शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
4
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
5
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
6
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
7
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
8
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
9
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
10
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
11
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
12
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
13
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
14
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
15
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
16
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
17
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
18
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
19
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
20
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...

विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात

By रेश्मा शिवडेकर | Updated: May 26, 2024 07:39 IST

नीट, जेईई, एमएचटी-सीईटीची कटकट नको म्हणून आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या पारंपरिक अभ्यासक्रमांमधील करिअरच्या वाटा चोखाळणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सीईटी देणे बंधनकारक झाले आहे.

रेश्मा शिवडेकर, विशेष प्रतिनिधी

सीईटी म्हटले की मेडिकल, इंजिनीअरिंग, फार्मसी, लॉ, एमबीए अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी नजरेसमोर येत; परंतु मार्च २०२२ पासून आलेल्या ‘सीयुईटी’ (सेंट्रल युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट) नामक सीईटीमुळे पदवी अभ्यासक्रमांसाठीही सीईटी बंधनकारक ठरली आहे. आता बीबीए, बीसीए अशा अभ्यासक्रमांना व्यावसायिक ठरवून त्यांचेही प्रवेश सीईटीतून केले जाणार आहेत. थोडक्यात नीट, जेईई, एमएचटी-सीईटीची कटकट नको म्हणून आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या पारंपरिक अभ्यासक्रमांमधील करिअरच्या वाटा चोखाळणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सीईटी देणे बंधनकारक झाले आहे.  बोर्डांच्या अभ्यासक्रमातील तफावतीमुळे जेईई, नीटसारख्याच नव्हे, तर एमएचटी-सीईटीसारख्या स्पर्धात्मक परीक्षांना क्लासशिवाय सामोरे जाताच येत नाही, अशी भावना विद्यार्थी-पालकांमध्ये तयार झाली आहे.

यंदा २४ लाखांच्या आसपास विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्रीय स्तरावर होणाऱ्या नीट सीईटीला बसले होते. एमएचटी-सीईटीच्या परीक्षार्थींची २०२१ मध्ये पाच लाखांच्या आसपास असलेली संख्या यंदा ७.२५ लाखांवर गेली आहे. राज्यातील मॅनेजमेंट कोर्सेसकरिता १.५२ लाख (गेल्या वर्षी १.३० लाख) विद्यार्थ्यांनी एमबीए-सीईटी दिली. राज्याचा सीईटी सेल ३८ अभ्यासक्रमांसाठी २० हून अधिक सीईटींचे आयोजन करतो. त्यात यंदा बीबीए, बीसीए, एएनएम, जीएनएम यांच्या सीईटींची भर पडली आहे.  

कॉलेज जीवनच संपुष्टात

भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे इंटिग्रेटेड, टायअप असे नवनवीन शब्द शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रचलित होऊ लागले. कोचिंग क्लासेसच्या या समांतर व्यवस्थेने विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे कनिष्ठ महाविद्यालयीन जीवनच संपुष्टात आणले. कॉलेजातील अभिनय, लेखन, क्रीडा आदी व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या उपक्रमांमधील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग या संस्कृतीने पूर्णपणे थांबवला. ज्या महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ असायची, ती संपली. ज्युनिअर कॉलेजेस केवळ प्रात्यक्षिकांपुरती उरली.

क्लास चालकांचेच कॉलेजेस

आता तर क्लास चालकांनीच आपल्या क्लासेसची कनिष्ठ महाविद्यालये करून टाकली आहेत. पदवीच्या इतरही अभ्यासांच्या प्रवेशासाठी सीईटी बंधनकारक ठरू लागल्याने ही समांतर व्यवस्था आणखी फोफावणार आहे. या सगळ्यात शालेयकडून पदवी शिक्षणाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची पायाभरणी करणारा उच्च माध्यमिक स्तरावरील पाया ढासळण्याच्या मार्गावर आहे.

सीईटीचे ३० वर्षांतील फलित काय?

सीईटीने बोर्डाच्या परीक्षेचे महत्त्व संपले असले तरी पात्रतेपुरते बारावीचे गुण आवश्यक असल्याने या परीक्षेकडे कानाडोळा करता येत नाही. त्यातून नाही मनासारखे कॉलेज मिळाले तर पदवी शिक्षणाचा पर्याय खुला राहतो. यामुळे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतींचा विद्यार्थ्यांवरील ताण सीईटीनंतर वाढल्याचे दिसून येते. थोडक्यात, सीईटीचे ३० वर्षांतील फलित काय, याचा विचार हाेण्याची गरज आहे.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा