादन हळूहळू कमी होत गेले. प्रदेशातील शेतकऱ्यांनी अनियमित पावसाळा आणि हवामानाच्या तीव्रतेशी संघर्ष केला होत. भूजल पातळी खालावल्याने त्यांच्या पीक उत्पादनावर थेट परिणाम झाला. “जर शेतकरी सुखी नसतील तर समाजाची प्रगती होऊ शकत नाही. आपण शेतकरी आत्महत्या ताबडतोब थांबवायला हव्यात,” असे जागतिक मानवतावादी आणि आध्यात्मिक नेते, गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी अत्यंत चिंतेने सांगितले. या भागातील लोमटेसारख्या हजारो शेतकऱ्यांसाठी परिस्थिती बदलत आहे, गुरुदेवांनी केलेल्या कार्यामुळे. गुरुदेवांनी जलतारा प्रकल्पाची, तसेच शेतकऱ्यांना हळूहळू रासायनिक शेतीपासून दूर जाण्याची प्रेरणा दिली आहे.

जलसमृद्ध बनवून शेतकरी विकासाचे उद्दिष्टभारताला जल-सकारात्मक बनवण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. भूजल वाढवण्यासाठी एक परिसंस्था निर्माण करून साधे रिचार्ज स्ट्रक्चर्स तयार करून पावसाचे पाणी साठवणे  आणि अधिक पाणी उपलब्ध करण्यासाठी पृथ्वीला स्पंजमध्ये बदलणे, हे काम त्यातून करण्यात येणार आहे.लोमटे यांनी त्यांच्या १६ एकर शेतीत पुनर्भरणाचे ४ खड्डे बांधले. पुरेशा पावसाने रिचार्ज खड्ड्यांमध्ये पाणी साचले, त्यांच्या बोअरवेलला संपूर्ण वर्ष पुरेल इतके पाणी आले. प्रकल्पाअंतर्गत, केवळ २ वर्षांत १४० गावांमध्ये ४६,००० जलतारा पुनर्भरण संरचना बांधण्यात आल्या आहेत, ज्याचा लाखो लोकांना फायदा झाला आहे.महाराष्ट्र सरकारसोबत नुकत्याच स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत, हजारो शेतकऱ्यांना आता महाराष्ट्रात १.३ दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या पर्यावरणीय प्रयत्नांमध्ये ७० नद्या आणि हजारो जलस्रोतांचे पुनरुज्जीवन समाविष्ट आहे. 

शांततेसाठी गुरुदेवांच्या भूमिकेचा सारांशगुरुदेवांनी १९८२ मध्ये त्यांच्याद्वारे शोधलेली  सुदर्शन क्रिया, ध्यान, समुपदेशन, व्यावहारिक शहाणपण आणि योग यांसारख्या विज्ञान-समर्थित श्वासोच्छ्वासाचे तंत्र ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये शिकवलेल्या सर्वसमावेशक कार्यक्रमात विणले आहे. कोलंबिया, मंगोलिया, पॅराग्वे आणि सूरीनाममधील सर्वोच्च नागरी सन्मानांसह त्यांच्या मानवतावादासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.महात्मा गांधी आणि डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांनी दिलेल्या अहिंसेच्या संदेशाचा प्रसार केल्याबद्दल त्यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये गांधी शांती तीर्थक्षेत्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इराकचे माजी पंतप्रधान, नूरी अल-मलिकी म्हणाले की, “जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यात गुरुदेवांच्या भूमिकेचा सारांश आहे.’’

मध्यस्थीचा विश्वासू आवाजगुरुदेव यांनी ईशान्येकडील सात राज्यांमधील ६७ प्रमुख बंडखोर गटांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणले. या गटांनी सलोखा आणि विकासाच्या नव्या अध्यायाची सुरुवात करण्यासाठी गुवाहाटी जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. त्यांनी एफ.ए.आर.सी. बंडखोरांना अहिंसेच्या पद्धतीबद्दल पटवून देऊन ५२ वर्षे जुने कोलंबियन गृहयुद्ध संपवले. ५०० वर्षे जुना अयोध्या वाद सौहार्द्रपूर्ण पद्धतीने सोडवण्यासाठी गुरुदेवांचा आवाज हा मध्यस्थीचा सर्वांत विश्वासू आवाज होता. 

कार्याला नाही मर्यादाजलतारा प्रकल्पाद्वारे मंगला पंडगे यांनी केवळ सात महिन्यांत शेवग्याचे ३.६ लाख रुपयांचे उत्पादन फक्त  ५,००० रुपये खर्चातून काढले. लातूरचे शेतकरी अमृत गम्पले यांनी केवळ ०.५ एकर जमिनीतून १ टन गव्हाचे उत्पादन घेतले. गुरुदेव यांचे योगदान केवळ राज्याला जल-सकारात्मक आणि शेतीला फायदेशीर आणि सुरक्षित बनवण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्यापलीकडे मोफत सर्वांगीण शिक्षण, नदी स्रोतांचे पुनरुज्जीवन, पर्यावरण संवर्धन, वनीकरण आदींपर्यंत विस्तारलेले आहे. 

उद्या, १९ ऑगस्ट रोजी जागतिक मानवतावादी दिन. त्यानिमित्त...महाराष्ट्रात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’... ७,२८,००० झाडे लावली गेली. ४६,००० रिचार्ज स्ट्रक्चर्स बांधली गेली. २,८९,९९० ग्रामीण युवकांना प्रशिक्षण. ११,२७९ कैद्यांना पुनर्वसनाचा लाभ. १० आर्ट ऑफ लिव्हिंग मोफत शाळा.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक