शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
3
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
4
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
5
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
6
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
7
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
10
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
11
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
12
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
13
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
14
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
15
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
16
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
17
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
18
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
19
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
20
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला

भाषेचे मूल्ये जपा

By admin | Updated: January 1, 2015 02:49 IST

काय कमावले नाही याची गणती करताना प्रकर्षाने ध्यानात येणारी बाब ही, की दृक-श्राव्य माध्यमात ‘उच्चार’लेल्या शब्दाला महत्त्वच दिले जात नाही.

मुद्रित माध्यमांनी गेल्या काही वर्षांत काय काय गमावले व दृक-श्राव्य माध्यमांनी जे कमवायला पाहिजे होते, त्यातले काय कमावले नाही याची गणती करताना प्रकर्षाने ध्यानात येणारी बाब ही, की दृक-श्राव्य माध्यमात ‘उच्चार’लेल्या शब्दाला महत्त्वच दिले जात नाही. तंत्रज्ञानाव्यतिरिक्त भाषाव्यवहारादी प्रशिक्षण देण्याची गरजच तेथे वाटत नसावी. मराठीचे पदोपदी शब्दाचे खून पाडण्याचेच दु:साहस तेथे केले जाते. कित्येकदा ‘मैदान’ स्त्रीलिंगी, तर ‘जागा’ पुल्लिंगी !खित शब्दाचेही महत्त्व कमी झाले आहे. पूर्वी ‘छापण्यात आले आहे’ हा पुरावा ठरत असे. आता छापले गेले म्हणजे ते सत्य असणार, यावर वाचकाचा विश्वास उरलेला नाही. सत्याला बगल देण्याच्या माध्यमांच्या नव्या सवयीमुळे असे झाले आहे, हे निश्चित. अर्धसत्य - प्रसंगी असत्य सांगून सत्याला अनेक बाजू असतात, हे बिंबवण्याचा प्रयत्न क्षीण ठरतो. अर्धसत्य, असत्य मोठ्याने ओरडून व वाचकांचा त्यावर विश्वास आपल्याला समाजमनाचा आरसा म्हटले आणि आपल्या प्रकाशित वृत्तपत्राची नि:स्पृह, निर्भीड अशी जाहिरात केली, तरी ते गुण त्या वृत्तपत्राला वाचक बहाल करतीलच असे नाही. वाचक पूर्वीसारखा निष्पाप, भोळसट राहिला नसून तो संपादकवर्गापेक्षा अधिक हुशार, बहुश्रुत असतो. त्यामुळे पूर्वीच्या संपादकाप्रमाणे एखाद्या चबुतऱ्यावर उभे राहून जगाला संदेश देत राहणाऱ्या संपादकापेक्षा मित्रत्वाच्या नात्याने काही सांगणाऱ्या संपादकावर तो अधिक विश्वास ठेवील, असे मला वाटते. छापील शब्दांचे वजन कमी होणे म्हणजे संपादकाची विश्वासार्हता कमी होणे़ वृत्तपत्राची विश्वसनीयता धोक्यात येणे. आजच्या माध्यमांना अस्तित्वाची निकराची लढाई खेळावी लागत असल्याने विश्वसनीयतेसारख्या अमूर्त बाबींचा विचार करण्यास सवड नाही. या लढाईत अनेक वृत्तपत्रांचे बळी जातील, तेव्हा उरलेल्या थोड्याथोडक्या वृत्तपत्रांना विश्वसनीयतेचा विचार करावाच लागेल. पत्रकारितेत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना आज विश्वसनीयता जोपासण्यासाठी काही मूल्यांची जपणूक आवश्यक आहे. त्याची सुरुवात वृत्तपत्रीय भाषेकडे लक्ष देऊन करता येईल. त्यासाठी प्रमाण मराठी भाषेचा आग्रही वापर व नव्या पत्रकारांसाठी ‘शैली-पुस्तिका’ निर्मिती उपयुक्त ठरेल. मराठीची आबाळ होत असल्याची आवई उठवण्यासाठी इंग्रजी भाषेच्या आक्र मणाचा मुद्दा सहजी हाती येतो, पण ही आत्मवंचना आहे. मराठी भाषकांचे इंग्रजीवर प्रभुत्व आहे, असे त्यातून ध्वनित होते. वास्तव तसेही नाही. इंग्रजीमुळे मराठी बिघडली आणि इंग्रजी तीही कशी आणि कितपत येणार, असे काहीसे मराठी भाषकांचे झाले आहे. मातृभाषा मराठीकडे होणाऱ्या दुर्लक्षाचे कारण इंग्रजीचे आक्र मण नाही, तर एकंदर भाषा व्यवहाराबद्दलची अनास्था आहे. मराठी पत्रकारांच्या आबाळीमुळे सभ्य आणि असभ्य शब्दांची सरमिसळ बिनदिक्कत होत आहे़ ‘विश्वासार्यता (=विश्वासार्हता)’, ‘गर्व वाटतो (=अभिमान वाटतो)’, असे चुकीचे शब्दप्रयोगही रूढ होत आहेत. ते दुरु स्त करण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे. निदान त्याची सुरु वात या वर्षापासून व्हावी, ही आशा. - अरु ण टिकेकरज्येष्ठ साहित्यिक