शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कायद्यामुळे काही पुरुष पीडित हे मान्य; पण महिलांसाठी असलेले कायदे नको ही धारणा चुकीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 07:35 IST

गेल्या महिन्यात अतुल सुभाष या आयटी इंजिनीअरने आणि पुनीत खुराना या तरुण उद्योजकाने आत्महत्या केली. दोघांनाही आत्महत्येला प्रवृत्त करणारे प्रमुख कारण एकच, ते म्हणजे पत्नी आणि तिच्या माहेरच्यांनी चालवलेला छळ. त्यानिमित्ताने...

ॲड. रमा सरोदे, ह्युमन राइट्स पॅनेलिस्ट

अतुल सुभाष या आयटी इंजिनीअरने आत्महत्येपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे महिलांसाठी असलेल्या कायद्यांचा गैरवापर होतो का, याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. सर्रासपणे या कायद्यांचा गैरवापर केला जातो, असा पुरुषांचा समज आहे. त्यांचा हा विचार मला धोक्याचा वाटतो. केवळ महिलांसाठीच असलेल्या कायद्यांचा गैरवापर होतो का?  नाही... सर्वच कायद्यांचा गैरवापर होत असतो. महिलांसाठी असलेले कायदे हे सामाजिक आहेत. त्यांच्याकडे केवळ महिलांचे कायदे म्हणून पाहणे अयोग्य ठरले. हा कायद्यामुळे काही पुरुष पीडित असतील, हे मान्य आहे. पण, हे कायदेच नको, ही धारणा चुकीची आहे. या कायद्यांना महिला विरुद्ध पुरुष, असे रंग कोणी देऊ नये.

आपला समाज पितृसत्ताक असल्याने महिलांनी कसे वागावे, कसे राहावे, तिने नोकरी करावी की नाही, वयाच्या कितव्या वर्षी कोणाबरोबर लग्न करावे, याचा निर्णय घरातले पुरुष घेत असतात. या निर्णय प्रक्रियेत फारच कमी वेळा महिलांचा सहभाग असतो. या पुरुषप्रधान संस्कृतीत महिला व पुरुष दोघांवरही त्याचा  पगडा आहे. त्यामुळे आपल्यावर अत्याचार होतो आहे, हेसुद्धा बऱ्याच स्त्रियांना कळत नाही. एखादे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचते. पण, तसा अत्याचार सहन करणारी ती एक नसते तर अशा अनेक महिला  कोणतीही तक्रार न करता अत्याचार निमूटपणे सहन करत असतात. अत्याचाराला कंटाळलेल्या असतील तरी महिला माहेरच्या पाठबळाशिवाय सहसा एकटीने कोणताच निर्णय घेत नाहीत. त्यांनी माहेरी परतावे की सासरीच अत्याचार सहन करत राहावे, नवऱ्यापासून घटस्फोट घ्यावा की नाही? त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल करावे, इथपासून सर्व निर्णय प्रक्रियेत एक पुरुष सहभागी असतोच.

वकील म्हणून माझा अनुभव आहे की, अनेक बायका त्यांच्या नवऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्यास इच्छुक नसतात. आपल्या नवऱ्याने तुरुंगात जावे, अशी त्यांची इच्छा नसते. महिलांसाठी असलेले कायदे एकप्रकारे सामाजिक कायदे आहेत. त्यांच्यावर होत असलेले कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार थांबविण्यासाठी अशा कायद्यांची आवश्यकता वाटते. त्यांच्यावरील हिंसेचे प्रमाण वाढू लागले. आकडेवारीद्वारे हे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा कायद्यांची गरज भासली. महिलांना हक्काचा निवारा मिळावा, संरक्षण मिळावे, मुलांपासून दूर केले जाऊ नये म्हणून २००५ चा दिवाणी स्वरूपाचा कौटुंबिक कायदा तयार केला.

कायद्यात पोटगी आणि देखभालीच्या खर्चाची तरतूद असल्याने बायका वाट्टेल तेवढे पैसे मागतात, असा लोकांचा गैरसमज आहे. दोघेही कमावते असतील तर सर्वोच्च न्यायालयाने दोघांच्याही मालमत्ता आणि कर्ज याबाबत प्रतिज्ञापत्रात तपशिलात माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. कोणीही येऊन मनमानी रक्कम मागू शकत नाही. कोणावर किती जबाबदारी आहे, तो काय कमावतो आणि अन्य बाबींचा सारासार विचार करून पोटगीची रक्कम  ठरविली जाते.  काही बायका तर पोटगीची रक्कम नको केवळ सुटका करा, असे म्हणणाऱ्याही आहेत.

कौटुंबिक हिंसाचार त्याचबरोबर घटस्फोटाच्या केसेस सुरू असतील आणि घटस्फोटाचे प्रकरण सामंजस्याने सोडवायचे असेल तर बरेचदा अट घातली जाते की, कौटुंबिक हिंसाचार व अन्य प्रकरणे मागे घे. कोर्टकचेरीतून सुटका हवी असल्याने महिला अट मान्य करतात. मात्र, आयपीसी ४९८ (अ) अंतर्गत दाखल केलेला गुन्हा मागे घेतला जाऊ शकत नाही म्हणून महिलेला खोटी साक्ष द्यावी लागते आणि आपल्यावर अत्याचार झाला नाही. रागाच्या भरात आपण अशी तक्रार केली, असे न्यायालयाला सांगते. आपोआपच नवरा सुटतो. त्याचा अर्थ महिलेने कायद्याचा गैरवापर केला असा होत नाही. रोजंदारीवर काम करणाऱ्या पुरुषांच्यामध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे, असे अभ्यासातून दिसते. त्यासाठी दारू पिणे, कामावरील तणाव अशा बाबी कारणीभूत आहेत. 

अतुल आणि पुनीतच्या निमित्ताने पुरुषांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न चर्चेला आला आहे. त्यासाठी जुन्या बुरसटलेल्या रुढी सोडून लिंगभेदाच्या पलीकडे जावे लागेल. तरच स्वस्थ कुटुंब निर्माण होईल. उपाययोजना म्हणून दाम्पत्याने मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारCourtन्यायालय