शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

बिलावल भुत्तो, तुमची जीभ आवरा !

By विजय दर्डा | Updated: December 19, 2022 08:08 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी वापरलेली भाषा केवळ उद्धटच नव्हे, नीचपणाची हद्द होय!

विजय दर्डा,चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड,लोकमत समूहभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी ज्या शब्दांचा वापर केला ते इतके घाणेरडे आणि नीच होते की मी त्यांचा उल्लेखही करू शकत नाही. पाकिस्तानचा कुणी नेता भारताबद्दल काही चांगले बोलेल अशी अपेक्षाच नसावी, हे मला कळते; पण तिथल्या लोकप्रतिनिधीचे विचार इतके नीच असावेत? बिलावल जे बोलले, त्यामुळे प्रत्येक भारतीय दुखावला गेलेला आहे. त्यांना एवढेच सांगावे म्हणतो, आपली लायकी ओळखा आणि आपल्या जिभेला लगाम घालायला शिका!

बिलावल, तुमची आई बेनझीर भुत्तो आणि आजोबा झुल्फिकार अली भुत्तो यांनी कायम शालीन भाषा केली हे तुम्ही विसरला आहात. त्यांच्या घरात तुमच्यासारखा कुलकलंक निपजेल अशी त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल, त्यांना किती क्लेश होत असेल? एवढे लक्षात ठेवा की, तुम्ही ज्या देशाचे परराष्ट्रमंत्री आहात, तो देश इतर देशांनी फेकलेल्या तुकड्यांवर गुजराण करतो आहे. हे तुकडे बंद झाले तर तुमच्या देशात हाहाकार माजेल. आपल्या लोकांची पोटे भरण्यासाठी तुमच्याकडे चवन्नी नाही, हे अख्ख्या जगाला ठाऊक आहे. एक कर्ज चुकवण्यासाठी तुम्ही दुसरे कर्ज घेता. कधी अमेरिकेच्या मांडीवर जाऊन बसता, तर कधी चीनच्या मांडीला चिकटता. तुमच्या नेत्यांना मी दोष तरी कसा देऊ? कारण तुमच्या इथली सत्ता खरे तर लष्कराच्या ताब्यात.

लष्कराच्या मनात आले तर ते तुमच्या नेत्यांना झुरळासारखे उचलून फेकून देतात. तुमच्या देशात किती लष्करी राजवटी आल्या आणि किती काळ खरी लोकशाही होती याचा जरा हिशोब लावून पाहा. तुमच्या आजोबांना याच लष्करशहांनी फासावर लटकवले आणि तुमच्या आईचीही हत्या केली, हे तुम्ही विसरला आहात का? तुमच्या विचारांचा धिक्कार करावा तेवढा थोडा ! बिलावल, तुम्ही कधी खऱ्या स्वातंत्र्याची चव चाखली आहे? पाकिस्तानमधल्या तुमच्यासारख्या नेत्यांची ही अशी दुर्दशा असताना तुम्ही जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशाच्या सर्वांत लोकप्रिय पंतप्रधानांविषयी घाणेरडे बोलताहात यावरून तुमच्या बौद्धिक दिवाळखोरीचेच दर्शन होते. बिलावल, तुम्ही तुमचे समकालीन, तुमचे पूर्वसुरी जेव्हा काश्मीरच्या गोष्टी करता, तेव्हा मला खरे तर तुम्हा सगळ्यांची कीव येते. तुम्ही कधी आमच्या काश्मीरच्या भूमीला समजून घेण्याचा प्रयत्न तरी केलाय का? मुघल बादशाह जहांगीर जेव्हा पहिल्यांदा काश्मीरमध्ये गेला तेव्हा त्याने म्हटले होते'गर फिरदौस बर रु ए जमीं अस्त,हमी अस्त ओ हमीं ओ हमीं अस्त'.

याचा अर्थ जर जमिनीवर स्वर्ग कुठे असेल तर तो येथेच आहे, येथेच आहे, येथेच आहे!

आणि तुम्ही? पाकिस्तानच्या लष्करशहांनी या स्वर्गाचा नरक व्हावा यासाठी हरप्रकारचे प्रयत्न केले; पण तुमच्या तुकड्यांवर गुजराण करणारे दहशतवादी कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत. भारतीय सैन्याची ताकद तुमच्या देशाने १९६५, १९७१, १९९९ मध्ये पाहिली आहे. त्यावेळी तुमची बेइज्जती झाली होती. १९७१ साली तुमचे ९३ हजार सैनिक शरण आले होते हे तुमचे पाकिस्तानी नेते विसरलेले दिसतात.

पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया चालल्या असतील तर तुम्ही बेशरमपणे भारतावर आरोप करत? बिलावल असे आरोप करताना पहिल्यांदा हा तरी विचार करा की संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या १२६ खतरनाक दहशतवाद्यांच्या यादीतले २७ दहशतवादी पाकिस्तानमध्ये राहतात. दिल्ली, मुंबई, पुलवामा, पठाणकोटपासून ते न्यू यॉर्क, लंडन अशा असंख्य शहरांत तुम्ही पाळलेल्या दहशतवाद्यांनी रक्तपात घडविले आहेत. तुम्ही म्हणता, दहशतवादाचे सर्वाधिक घाव पाकिस्तानने झेलले आहेत. घरात साप पाळला तर कधी ना कधी तो तुम्हाला चावणारच! तो काय फक्त शेजारी देशाला चावत राहील का? मेहबूबा हीना रब्बानी खार तुमच्या परराष्ट्रमंत्री होत्या तेव्हा साप चावण्याची ही गोष्ट हिलरी क्लिंटन यांनी थेट त्यांनाच ऐकवली होती, विसरलात? लख्खी, हाफीज सईद, मसूद अजहर, साजिद मीर आणि दाऊद इब्राहिम यांच्यासारख्या पिशाच्चांना पाळणारे तुम्ही पाकिस्तानी नेते कोणत्या तोंडाने भारतावर आरोप करता? लष्करशहांसोबत तुम्ही पाकिस्तानी नेत्यांनी इस्लामचा ठेका घेऊन ठेवला आहे त्याची तर गोष्टच करू नका.

तुमच्या देशाची जेवढी लोकसंख्या आहे. जवळजवळ तितकेच मुसलमान आमच्या देशात राहतात. भारतामध्ये राहणारे मुस्लीम स्वस्थ आणि शांततापूर्ण जीवन जगतात. अवादात्मक घटना तर जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात घडत असतात. पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा तेथे अल्पसंख्यांकांची लोकसंख्या २३ टक्के होती. आता ती ३.५ टक्के इतकीच उरली आहे. हे माहिती आहे ना तुम्हाला? तुम्ही बांगलादेशी मुस्लिमांशी कृरपणे वागलात. अहमदिया समुदायाशी तर आजही क्रौर्याने वागता. हे तुमचे चरित्र आहे आणि भारतात? इथे अल्पसंख्यांकांच्या संख्येत वाढच होत आलेली आहे.

बिलावल, तुम्ही असा वा झरदारी या कोणी लष्करप्रमुख, तुमचे दुःख मी समजू शकतो. हिंदुस्थानला नष्ट करण्याचा हरसंभव प्रयत्न तुम्ही करत असता आणि स्वतःच नष्ट होत राहाता. हिंदुस्थान जगातली पाचवी आर्थिक शक्ती झाला आहे. लवकरच आम्ही तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू. जी २० चे अध्यक्षपद, तसेच संयुक्त राष्ट्र परिषदेचे एक वर्षासाठीचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यामुळे तुमचा मत्सर जागृत झालेला दिसतो. पाकिस्तान इतका रसातळाला का जातो आहे याचा विचार तुम्ही सारे नेते एकत्र बसून करत का नाही?

थोडीफार लाज शिल्लक असेल तर तुमच्या नागरिकांचे हाल एकदा डोळे उघडून पाहा. अन्नधान्य, पाणी, वीज, औषधे, रोजगार यासाठी लोक टाचा घासत आहेत. शेतकरी आणि तरुण उद्ध्वस्त झाले आहेत. तुमचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना हे समजले होते. पाकिस्तानसाठी ते एकमेव भरवशाचे गृहस्थ होते; पण तुम्ही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलात! जरा ठिकाणावर येण्याचा प्रयत्न करा! हिंदुस्थानवर टीका करताना तुमचीच जीभ खराब होते आहे 'सर्वे भवन्तु सुखिन: असे म्हणणारी आमची संस्कृती आहे. आम्ही पुढे ज्ञात आहात आणि जात सह तुमच्या सडक्या जिभेमुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही, इतके लक्षात असू द्या.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी