शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साक्षीचे कडवे बोल

By admin | Updated: September 13, 2016 00:31 IST

अन्य कोणी बोलण्यापेक्षा खुद्द साक्षीच हे बोललीे ते बरे झाले. अन्यथा रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत ज्यांची कामगिरी चमकदार झाली त्या सर्वच महिला स्पर्धकांचे देशभर होणारे

अन्य कोणी बोलण्यापेक्षा खुद्द साक्षीच हे बोललीे ते बरे झाले. अन्यथा रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत ज्यांची कामगिरी चमकदार झाली त्या सर्वच महिला स्पर्धकांचे देशभर होणारे कौतुक सोहळे पाहून आज साक्षी जे बोलली तेच अन्य कोणी तिऱ्हाईत व्यक्ती बोलली असती तर तिच्यावर स्त्रीद्वेष्टेपणापासून क्रीडा विरोधक असण्यापर्यंतचे सारे आरोप केले गेले असते. वास्तविक पाहाता साक्षी जे काही बोलली त्याला कडवे बोल असेच म्हणावे लागेल. महिलांच्या मल्लविद्येत या साक्षी मलिकने कांस्य तर बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूने रौप्य पदक प्राप्त केल्याने विविध राज्य सरकारे आणि अन्य काही व्यक्ती व संघटना यांच्याकडून होणाऱ्या कौतुकाचा आदर करतानाच विजयी झालेल्यांवर हा जो काही भडिमार होतो आहे, त्यांना जे समर्थन दिले जात आहे, तसेच ते होतकरु खेळाडूंना दिले गेले तर त्याचा क्रीडा स्पर्धांमधील संपूर्ण देशाच्या कामगिरीवर चांगला परिणाम घडून येऊ शकेल असे मत साक्षीने व्यक्त केले आहे. तिची जी अपेक्षा आहे, तसे प्रत्यक्षात होत मात्र नाही. एखाद्या विशिष्ट क्रीडा प्रकारात कुणी होतकरु खेळाडू मोठी महत्वाकांक्षा बाळगून असेल तर त्याची टिंगल टवाळी वा अवहेलनाच केली जाते. खुद्द साक्षीने त्याचा अनुभव घेतला आहे. कुस्ती किंवा मल्लविद्या हा खास पुरुषी प्रांत अशी वेडगळ कल्पना घेऊन वावरणाऱ्या अनेक लोकांनी साक्षीशी साधे संभाषण करणेदेखील टाळण्याची भूमिका घेतली होती आणि तिला पदक मिळाल्यावर मात्र तेच लोक तिच्याकडे धावत गेले. अर्थात सामान्यांचे घटकाभर बाजूला ठेवल्यास सरकारची आणि सरकारी धोरणांची बाबदेखील फार वेगळी नसते. आॅलिम्पिक किंवा तत्सम आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये स्पर्धा करु शकणारे खेळाडू आभाळातून टपकत नसतात. ते तयार व्हावे आणि करावे लागतात व त्यासाठी त्यांना हेरावे लागते. देशातील काही मोजकी राज्ये या दृष्टीने थोडे फार प्रयत्न करताना दिसतात. शालेय, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंना ही राज्ये विशिष्ट रोख रक्कम देतात आणि त्यांच्या पुढील प्रशिक्षणाची सोय करतात. पण याचे प्रमाण खूपच अल्प आहे. परंतु तेवढेदेखील बव्हंशी राज्ये करीत नाहीत. वस्तुत: असा निर्णय करण्यासाठी क्रीडा धोरण निश्चित करणे व त्यासाठी समित्या नेमणे याची काहीही गरज नाही. नौकानयन स्पर्धेत रिओमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दत्तू भोकनळ याचाही महाराष्ट्र सरकारने नुकताच थैली देऊन सत्कार केला. पण सरावाच्या योग्य वेळी तो वंचितच राहिला होता. अर्थात होतकरु खेळाडूला साह्य प्राप्त करुन घेण्यासाठी क्रीडा गुणांपेक्षा आमदार-खासदाराची शिफारस जर मोलाची व निर्णायक ठरत असेल तर साक्षीचे बोल पालथ्या घड्यावरचे पाणीच ठरणार. .