शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: व्यवस्थेच्या डोळ्यांत डोळे घालून प्रश्न विचारणारा महात्मा... महात्मा जोतिबा फुले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 11:53 IST

विद्येविना गेलेली मती जोतिबांनी पुन्हा मिळवून दिली, म्हणूनच आजचा बहुजन समाज ताठ कण्याने उभा आहे, हे ध्यानी ठेवले पाहिजे!

प्रा. ज्याेती वाघमारे, खासदार, राज्यसभा

भारतीय इतिहासाच्या क्षितिजावर जेव्हा अज्ञानाचा आणि विषमतेचा काळोख दाटलेला होता, तेव्हा त्या अंधाराला भेदून प्रकाशाची पहिली ठिणगी ज्या महापुरुषाने टाकली, ते महात्मा जोतिबा फुले. आज आपण त्यांची २००वी जयंती साजरी करीत आहोत. हे केवळ एका महापुरुषाच्या स्मरणाचे वर्ष नाही, तर त्यांनी मांडलेल्या समतेच्या, विज्ञानाच्या आणि माणुसकीच्या मांडणीचा पुनरारंभ करण्याचे वर्ष आहे.

क्रांतीचा सूर्य पुण्याच्या भिडेवाड्यात उगवला आणि त्याची धग आजही विषमतेच्या भिंती जाळत आहे. जोतिबा केवळ एक समाजसुधारक नव्हते, तर ते आधुनिक भारताचे पहिले ‘सकळ शास्त्रसंपन्न’ क्रांतिकारक होते. जोतिबांच्या कार्याचा पाया हा ‘शिक्षण’ होता; परंतु त्यांचे शिक्षण केवळ अक्षरांची ओळख करून देण्यापुरते नव्हते. त्यांच्या मते, शिक्षण हे शोषितांच्या हाती दिलेले अस्त्र होते. ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली...’ या ओळींमधून त्यांनी शिक्षणाचा समाजशास्त्रीय कार्यकारणभाव मांडला. हा विचार आजही जागतिक स्तरावर अमान्य करता येत नाही. ज्या समाजात ज्ञानावर एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असते, तिथे लोकशाही कधीच रुजू शकत नाही हे त्यांनी ओळखले हाेते. १ जानेवारी १८४८ रोजी भिडेवाड्यात सुरू झालेली मुलींची पहिली शाळा ही केवळ एक शैक्षणिक संस्था नव्हती, तर ती हजारो वर्षांच्या पितृसत्ताक आणि वर्णवर्चस्ववादी मानसिकतेला दिलेले खुले आव्हान होते.

२४ सप्टेंबर १८७३ रोजी जोतिबांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज ही शोषितांच्या आत्मभानाची मोठी चळवळ होती. जोतिबांनी ‘निर्मिक’ (The Creator) ही संकल्पना मांडली. त्यांनी सांगितले की, सर्व मानव एकाच निर्मात्याची लेकरे आहेत, त्यामुळे कोणालाही मध्यस्थ (पुरोहित) मानण्याची गरज नाही. ज्या काळात विचार करणे गुन्हा होता, त्या काळात जोतिबांनी व्यवस्थेच्या डोळ्यांत डोळे घालून प्रश्न विचारण्याचे धाडस दिले. 

जोतिबांचे साहित्य हा शोषितांच्या दुःखाचा आणि संघर्षाचा दस्तऐवज आहे.  त्यांनी ‘बळीराजा’ हा कष्टकऱ्यांचा सांस्कृतिक नायक म्हणून उभा केला. तत्कालीन संस्कृतप्रचुर भाषेला नाकारून बहुजनांच्या बोलीभाषेला साहित्यात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांनी मांडलेले तत्त्वज्ञान हे सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत होते. ‘शेतकऱ्याचा आसूड’ (१८८३) या ग्रंथातून त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणाची कारणे सांगितली. सावकारी पाश, अस्मानी संकटे आणि सुलतानी जुलूम यावर त्यांनी कडाडून प्रहार केला. 

जोतिबांचा स्त्री-मुक्तीचा विचार केवळ शाळा काढण्यापुरता मर्यादित नव्हता. त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षित करून त्यांना वैचारिक सहचारी म्हणून उभे केले. ‘बालहत्या प्रतिबंधकगृह’ स्थापन करून सामाजिक बहिष्कार सोसणाऱ्या स्त्रियांना आश्रय दिला. एका  विधवा स्त्रीच्या मुलाला (यशवंत) दत्तक घेऊन  रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते श्रेष्ठ असल्याचे सिद्ध केले. ही कृती आजच्या काळातील कोणत्याही मानवी हक्क चळवळीपेक्षा कितीतरी मोठी आणि क्रांतिकारी होती.

जोतिबांनी ब्रिटिश राजवटीचे विश्लेषण अत्यंत बारकाईने केले होते. ब्रिटिशांमुळे शिक्षणाची दारे उघडली, हे मान्य करतानाच त्यांनी सावध केले की, सरकारी नोकऱ्यांमध्ये पुन्हा तेच लोक बसले आहेत जे शेतकऱ्यांचे शोषण करतात. भारतातील पहिली कामगार संघटना उभी करण्यात जोतिबांच्या विचारांचा मोठा वाटा होता. कामगारांना सुटी मिळावी, त्यांच्या कामाचे तास निश्चित असावेत, ही मागणी सर्वप्रथम जोतिबांच्याच विचारसरणीतून पुढे आली. ११ मे १८८८ रोजी मुंबईच्या कोळीवाड्यात एका प्रचंड जनसमुदायाने जोतिबांना ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली.

ही पदवी कोणत्याही राजाने किंवा सत्तेने दिलेली नव्हती, तर ती ज्यांच्यासाठी जोतिबा आयुष्यभर लढले, त्या कष्टकरी जनतेने दिलेली कृतज्ञता पावती होती. विद्येविना गेलेली मती जोतिबांनी पुन्हा मिळवून दिली, म्हणूनच आजचा बहुजन समाज ताठ कण्याने उभा आहे. महात्मा फुलेंची २०० वी जयंती साजरी करत असताना केवळ त्यांच्या प्रतिमेचे पूजन करणे पुरेसे नाही. समाजातील अंधश्रद्धा आणि जातीय विद्वेष संपवण्यासाठी जोतिबांच्याच मार्गाने चालावे लागेल. जात, धर्म आणि लिंगाच्या पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून ओळखणे, हीच जोतिबांना खरी श्रद्धांजली ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahatma Phule: A fearless voice questioning the system; a special article.

Web Summary : Jyotiba Phule, a pioneer of social reform, championed education as a tool for empowerment. He fought against caste discrimination, advocated for women's rights, and established the Satyashodhak Samaj to challenge societal norms. His work continues to inspire the fight for equality and social justice.
टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेMahatma Phule Wadaमहात्मा फुले वाडा