शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

विशेष लेख: गोव्याला इतकी वर्षे जे जमले, ते देशात साधेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2023 08:44 IST

पोर्तुगीजांनी लागू केलेला 'पोर्तुगीज सिव्हिल कोड' आजही गोव्यात अस्तित्वात आहे. समान नागरी कायद्याच्या चर्चेत हा मुद्दा फार महत्त्वाचा!

अ‍ॅड. राजेश नार्वेकर, ज्येष्ठ वकील, माजी अध्यक्ष, गोवा प्रशासकीय लवाद

'आभाळाखालचे नंदनवन' असे गोमंतकाचे वर्णन केले जाते. येथील निसर्ग व 'सुशेगाद' गोयॅकारांचा पाहुणचार लाखो देशी-विदेशी पर्यटकांनी घेतला आहे. हल्ली मात्र वेगळ्याच कारणांमुळे गोवा चर्चेत आहे; तो म्हणजे समान नागरी कायदा! समान नागरी कायद्याचा मसुदा अजून केंद्र सरकारने जाहीर केलेला नाही, तरीही देशात त्याबाबत चर्चेला उधाण आले आहे. त्यात गोव्यातील पोर्तुगीजकालीन कायद्याचा गोव्यातील पोर्तुगीजकालीन कायद्याचा उल्लेख अपरिहार्यपणे होताना दिसतो. समान नागरी कायद्याचे बीज सर्वप्रथम नेपोलियनने आपल्या देशात रोवले. सर्व देशवासीयांना समान हक्क व वागणूक मिळावी म्हणून नेपोलियनने असा कायदा आपल्या देशात लागू केला. त्यानंतर इतरही काही युरोपियन देशांनी अशा प्रकारचा कायदा अमलात आणला. त्यात पोर्तुगालही होता. गोव्यात आल्यावर पोर्तुगीजांनी 'पोर्तुगीज सिव्हिल कोड' हा कायदा गोव्यात लागू केला. त्या व्यतिरिक्त गोवेकरांना जमिनी मिळाव्यात यासाठी "कोड ऑफ कोमुनिदास (code of communidades), देवस्थानाविषयी माझनी कायदा (mazzania) हे दोन कायदेही येथे लागू करण्यात आले.

गोव्यातील पोर्तुगीज कायद्यानुसार लग्न, घटस्फोट, वारसा हक्क व त्यानुसार वडिलोपार्जित संपत्तीची वारसदारांत वाटणी होते. लग्नाची व्याख्या "संततीसाठी केलेला करार" अशी आहे. (civil contract for begetting children) हिंदूंनी लग्न, कॅथलिकनी काजार व मुस्लीम धर्मियांनी शादी करताना त्याची नोंद विवाह निबंधकांकडे करावी लागते. तसे केल्यावर लग्नाला कायदेशीर मान्यता मिळते. त्यामुळे लग्नातले सप्तपदीसारखे पारंपरिक रीतीरिवाज केवळ उपचार ठरतात. याउलट महाराष्ट्रातील हिंदू मॅरेज अॅक्टनुसार परंपरा किंवा रीतीरिवाजानुसार लावलेले लग्न कायद्याने मान्य ठरते. या हिंदू मॅरेज अॅक्टचा लाभ गोमंतकीयही घेतातच. गोव्यातील ज्या प्रेमिकांना घरच्यांकडून विरोध होता, त्यांच्यासाठी सावंतवाडी येथे (पळून) जाऊन पारंपरिक पद्धतीने सप्तपदी घेऊन लग्न करण्याचा पर्याय असून ते लग्न ग्राह्य ठरते!

लग्नानंतर एका वर्षाच्या आत लग्न मोडायचे असल्यास पोर्तुगीज कायद्यानुसार आई- वडिलांनी जबरदस्तीने आपले लग्न लावले किंवा लग्नाअगोदर दुसऱ्याच्या स्टेट्सची (status) चुकीची माहिती मिळाल्याचे सांगून लग्न मोडता (Annulment) येते. घटस्फोट घ्यायचा असेल तर मात्र वाईट वागणूक, एकाला बरा न होणारा आजार, तसेच इतर काही कारणांमुळे घेता येतो. लग्न मोडल्यावर बायको व मुलंबाळं असल्यास त्यांना देण्यात येणाऱ्या पोटगीविषयी कायद्यात तरतूद आहे.

पोर्तुगीज सिव्हिल कोडची दखल आयकर कायद्यातही घेण्यात आलेली आहे. गोव्यातील कुठल्याही धर्मियाचे लग्न जर या कायद्यानुसार नोंदवले असेल तर पती-पत्नीला मिळणारे वार्षिक उत्पन्न दोघांना समानरीत्या दाखवण्याची तरतूद आयकर कायद्यात आहे. फक्त कुणी एखादा नोकरी करीत असेल तर त्याचा पगार मात्र, त्याच्याच नावावर दाखवण्यात येतो. नोकरी न करणाऱ्या जोडीदाराच्या नावावर तो दाखवता येत नाही. यामुळे गोमंतकीयांना आयकरात सूट मिळते किंवा कर भरताना बचत होते. पोर्तुगीज कायद्यानुसार आई-वडिलांच्या निधनानंतर सर्व वारसदारांचा, मग मुलगा असो वा मुलगी ; वडिलोपार्जित संपत्तीवर समान हक्क असतो. मुलंबाळं नसतील आणि पत्नीचे निधन झाल्यास आई-वडिलांना संपत्तीवर हक्क सांगता येतो. आई-वडील नसतील तर भावा-बहिणींना तो हक्क पोहाचतो. पोर्तुगीज कायद्यानुसार मुलगा व मुलीला समान हक्क आहेत. हिंदू परंपरा व रीतीरिवाजानुसार वडिलांचा अंत्यविधी करण्याचा हक्क मुलालाच असतो, असे म्हणतात. पूर्वीच्या काळी केवळ वंश वाढावा म्हणून नव्हे तर वडिलांना अग्नी देण्यासाठी मुलगा जन्मावा, असे म्हटले जायचे. गोव्यात मात्र कित्येक वेळा मुलींनी वडिलांचे अंत्यसंस्कार केलेले आहेत.

गोव्यातील मुस्लीम धर्मीय लोकांचे निकाहही पोर्तुगीज कायद्यानुसार नोंदवण्यात आले आहेत. काही जणांनी शरीयत कायद्यानुसार दुसऱ्यांदा निकाह केलेला आहे. ख्रिश्चनांना घटस्फोट घेताना त्यांच्या कायद्यानुसार दोन वर्षे वेगळे राहण्याची अट असते, नंतर संमतीने घटस्फोट घेता येतो. गोव्यात मात्र ख्रिश्चन धर्मियांना घटस्फोट घेण्याकरिता इथल्या पोर्तुगीज कायद्यानुसार न्यायालयात खटला दाखल करावा लागतो.

समान कायद्याला काहीजण व्यक्तिगत स्तरावर तर काही राजकीय पक्ष सार्वजनिक स्तरावर विरोध करण्याची भाषा करीत आहेत. अजून समान नागरी कायद्याचा मसुदा केंद्र सरकारने जाहीर केलेला नाही. तरीसुद्धा विरोधाची भाषा केली जाते. भारतीय घटनेतच समान नागरी कायदा लागू करण्याचा सरकारने प्रयत्न करावा, असे प्रावधान आहे. सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी त्याविषयीच्या जबाबदारीची जाणीव सरकारला करून दिलेली आहे.

देशातील विविध धर्मीय लोकांमध्ये वेगवेगळ्या परंपरा, रीती-रिवाज प्रचलित आहेत. गेली कित्येक वर्षे हे सगळे रीती-रिवाज जोपासले गेले आहेत. त्यांना तिलांजली देऊन केवळ समान नागरी कायदा अमलात आणणे शक्य आहे का, हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर सर्वप्रथम शोधावे लागेल. इतकी वर्षे चालत आलेल्या रूढी, परंपरा, रीती- रिवाजांना प्रतिबंध करण्यात आल्यास देशात अशांतता पसरू शकते. राष्ट्रहीत सर्वप्रथम नंतर धर्म, परंपरा, रीती- रिवाज असे जर सगळ्या भारतीयांनी ठरवले, तर तो सुदिनच ठरेल यात शंका नाही आपण तशी तयारी ठेवायला हवी....

टॅग्स :goaगोवा