शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख : ...संसार की सारी पीडा तो रामजीने भी सही, तो हम क्या है?

By meghana.dhoke | Updated: July 1, 2023 10:41 IST

Ayodhya: ‘आदिपुरुष’मधले टपोरी संवाद, आक्रमक देहबोली, ‘अँग्री-सिक्स पॅक लूक’ असलेलं ‘राघव-रूप’.. हे सारं पाहताना आठवली अयोध्येत भेटलेली साधीभोळी माणसं!

- मेघना ढोके(संपादक, लोकमत सखी डिजिटल)

अयोध्येत शरयूकाठचं एक दृश्य विलक्षण मोहक आणि तितकंच भावुक असतं. तिथं भेटणारी अयोध्यावासी माणसं सांगतात, ‘रामजी के समय की यहाँ आज दो चिजे है, एक ये नाम, अयोध्याजी और दुसरी शरयूजी!’ 

त्याच शरयू काठी राम की पौडी अर्थात घाटावर मोठे स्क्रीन लागलेले दिसतात. स्क्रीनवर रामायण सुरू असतं.  (रामानंद सागरकृत टीव्ही सिरिअल). तिन्ही सांजेलाच नाही, तर अगदी सकाळी आणि दुपारी उन्हातही देशातून कुठकुठून आलेली माणसं  घाटावर बसून ते रामायण पाहत असतात. रडत असतात, हुंदक्यांचे आवाज ऐकू येतात.

लव-कुश गात असतात, ‘हम कथा सुनाए राम सकल गुण धाम की, ये रामायण है पुण्य कथा श्रीराम की..’ विलक्षण असतं वातावरण! गोरगरीब साधी माणसं भान हरपून तो पडदा पाहतात. कथा सांगता सांगता लव-कुश गाण्यातून जाब विचारत असतात, जेव्हा माँ सीतेला बोल लावण्यात आला,  तेव्हा कुठे होतात तुम्ही अयोध्यावासी? कुठे होती राजमातांची ममता, कुठे होते ज्ञानी गुरुजन, कुठे होते सगळे भाऊबंद? 

जणू कुणी आज आपल्यालाच जाब विचारतं आहे असं वाटून माणसं शरमेनं मान खाली घालून बसतात, रडतात.  अयोध्येतली आणि अयोध्येबाहेरची, बहुतांश देशातल्या हिंदी पट्ट्यात जगणारी माणसं अयोध्येतल्या दहा दिवसांत भेटली. या शहरात राहणाऱ्यांसाठीही प्रभू श्रीरामाची रूपं वेगवेगळी आहेत. रामजन्मभूमीतले रामलला, कनक भवनातले ‘सरकार’ आणि घरोघर ठाकूरजींच्या रूपात असलेलेही “श्रीराम”!

आपण स्वत: जेवणापूर्वी ठाकूरजींना काय ‘भोग’ लावायचा याची काळजी माणसांना असते.  काही घरात तर आर्थिक चणचणही असते; पण तरीही घाटांवरच्या गल्ल्यांत, पंडे असणाऱ्या कुटुंबात, मठ-मंदिरात कुठंही जा, श्रद्धा एकच, ‘ठाकूरजी अपनी व्यवस्था खूद करते है!’ 

अगदी कोरोनाकाळात जेव्हा या तीर्थक्षेत्री गावात कुणी येऊ शकत नव्हतं तेव्हाही आपल्या पोटापाण्यापेक्षा इथं माणसांना चिंता होती की ठाकूरजींना भोग लागला पाहिजे!  अयोध्येतली माणसं ठाकूरजींकडे पाहून जगतात. भोग-प्रसाद, बालभोग, कच्चा प्रशाद-पक्का प्रशाद यशाशक्ती आधी त्यांना देतात. म्हणतात, ‘संसार की सारी पीडा तो रामजीने भी सही, तो हम क्या है? यहीं तो जीवन की माया है!’ - चर्चा काहीही सुरू असो, उत्तरादाखल रामजींच्या जीवनातला एखादा दाखला येतोच.

आपली सुख-दु:खं आपण भोगायची, त्यासाठी देवाला संकटात घालायचं नाही या समजुतीनं जगणारी माणसं अनेक गोष्टी विनातक्रार सहज स्वीकारतात. जगणं जसं आहे तसं स्वीकारण्याचा समंजस सहजभाव माणसांच्या वागण्या-बोलण्यात ठायीठायी भेटतो.

जगण्याच्या अडचणी कुठे कुणाला चुकल्या म्हणा! पण श्रीरामाच्या भूमीतल्या माणसांचा भरवसा फक्त दोघांवरच. एक रामजी, दुसरे हनुमानजी.  श्रद्धेनं घरातल्या ठाकूरजींची तर पोटच्या बाळासारखी काळजी घेतली जाते, नैवेद्य दाखवण्याच्या वेळा सांभाळल्या जातात आणि काही अडलं, दुखलंखुपलं, अडचण आली तर मदत मागायला वडीलधाऱ्यांना भेटावं तसं रामाला - ‘कनक सरकार’ किंवा हनुमान गढीवर जाऊन हनुमानाकडे ‘सरकार’ म्हणून अर्जी दिली जाते.

शरयूकाठी चिरपुरातन नित्य नूतन एकच गोष्ट आहे असं साधीभोळी माणसं मानतात ! ती म्हणजे अयोध्या आणि रामकथा. इथं गोरगरीब माणसांच्या रोजच्या आयुष्यातही व्यावहारिक शहाणपण आणि जगण्याचा समंजस स्वीकार इतका सहज आहे की शहरी धामधुमीच्या स्पर्धात्मक जगाला ते सारं अजब वाटावं. अविश्सनीयही. 

हे सारं आठवलं कारण ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या निमित्तानं झालेली चर्चा. त्या सिनेमातले टपोरी संवाद, सदा आक्रमक देहबोली, ‘अँग्री-सिक्स पॅक लूक’ असलेलं ‘राघव-रूप’.. हे सारं पाहताना अयोध्येत भेटणारी साधीभोळी माणसं आठवली. शरयूच्या काठचं ते जग पडद्यावरच्या ‘व्हीएफएक्स’सारखं चकाचक ग्लॅमरस अजिबात नाही; पण समाधानी-साधं आणि समंजस मात्र नक्की आहे..    meghana.dhoke@lokmat.com

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरAdipurushआदिपुरूष