शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

उत्स्फूर्त लोकजागर

By admin | Updated: September 3, 2016 05:57 IST

शासनाने आरंभलेल्या अवयवदान महाभियानास राज्यभरात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता निकट भविष्यात अवयवदानाची एक मोठी लोकचळवळच राज्यात

शासनाने आरंभलेल्या अवयवदान महाभियानास राज्यभरात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता निकट भविष्यात अवयवदानाची एक मोठी लोकचळवळच राज्यात उभी राहील असा विश्वास बाळगायला हरकत नाही. विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्यांनी अवयवदानाचा अर्ज भरून एक आदर्श निर्माण केला. आरोग्य विभागाच्या पुढाकाराने हाती घेण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे निर्माण झालेले सकारात्मक वातावरण हजारो लोकांच्या मनात नवजीवनाची आशा पल्लवीत करेल, यात शंका नाही. दान ही संकल्पना परमार्थाचे परमोच्च साधन मानली जाते. त्यातही देहदान, नेत्रदान आणि अवयवदान म्हणजे महादानच. हे महादान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतरही जगण्याची अपूर्व संधी लाभत असते. परंतु या संदर्भातील जागरुकतेचा अभाव, अज्ञान आणि विविध गैरसमजांमुळे या महान कार्यात लोकांचा अपेक्षित सहभाग अद्यापही नाही. त्यामुळे अवयवदानाची वाढती गरज आणि दात्यांची तुटपुंजी संख्या यामधील वाढलेली प्रचंड तफावत ही देशापुढील फार मोठी समस्या झाली आहे. या संदर्भातील आकडेवारी विचारात घेता प्रत्यारोपणासाठी अवयव न मिळाल्याने दर वर्षी देशात चार लाख लोक मृत्युमुखी पडतात. कारण आजही आपल्या येथे अवयवदानाचे प्रमाण दहा लाख लोकांमागे केवळ ०.५ टक्के एवढेच आहे. दोन ते अडीच लाख किडनींची गरज असताना केवळ सात हजार लोकांचे प्रत्यारोपण होते. इतर अवयवांच्याबाबत तर परिस्थिती आणखी विदारक आहे. ५० हजार हृदयांची गरज असताना फक्त ५० हृदये मिळू शकतात. यकृताबाबत ५० हजारामागे एक हजार एवढी मोठी तफावत आहे. एकट्या महाराष्ट्रात सद्यस्थितीत १२ हजार रुग्ण अवयवदानाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे देशात दर वर्षी रस्ते अपघातात जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यु होतो. या सर्व लोकांनी अवयव दान केल्यास अवयवांची ही गरज पूर्ण होऊ शकते. पण जनजागृती आणि प्रत्यारोपणास आवश्यक तत्पर यंत्रणेच्या अभावामुळे ते शक्य होत नाही आणि मग काळा धंदा करणाऱ्यांचे चांगलेच फावते. मुंबईच्या एका रुग्णालयात अलीकडेच उघडकीस आलेले किडनी रॅकेट हा त्याचाच परिपाक होय. देशाच्या अनेक भागात हा गोरखधंदा सुरू आहे. आर्थिक विवंचनेपोटी अवयव विकायला काढणारे गरजू, अवयवासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्यास तयार रुग्ण आणि या दोघांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेणारे दलाल अन् डॉक्टर्स अशी अभद्र साखळीच मग निर्माण होते. या निराशाजनक परिस्थितीत बदल घडवून आणायचा असल्यास लोकांना अवयवदानाचे महत्त्व पटवून देणे अत्यावश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने राज्यात सुरू झालेला हा लोकजागर महत्त्वाचा असणार आहे.