शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

साक्षीचे कडवे बोल

By admin | Updated: September 13, 2016 00:31 IST

अन्य कोणी बोलण्यापेक्षा खुद्द साक्षीच हे बोललीे ते बरे झाले. अन्यथा रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत ज्यांची कामगिरी चमकदार झाली त्या सर्वच महिला स्पर्धकांचे देशभर होणारे

अन्य कोणी बोलण्यापेक्षा खुद्द साक्षीच हे बोललीे ते बरे झाले. अन्यथा रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत ज्यांची कामगिरी चमकदार झाली त्या सर्वच महिला स्पर्धकांचे देशभर होणारे कौतुक सोहळे पाहून आज साक्षी जे बोलली तेच अन्य कोणी तिऱ्हाईत व्यक्ती बोलली असती तर तिच्यावर स्त्रीद्वेष्टेपणापासून क्रीडा विरोधक असण्यापर्यंतचे सारे आरोप केले गेले असते. वास्तविक पाहाता साक्षी जे काही बोलली त्याला कडवे बोल असेच म्हणावे लागेल. महिलांच्या मल्लविद्येत या साक्षी मलिकने कांस्य तर बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूने रौप्य पदक प्राप्त केल्याने विविध राज्य सरकारे आणि अन्य काही व्यक्ती व संघटना यांच्याकडून होणाऱ्या कौतुकाचा आदर करतानाच विजयी झालेल्यांवर हा जो काही भडिमार होतो आहे, त्यांना जे समर्थन दिले जात आहे, तसेच ते होतकरु खेळाडूंना दिले गेले तर त्याचा क्रीडा स्पर्धांमधील संपूर्ण देशाच्या कामगिरीवर चांगला परिणाम घडून येऊ शकेल असे मत साक्षीने व्यक्त केले आहे. तिची जी अपेक्षा आहे, तसे प्रत्यक्षात होत मात्र नाही. एखाद्या विशिष्ट क्रीडा प्रकारात कुणी होतकरु खेळाडू मोठी महत्वाकांक्षा बाळगून असेल तर त्याची टिंगल टवाळी वा अवहेलनाच केली जाते. खुद्द साक्षीने त्याचा अनुभव घेतला आहे. कुस्ती किंवा मल्लविद्या हा खास पुरुषी प्रांत अशी वेडगळ कल्पना घेऊन वावरणाऱ्या अनेक लोकांनी साक्षीशी साधे संभाषण करणेदेखील टाळण्याची भूमिका घेतली होती आणि तिला पदक मिळाल्यावर मात्र तेच लोक तिच्याकडे धावत गेले. अर्थात सामान्यांचे घटकाभर बाजूला ठेवल्यास सरकारची आणि सरकारी धोरणांची बाबदेखील फार वेगळी नसते. आॅलिम्पिक किंवा तत्सम आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये स्पर्धा करु शकणारे खेळाडू आभाळातून टपकत नसतात. ते तयार व्हावे आणि करावे लागतात व त्यासाठी त्यांना हेरावे लागते. देशातील काही मोजकी राज्ये या दृष्टीने थोडे फार प्रयत्न करताना दिसतात. शालेय, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंना ही राज्ये विशिष्ट रोख रक्कम देतात आणि त्यांच्या पुढील प्रशिक्षणाची सोय करतात. पण याचे प्रमाण खूपच अल्प आहे. परंतु तेवढेदेखील बव्हंशी राज्ये करीत नाहीत. वस्तुत: असा निर्णय करण्यासाठी क्रीडा धोरण निश्चित करणे व त्यासाठी समित्या नेमणे याची काहीही गरज नाही. नौकानयन स्पर्धेत रिओमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दत्तू भोकनळ याचाही महाराष्ट्र सरकारने नुकताच थैली देऊन सत्कार केला. पण सरावाच्या योग्य वेळी तो वंचितच राहिला होता. अर्थात होतकरु खेळाडूला साह्य प्राप्त करुन घेण्यासाठी क्रीडा गुणांपेक्षा आमदार-खासदाराची शिफारस जर मोलाची व निर्णायक ठरत असेल तर साक्षीचे बोल पालथ्या घड्यावरचे पाणीच ठरणार. .