शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

उत्स्फूर्त लोकजागर

By admin | Updated: September 3, 2016 05:57 IST

शासनाने आरंभलेल्या अवयवदान महाभियानास राज्यभरात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता निकट भविष्यात अवयवदानाची एक मोठी लोकचळवळच राज्यात

शासनाने आरंभलेल्या अवयवदान महाभियानास राज्यभरात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता निकट भविष्यात अवयवदानाची एक मोठी लोकचळवळच राज्यात उभी राहील असा विश्वास बाळगायला हरकत नाही. विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्यांनी अवयवदानाचा अर्ज भरून एक आदर्श निर्माण केला. आरोग्य विभागाच्या पुढाकाराने हाती घेण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे निर्माण झालेले सकारात्मक वातावरण हजारो लोकांच्या मनात नवजीवनाची आशा पल्लवीत करेल, यात शंका नाही. दान ही संकल्पना परमार्थाचे परमोच्च साधन मानली जाते. त्यातही देहदान, नेत्रदान आणि अवयवदान म्हणजे महादानच. हे महादान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतरही जगण्याची अपूर्व संधी लाभत असते. परंतु या संदर्भातील जागरुकतेचा अभाव, अज्ञान आणि विविध गैरसमजांमुळे या महान कार्यात लोकांचा अपेक्षित सहभाग अद्यापही नाही. त्यामुळे अवयवदानाची वाढती गरज आणि दात्यांची तुटपुंजी संख्या यामधील वाढलेली प्रचंड तफावत ही देशापुढील फार मोठी समस्या झाली आहे. या संदर्भातील आकडेवारी विचारात घेता प्रत्यारोपणासाठी अवयव न मिळाल्याने दर वर्षी देशात चार लाख लोक मृत्युमुखी पडतात. कारण आजही आपल्या येथे अवयवदानाचे प्रमाण दहा लाख लोकांमागे केवळ ०.५ टक्के एवढेच आहे. दोन ते अडीच लाख किडनींची गरज असताना केवळ सात हजार लोकांचे प्रत्यारोपण होते. इतर अवयवांच्याबाबत तर परिस्थिती आणखी विदारक आहे. ५० हजार हृदयांची गरज असताना फक्त ५० हृदये मिळू शकतात. यकृताबाबत ५० हजारामागे एक हजार एवढी मोठी तफावत आहे. एकट्या महाराष्ट्रात सद्यस्थितीत १२ हजार रुग्ण अवयवदानाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे देशात दर वर्षी रस्ते अपघातात जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यु होतो. या सर्व लोकांनी अवयव दान केल्यास अवयवांची ही गरज पूर्ण होऊ शकते. पण जनजागृती आणि प्रत्यारोपणास आवश्यक तत्पर यंत्रणेच्या अभावामुळे ते शक्य होत नाही आणि मग काळा धंदा करणाऱ्यांचे चांगलेच फावते. मुंबईच्या एका रुग्णालयात अलीकडेच उघडकीस आलेले किडनी रॅकेट हा त्याचाच परिपाक होय. देशाच्या अनेक भागात हा गोरखधंदा सुरू आहे. आर्थिक विवंचनेपोटी अवयव विकायला काढणारे गरजू, अवयवासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्यास तयार रुग्ण आणि या दोघांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेणारे दलाल अन् डॉक्टर्स अशी अभद्र साखळीच मग निर्माण होते. या निराशाजनक परिस्थितीत बदल घडवून आणायचा असल्यास लोकांना अवयवदानाचे महत्त्व पटवून देणे अत्यावश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने राज्यात सुरू झालेला हा लोकजागर महत्त्वाचा असणार आहे.