शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोभ असावा ही विनंती

By admin | Updated: July 1, 2016 04:55 IST

घराबाहेर पडताना जातो असे म्हणू नये तर येतो असे म्हणावे. प्रतीकात्मक अर्थाने जाणे म्हणजे अंधार तर येणे म्हणजे प्रकाश.

घराबाहेर पडताना जातो असे म्हणू नये तर येतो असे म्हणावे. प्रतीकात्मक अर्थाने जाणे म्हणजे अंधार तर येणे म्हणजे प्रकाश. गेल्या वर्षी या सदरातून आपला निरोप घेताना येतो नमस्कार असे म्हटले होते, आणि खरोखरच आता पुन्हा एकदा त्या वाटेने आपल्यापर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे.माणूस हा मुळात प्रकाशपूजक. त्याच्या जीवनात अंधाराला स्थान नाही. नकारात्मक विचार करणे तो टाळतो. निराशा, वैफल्य, पराभव यापेक्षा आशा, उमेद, नवनवी आव्हाने यांना सामोरे जाण्यात त्याला पुरु षार्थ वाटतो.माणसाचं वय कितीही झालं, तो कितीही दु:खी असला, आजारी असला तरी त्याला जगावंसं वाटतं. रात्री झोपताना तो दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाचेच स्वप्न पाहात असतो. पुन्हा नवी पहाट होईल, फुले फुलतील, पक्षी किलबिलाट करतील, पुन्हा कडक चहाची तल्लफ येईल, पुन्हा एकदा नव्या जोमाने नवीन दिवसाला भिडावे लागेल असेच विचार त्याच्या मनात येत असतात.अजून येतो वास फुलांनाअजून माती लाल चमकते,खुरट्या बुंध्यावरी चढोनीअजून बकरी पाला खाते...ही मर्ढेकरांची प्रसिद्ध कविता. जीवनाच्या उत्सवाची पालवी माणसाच्या मनातील मोहाच्या बकरीला सतत साद घालत राहते आणि माणूसही मग त्या सादेला प्रतिसाद देत राहतो. जीवन जोवर आभरभरुन देत आहे तोवर आपण त्याचा आस्वाद घेतला पाहिजे, प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला पाहिजे, पुन्हा नव्या कामासाठी स्वत: ला वाहून घेतले पाहिजे असे त्याला वाटत राहते. ही ओढच पुन्हा एकदा मला तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे.खरे तर लेखकाचे जीवन खूप कष्टाचे. तीव्र स्वरूपाचे बौद्धिक आणि मानसिक ताण सांभाळत रोज त्याला कष्टांचा नवा कातळ फोडावा लागतो. ते खोदकाम नेटाने आणि चवीने वाचकांसमोर ठेवावे लागते. आणि इतके करूनही त्याचे कौतुक होईल, त्याला मान मरातब, पैसा मिळेलच याची खात्री नाही. या क्षेत्रातही स्पर्धा प्रचंड. व्ही. एस. नायपॉल यांनी म्हटले आहे की, लेखकाच्या कीर्तीचे आयुष्य किती तर फक्त एक तासाचे. नव्या तासाला नवा लेखक जुन्याच्या छातीवर पाय देऊन उभा राहिलेला असतो. आणि तरीही पुन्हा एकदा मी तुमच्या समोर आलो आहे. कारण लोकमताचा नम्र स्वीकार, तुमचा प्रतिसाद. लेख प्रसिद्ध झाला की दिल्लीपासून गल्लीपर्यंत फोन सुरु व्हायचे. इमेल, एसएमएस, पत्रे यायची. सूचना, सल्ले, नवे विषय, कार्यक्रमाची निमंत्रणे सुरू व्हायची. चाहत्यांनी केलेले कौतुक हा लेखकाचा प्राणवायू. तो मिळाला की जगायला आणखी काय हवे ?-प्रल्हाद जाधव