शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

मुक्काम पोस्ट महामुंबई: काेणाची मुलं नशेबाज होण्याची वाट पाहताय?

By अतुल कुलकर्णी | Updated: October 30, 2023 07:21 IST

अंधेरीतील भटारवाडी व्यसनमुक्ती केंद्रात दीडशे तरुण रोज येतात, अशी माहिती समोर आली आहे. हे केवळ एका केंद्राचे आकडे झाले.

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

एकट्या मुंबईत गेल्या पाच वर्षांत पाच हजार कोटींचे ड्रग्ज, नवी मुंबईत तीन वर्षांत ४६१ किलो अमली पदार्थ, ठाणे, नवी मुंबई, नालासोपारा, पालघर या भागात मिळून गेल्या दोन वर्षांत ५०० कोटींचा ड्रग्सचा साठा त्या-त्या ठिकाणच्या पोलिसांनी जप्त केला. मात्र पोलिस पोहोचू शकले नाहीत, त्या ठिकाणच्या नशेचा बाजार कल्पनेपलीकडचा आहे. कोणते ड्रग्ज कुठे मिळते? त्या ठिकाणांची नावे सर्रास सगळ्यांना माहिती असतात. नशेचे सामान ऑनलाइन मागविण्यापर्यंत लोकांची मजल गेली आहे. डार्क वेब नेटवर्कच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नशेचा धंदा केला जातो, हे समोर आले आहे. काहींनी पोस्ट ऑफिसच्या सेवेमार्फत परदेशातून अमली पदार्थ मागविले. इतका सगळा खुला बाजार सुरू असताना, पोलिसांना तो कळत नाही, असे कोणी म्हणत असेल तर तो सगळ्यात मोठा विनोद आहे. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांची केली जात होती. मुंबई पोलिसांनी अनेक महाकठीण गुन्हे उघडकीस आणले. पोलिस दलात एक से बढकर एक उंचीचे पोलिस अधिकारी होऊन गेले. मात्र पोलिस दलात नव्याने सहभागी होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाच इतिहास किती दिवस सांगायचा..?

‘लोकमत’ने रविवारच्या अंकात ड्रग्ज पुरवठा करणारी केंद्रे कोणकोणत्या भागात आहेत त्याची यादीच छापली आहे. नालासोपारा हा नायजेरियन लोकांच्या गैरकृत्याचा अड्डा बनला आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी तिथे बऱ्यापैकी नियंत्रण आणले. तरीही ज्या गतीने त्या संपूर्ण परिसरात ड्रग्जचा बाजार सुरू आहे, तो पाहिला तर झालेली कारवाई काहीच नाही असे म्हणण्याइतपत भीषण परिस्थिती आहे. 

पोलिसांनी ठरवले तर या सगळ्या ठिकाणांवर दोन दिवसांत धाडी टाकून नशेचा बाजार उद्ध्वस्त करता येईल. मात्र या व्यवहारात खालून वरपर्यंत अनेकांचे हात नशिले झाले आहेत. त्यामुळे हा गोरख धंदा थांबवायचा कोणी आणि कधी? हा प्रश्न केवळ मुंबईकरांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, सांगली इथपर्यंत अमली पदार्थ बनविण्याचे कारखाने लोकांनी थाटले. राजकीय आणि प्रशासकीय आशीर्वाद असल्याशिवाय एवढ्या बेधडक हे व्यवहार चालूच शकत नाहीत. एकेकाळी मुंबईत दाऊद आणि अरुण गवळी यांचे साम्राज्य होते. या टोळी युद्धात अनेक एन्काउंटर झाले. काही अधिकारी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून नावारूपाला आले. गुन्हेगारी टोळ्यांनी  काही पोलिस अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्या विरोधी टोळीतल्या लोकांच्या सुपाऱ्या दिल्या. भरदिवसा मुंबईत बिल्डर, व्यापारी, सिनेक्षेत्रातील लोकांचे गोळ्या घालून खून करण्यात आले. त्यातून मोठा पैसाही अनेकांनी गोळा केला. मात्र आता गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. नशेचा बाजार मोबाइलच्या एका क्लिकवर उपलब्ध आहे. कोण, कुठे, कशी नशेची फॅक्टरी चालवत आहे, याचा कसलाही अंदाज येणार नाही, इतके या धंद्याचे स्वरूप बदलले आहे.

या नशेची लत लागून तरुण पिढी पूर्णपणे बरबादीच्या वाटेवर जाऊ द्यायची की नाही, हे ठरवण्याची वेळ निघून गेल्यात जमा आहे. काही अंधुक आशेचे कवडसे  दिसतात. त्याचा आधार घेऊन वेळीच या जीवघेण्या व्यवहारांवर बंधने आणली नाहीत तर तरुण पिढी पूर्णपणे नशेच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळेल. कोणाचीही मुलं त्यातून सुटणार नाहीत. मी राजकारणी किंवा आम्ही आयएएस, आयपीएस आहोत. हिंदी इंडस्ट्रीज मी शहेनशाह आहे, मी आघाडीचा सुपरस्टार आहे...आमची मुलं नशा करणार नाहीत किंवा केला तरी त्यांना काही फरक पडणार नाही...असा फुकाचा दावा करणाऱ्यांचीच मुले नशेत वाहवत गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. मुंबईत रात्री बारा ते पहाटे तीन या वेळात जर डिस्को थेक, पब यामध्ये चक्कर मारली तर हा नशेचा धंदा कोणत्या थराला गेला आहे हे जवळून पाहता येईल. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी वेश पालटून अशा ठिकाणी सरप्राइज व्हिजिट केली पाहिजे.

त्यांच्यासमोर त्यांचीच मुलं किंवा त्यांचे मित्र येऊ नयेत म्हणजे मिळवली. आम्ही आणखी किती काळ हे सहन करणार आहोत? कोणाची मुलं नशेच्या दुनियेत स्वतःला हरवून बसण्याची आम्ही वाट पाहत आहोत..?

एखादी इमारत पडली किंवा एखादा पूल पडला तर काही जीव जातील आणि आर्थिक नुकसान होईल. मात्र नशेचा हा धंदा थांबविला नाही तर एक अख्खी पिढी बरबाद होईल. काही देशांमध्ये मुलं जन्माला घालण्यासाठी वेगवेगळ्या सवलती दिल्या जात आहेत. कारण त्यांना त्यांच्या देशाचे भवितव्य अंध:कारमय दिसत आहे. तरुण पिढीच नसेल तर देश आणि देशाचा वारसा पुढे नेणार कोण? हा प्रश्न जगात अशा अनेक देशांना भेडसावत आहे. सुदैवाने भारतात ही परिस्थिती नाही. सगळीच तरुण पिढी नशेच्या दुनियेत मदमस्त झाली, असेही नाही. ही सगळ्यात मोठी आशेची व जमेची बाजू आहे. पण हा मोह भयंकर आहे. सहज गंमत म्हणून मारलेला झुरका आयुष्याचा धूर कधी काढेल कळणारदेखील नाही.

अंधेरीतील भटारवाडी व्यसनमुक्ती केंद्रात दीडशे तरुण रोज येतात, अशी माहिती समोर आली आहे. हे केवळ एका केंद्राचे आकडे झाले. मुंबईसह राज्यभरात अशी अनेक केंद्रे आहेत. राज्यभरात व्यसनमुक्तीसाठी किती तरुण येतात ही आकडेवारी कळाली तर धक्का बसेल, अशी स्थिती आहे. त्याशिवाय जे भीतीपोटी, सामाजिक दडपणाखाली येऊन व्यसनमुक्ती केंद्रात जातच नाहीत. आपल्या मुलाला अमली पदार्थांचे व्यसन लागले आहे, हे सांगायला ज्या आईबापांना लाज वाटते ते आपल्या मुलांना उपचारासाठी नेतच नाहीत. अनेक तरुण आपले व्यसन आई-वडिलांपासून लपवून ठेवतात. व्यसनाला पैसे हवेत म्हणून जन्मदात्या आई-बापाचा खून करण्याच्याही घटना मुंबईत नव्या नाहीत. अशांची संख्या काढली तर आपण कसला समाज घडविण्याच्या गोष्टी करत आहोत, असा प्रश्न पडेल. अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढी बरबाद होण्यापासून वाचवायची असेल तर सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील. नाही तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत.

टॅग्स :Drugsअमली पदार्थMumbaiमुंबई