शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

विशेष लेख : ...संसार की सारी पीडा तो रामजीने भी सही, तो हम क्या है?

By meghana.dhoke | Updated: July 1, 2023 10:41 IST

Ayodhya: ‘आदिपुरुष’मधले टपोरी संवाद, आक्रमक देहबोली, ‘अँग्री-सिक्स पॅक लूक’ असलेलं ‘राघव-रूप’.. हे सारं पाहताना आठवली अयोध्येत भेटलेली साधीभोळी माणसं!

- मेघना ढोके(संपादक, लोकमत सखी डिजिटल)

अयोध्येत शरयूकाठचं एक दृश्य विलक्षण मोहक आणि तितकंच भावुक असतं. तिथं भेटणारी अयोध्यावासी माणसं सांगतात, ‘रामजी के समय की यहाँ आज दो चिजे है, एक ये नाम, अयोध्याजी और दुसरी शरयूजी!’ 

त्याच शरयू काठी राम की पौडी अर्थात घाटावर मोठे स्क्रीन लागलेले दिसतात. स्क्रीनवर रामायण सुरू असतं.  (रामानंद सागरकृत टीव्ही सिरिअल). तिन्ही सांजेलाच नाही, तर अगदी सकाळी आणि दुपारी उन्हातही देशातून कुठकुठून आलेली माणसं  घाटावर बसून ते रामायण पाहत असतात. रडत असतात, हुंदक्यांचे आवाज ऐकू येतात.

लव-कुश गात असतात, ‘हम कथा सुनाए राम सकल गुण धाम की, ये रामायण है पुण्य कथा श्रीराम की..’ विलक्षण असतं वातावरण! गोरगरीब साधी माणसं भान हरपून तो पडदा पाहतात. कथा सांगता सांगता लव-कुश गाण्यातून जाब विचारत असतात, जेव्हा माँ सीतेला बोल लावण्यात आला,  तेव्हा कुठे होतात तुम्ही अयोध्यावासी? कुठे होती राजमातांची ममता, कुठे होते ज्ञानी गुरुजन, कुठे होते सगळे भाऊबंद? 

जणू कुणी आज आपल्यालाच जाब विचारतं आहे असं वाटून माणसं शरमेनं मान खाली घालून बसतात, रडतात.  अयोध्येतली आणि अयोध्येबाहेरची, बहुतांश देशातल्या हिंदी पट्ट्यात जगणारी माणसं अयोध्येतल्या दहा दिवसांत भेटली. या शहरात राहणाऱ्यांसाठीही प्रभू श्रीरामाची रूपं वेगवेगळी आहेत. रामजन्मभूमीतले रामलला, कनक भवनातले ‘सरकार’ आणि घरोघर ठाकूरजींच्या रूपात असलेलेही “श्रीराम”!

आपण स्वत: जेवणापूर्वी ठाकूरजींना काय ‘भोग’ लावायचा याची काळजी माणसांना असते.  काही घरात तर आर्थिक चणचणही असते; पण तरीही घाटांवरच्या गल्ल्यांत, पंडे असणाऱ्या कुटुंबात, मठ-मंदिरात कुठंही जा, श्रद्धा एकच, ‘ठाकूरजी अपनी व्यवस्था खूद करते है!’ 

अगदी कोरोनाकाळात जेव्हा या तीर्थक्षेत्री गावात कुणी येऊ शकत नव्हतं तेव्हाही आपल्या पोटापाण्यापेक्षा इथं माणसांना चिंता होती की ठाकूरजींना भोग लागला पाहिजे!  अयोध्येतली माणसं ठाकूरजींकडे पाहून जगतात. भोग-प्रसाद, बालभोग, कच्चा प्रशाद-पक्का प्रशाद यशाशक्ती आधी त्यांना देतात. म्हणतात, ‘संसार की सारी पीडा तो रामजीने भी सही, तो हम क्या है? यहीं तो जीवन की माया है!’ - चर्चा काहीही सुरू असो, उत्तरादाखल रामजींच्या जीवनातला एखादा दाखला येतोच.

आपली सुख-दु:खं आपण भोगायची, त्यासाठी देवाला संकटात घालायचं नाही या समजुतीनं जगणारी माणसं अनेक गोष्टी विनातक्रार सहज स्वीकारतात. जगणं जसं आहे तसं स्वीकारण्याचा समंजस सहजभाव माणसांच्या वागण्या-बोलण्यात ठायीठायी भेटतो.

जगण्याच्या अडचणी कुठे कुणाला चुकल्या म्हणा! पण श्रीरामाच्या भूमीतल्या माणसांचा भरवसा फक्त दोघांवरच. एक रामजी, दुसरे हनुमानजी.  श्रद्धेनं घरातल्या ठाकूरजींची तर पोटच्या बाळासारखी काळजी घेतली जाते, नैवेद्य दाखवण्याच्या वेळा सांभाळल्या जातात आणि काही अडलं, दुखलंखुपलं, अडचण आली तर मदत मागायला वडीलधाऱ्यांना भेटावं तसं रामाला - ‘कनक सरकार’ किंवा हनुमान गढीवर जाऊन हनुमानाकडे ‘सरकार’ म्हणून अर्जी दिली जाते.

शरयूकाठी चिरपुरातन नित्य नूतन एकच गोष्ट आहे असं साधीभोळी माणसं मानतात ! ती म्हणजे अयोध्या आणि रामकथा. इथं गोरगरीब माणसांच्या रोजच्या आयुष्यातही व्यावहारिक शहाणपण आणि जगण्याचा समंजस स्वीकार इतका सहज आहे की शहरी धामधुमीच्या स्पर्धात्मक जगाला ते सारं अजब वाटावं. अविश्सनीयही. 

हे सारं आठवलं कारण ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या निमित्तानं झालेली चर्चा. त्या सिनेमातले टपोरी संवाद, सदा आक्रमक देहबोली, ‘अँग्री-सिक्स पॅक लूक’ असलेलं ‘राघव-रूप’.. हे सारं पाहताना अयोध्येत भेटणारी साधीभोळी माणसं आठवली. शरयूच्या काठचं ते जग पडद्यावरच्या ‘व्हीएफएक्स’सारखं चकाचक ग्लॅमरस अजिबात नाही; पण समाधानी-साधं आणि समंजस मात्र नक्की आहे..    meghana.dhoke@lokmat.com

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरAdipurushआदिपुरूष