शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: स्वातंत्र्य मिळाले म्हणजे काहीही करायचे?

By विजय बाविस्कर | Updated: January 26, 2025 06:30 IST

९० टक्के समाजकारण आणि १० टक्के राजकारण केले पाहिजे, असे म्हणणारे बहुसंख्य नेते ९० टक्के राजकारण आणि १० टक्केसुद्धा समाजकारण करताना दिसत नाहीत. एकमेकांचे पाय ओढणे, तरुण पिढीला पैशांचे आमिष दाखवून नको त्या गोष्टी करायला लावणारे राजकारणीही आपल्या आजूबाजूलाच आहेत.

विजय बाविस्कर  , समूह संपादक, लोकमत|

आपण २६ जानेवारी, १५ ऑगस्ट हे दोन दिवस अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरे करतो. देशभक्तीपर गाणी ऐकतो. राष्ट्रध्वजाला सलाम करतो. मात्र आपली हीच भावना दुसऱ्या दिवशी चित्रपटगृहात राष्ट्रगीत लागल्यानंतर उभे राहण्यासाठीही कंटाळा का करते? स्वातंत्र्य मिळाले म्हणजे नेमके आपण काय मिळवले? वाटेल तसे बोलण्याचे वागण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे का ? ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ या उक्तीप्रमाणे वृत्तीने आपण कोणाबद्दलही, कधीही, कुठेही, काहीही बोलू शकतो...? हे स्वातंत्र्य आपल्याला अपेक्षित आहे का..? महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह अनेक ज्ञात-अज्ञात सान-थोरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. 

आपण देशासाठी काय करत आहोत? अलीकडच्या काही वर्षांत सोशल मीडिया नावाचे भूत आपल्या मानगुटीवर बसले आहे. आपल्या हाती मोबाइल आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यासारखी आयुधं आहेत. याचा अर्थ मनात आलेली प्रत्येक भावना कोणताही मागचा पुढचा विचार न करता या माध्यमांद्वारे आपण जगभरात पसरवतो. हे करत असताना आपण द्वेष, तिरस्कार पसरवत आहोत याचेतरी भान आपल्याला असते का?

गावागावात भाईचारा होता, सामंजस्य होते... लोक एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जात असत... परस्परांच्या सुखदुःखात सहभागी होत... आता हे वातावरण आपल्या आजूबाजूला शिल्लक उरले आहे का..? पुण्या-मुंबईसारख्या महानगरांमध्ये ३०-४० मजल्यांच्या टॉवरमधून एका मजल्यावर पार्टी चालू असते, तर दुसऱ्या मजल्यावर कोणाचे तरी निधन झालेले असते... अशावेळी पार्टी करणाऱ्यांना थांबावेसे वाटत नाही ... इतक्या आमच्या संवेदना बोथट झाल्या आहेत का..? 

या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अनेक प्रश्न मनात फेर धरून नाचत आहेत. एकीकडे तरुण पिढी उद्यमी बनत आहे. तंत्रज्ञानावर स्वार होत ही तरुणाई वेगवेगळे व्यवसाय शोधत आहे. त्याचवेळी भरकटलेली तरुण पिढीदेखील याच देशात आपल्या अवतीभवती आहे. ९० टक्के समाजकारण आणि १० टक्के राजकारण केले पाहिजे, असे म्हणणारे बहुसंख्य नेते ९०% राजकारण आणि १० टक्के सुद्धा समाजकारण करताना दिसत नाहीत. एकमेकांचे पाय ओढणे, तरुण पिढीला पैशांचे आमिष दाखवून नको त्या गोष्टी करायला लावणारे राजकारणीही आपल्या आजूबाजूलाच आहेत. आजचा दिवस आपला असे म्हणत प्रत्येक जण स्वतःच्या ताटात जेवढे ओढून घेता येईल तेवढे ओढून घेण्याच्या मागे लागला आहे. 

महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी या गोष्टी आम्हाला निवडणुकीपुरत्या महत्त्वाच्या वाटतात. रुपयाचे अवमूल्यन किंवा मोठ्या प्रमाणावर तरुण हुशार पिढी देश सोडून जाणे हा विषय गंभीर चर्चेचा आहे, असे आम्हाला वाटत नाही. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव, देश, अन् धर्मा पायी प्राण घेतले हाती...या ओळी कवितेत वाचायला छान वाटतात. मात्र प्रत्यक्षात आम्ही तसे जगतो का? हा प्रश्न स्वतःला भारतीय आणि स्वतंत्र समजणाऱ्या प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला पाहिजे. वंदे भारत ट्रेन असो किंवा स्टेशनवर पिण्याच्या पाण्याचा वॉटर फिल्टर असो, आजही त्या ठिकाणी स्टीलचा ग्लास साखळीला ठेवावा लागतो... पान, तंबाखू, गुटखा खाऊन रस्त्यावर पिचकारी मारण्यात आम्ही स्वतःला ग्रेट समजतो.सिग्नल मोडणे, कोणाला धडक देऊन सुसाट निघून जाणे, दारू पिऊन गाडी चालवणे ही आमची स्वातंत्र्याची व्याख्या होणार असेल... तर कशालाच काही अर्थ उरणार नाही... स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. आमच्या सोयीनुसार ‘कधी कधी भारत माझा देश आहे’ असे म्हणून आम्ही प्रत्येक गोष्ट सोयीनुसार वागायची ठरवली असेल तर अशा स्वातंत्र्याची अपेक्षा आपल्या पूर्वजांनी केली होती का..? हा प्रश्न आपण आपल्या मनाला आजच्या निमित्ताने विचारूया... प्रजासत्ताकदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!!!

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२४