शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

कायद्यामुळे काही पुरुष पीडित हे मान्य; पण महिलांसाठी असलेले कायदे नको ही धारणा चुकीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 07:35 IST

गेल्या महिन्यात अतुल सुभाष या आयटी इंजिनीअरने आणि पुनीत खुराना या तरुण उद्योजकाने आत्महत्या केली. दोघांनाही आत्महत्येला प्रवृत्त करणारे प्रमुख कारण एकच, ते म्हणजे पत्नी आणि तिच्या माहेरच्यांनी चालवलेला छळ. त्यानिमित्ताने...

ॲड. रमा सरोदे, ह्युमन राइट्स पॅनेलिस्ट

अतुल सुभाष या आयटी इंजिनीअरने आत्महत्येपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे महिलांसाठी असलेल्या कायद्यांचा गैरवापर होतो का, याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. सर्रासपणे या कायद्यांचा गैरवापर केला जातो, असा पुरुषांचा समज आहे. त्यांचा हा विचार मला धोक्याचा वाटतो. केवळ महिलांसाठीच असलेल्या कायद्यांचा गैरवापर होतो का?  नाही... सर्वच कायद्यांचा गैरवापर होत असतो. महिलांसाठी असलेले कायदे हे सामाजिक आहेत. त्यांच्याकडे केवळ महिलांचे कायदे म्हणून पाहणे अयोग्य ठरले. हा कायद्यामुळे काही पुरुष पीडित असतील, हे मान्य आहे. पण, हे कायदेच नको, ही धारणा चुकीची आहे. या कायद्यांना महिला विरुद्ध पुरुष, असे रंग कोणी देऊ नये.

आपला समाज पितृसत्ताक असल्याने महिलांनी कसे वागावे, कसे राहावे, तिने नोकरी करावी की नाही, वयाच्या कितव्या वर्षी कोणाबरोबर लग्न करावे, याचा निर्णय घरातले पुरुष घेत असतात. या निर्णय प्रक्रियेत फारच कमी वेळा महिलांचा सहभाग असतो. या पुरुषप्रधान संस्कृतीत महिला व पुरुष दोघांवरही त्याचा  पगडा आहे. त्यामुळे आपल्यावर अत्याचार होतो आहे, हेसुद्धा बऱ्याच स्त्रियांना कळत नाही. एखादे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचते. पण, तसा अत्याचार सहन करणारी ती एक नसते तर अशा अनेक महिला  कोणतीही तक्रार न करता अत्याचार निमूटपणे सहन करत असतात. अत्याचाराला कंटाळलेल्या असतील तरी महिला माहेरच्या पाठबळाशिवाय सहसा एकटीने कोणताच निर्णय घेत नाहीत. त्यांनी माहेरी परतावे की सासरीच अत्याचार सहन करत राहावे, नवऱ्यापासून घटस्फोट घ्यावा की नाही? त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल करावे, इथपासून सर्व निर्णय प्रक्रियेत एक पुरुष सहभागी असतोच.

वकील म्हणून माझा अनुभव आहे की, अनेक बायका त्यांच्या नवऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्यास इच्छुक नसतात. आपल्या नवऱ्याने तुरुंगात जावे, अशी त्यांची इच्छा नसते. महिलांसाठी असलेले कायदे एकप्रकारे सामाजिक कायदे आहेत. त्यांच्यावर होत असलेले कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार थांबविण्यासाठी अशा कायद्यांची आवश्यकता वाटते. त्यांच्यावरील हिंसेचे प्रमाण वाढू लागले. आकडेवारीद्वारे हे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा कायद्यांची गरज भासली. महिलांना हक्काचा निवारा मिळावा, संरक्षण मिळावे, मुलांपासून दूर केले जाऊ नये म्हणून २००५ चा दिवाणी स्वरूपाचा कौटुंबिक कायदा तयार केला.

कायद्यात पोटगी आणि देखभालीच्या खर्चाची तरतूद असल्याने बायका वाट्टेल तेवढे पैसे मागतात, असा लोकांचा गैरसमज आहे. दोघेही कमावते असतील तर सर्वोच्च न्यायालयाने दोघांच्याही मालमत्ता आणि कर्ज याबाबत प्रतिज्ञापत्रात तपशिलात माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. कोणीही येऊन मनमानी रक्कम मागू शकत नाही. कोणावर किती जबाबदारी आहे, तो काय कमावतो आणि अन्य बाबींचा सारासार विचार करून पोटगीची रक्कम  ठरविली जाते.  काही बायका तर पोटगीची रक्कम नको केवळ सुटका करा, असे म्हणणाऱ्याही आहेत.

कौटुंबिक हिंसाचार त्याचबरोबर घटस्फोटाच्या केसेस सुरू असतील आणि घटस्फोटाचे प्रकरण सामंजस्याने सोडवायचे असेल तर बरेचदा अट घातली जाते की, कौटुंबिक हिंसाचार व अन्य प्रकरणे मागे घे. कोर्टकचेरीतून सुटका हवी असल्याने महिला अट मान्य करतात. मात्र, आयपीसी ४९८ (अ) अंतर्गत दाखल केलेला गुन्हा मागे घेतला जाऊ शकत नाही म्हणून महिलेला खोटी साक्ष द्यावी लागते आणि आपल्यावर अत्याचार झाला नाही. रागाच्या भरात आपण अशी तक्रार केली, असे न्यायालयाला सांगते. आपोआपच नवरा सुटतो. त्याचा अर्थ महिलेने कायद्याचा गैरवापर केला असा होत नाही. रोजंदारीवर काम करणाऱ्या पुरुषांच्यामध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे, असे अभ्यासातून दिसते. त्यासाठी दारू पिणे, कामावरील तणाव अशा बाबी कारणीभूत आहेत. 

अतुल आणि पुनीतच्या निमित्ताने पुरुषांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न चर्चेला आला आहे. त्यासाठी जुन्या बुरसटलेल्या रुढी सोडून लिंगभेदाच्या पलीकडे जावे लागेल. तरच स्वस्थ कुटुंब निर्माण होईल. उपाययोजना म्हणून दाम्पत्याने मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारCourtन्यायालय