शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

सौर औष्णिक ऊर्जा

By admin | Updated: January 9, 2016 03:12 IST

गेल्याच महिन्यात पॅरिसमध्ये जागतिक हवामान बदल परिषद पार पडली. त्या परिषदेत जागतिक तपमान वृद्धीला आळा घालण्यासाठी काही ठोस पावले

गेल्याच महिन्यात पॅरिसमध्ये जागतिक हवामान बदल परिषद पार पडली. त्या परिषदेत जागतिक तपमान वृद्धीला आळा घालण्यासाठी काही ठोस पावले उचलण्यासंदर्भात करार झाला. त्या करारामुळे जगातील प्रत्येक राष्ट्रावर कर्बाम्ल वायूचे उत्सर्जन कमी करण्याचे बंधन आले आहे. विकसित राष्टे्र आणि भारत व चीनसारख्या आकाराने मोठ्या असलेल्या विकसनशील राष्ट्रांवर तर जरा जादाच जबाबदारी आली आहे. भारताची उर्जेची गरज मोठी आहे आणि ती निकट भविष्यात झपाट्याने वाढत जाणार आहे. दुर्दैवाने भारताला आपली गरज भागविण्यासाठी कोळशाचे ज्वलन करून मिळणाऱ्या औष्णिक उर्जेवरच प्रामुख्याने अवलंबून राहावे लागते आणि कोळशाचे ज्वलन केल्याने मोठ्या प्रमाणात कर्बाम्ल वायू निर्माण होतो. सध्याच्या घडीला भारत विजेची ६१ टक्के गरज औष्णिक उर्जेच्या माध्यमातून भागवत आहे. भारतात आज १.७० लाख मेगावॅट वीज औष्णिक उर्जा प्रकल्पांमधून निर्माण केली जाते. विजेची वाढती गरज भागविण्यासाठी भारत ही स्थापित क्षमता २०३० पर्यंत तब्बल ४.५० लाख मेगावॅटवर नेऊन पोहचविणार आहे. अर्थात त्याचवेळी हरित ऊर्जा निर्मितीची क्षमताही सध्याच्या १२ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांवर नेण्यात येणार आहे; परंतु त्यामुळे एकूण वीज निर्मितीमधील औष्णिक उर्जेचा वाटा केवळ चार टक्क्यांनीच कमी होणार आहे. परिणामी जागतिक हवामान बदलांना कारणीभूत ठरत असल्याबद्दलचा जगाचा रोष भारताला सहन करावा लागणार आहे. तो रोष कमी करायचा झाल्यास, भारताला हरित उर्जेचा वाटा वाढवावाच लागणार आहे. त्यासाठी सौर उर्जा निर्मितीवरच प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे लागणार आहे; मात्र सौर उर्जा निर्मितीसाठी भारताने जो फोटो व्होल्टॅक सौर पॅनेलचा मार्ग निवडला आहे, तो तेवढासा कार्यक्षम नाही. या मार्गाने दिवसातून कमाल पाच तासच वीज निर्मिती होते. त्याऐवजी सौर औष्णिक उर्जा निर्मितीचा मार्ग अवलंबल्यास, दिवसभरात १५ तासांपर्यंत वीज निर्मिती होऊ शकते. सध्याच्या घडीला सौर औष्णिक उर्जा प्रकल्प उभारणीचा खर्च सौर पॅनेल प्रकल्पाच्या तुलनेत जास्त असला तरी, जादा वीज निर्मितीमुळे तो सहज भरून निघू शकतो. शिवाय सौर पॅनेल प्रकल्पांच्या तुलनेत सौर औष्णिक उर्जा प्रकल्पांना बरीच कमी जागा लागते. सध्या जगभर अनेक सौर औष्णिक उर्जा प्रकल्पांची उभारणी सुरू आहे; मात्र दुर्दैवाने त्यापैकी एकही भारतात नाही. कर्बाम्ल वायूच्या उत्सर्जनाच्या मुद्यावरून जागतिक रोषाचे धनी व्हायचे नसेल आणि संभाव्य निर्बंध टाळायचे असतील, तर भारताला लवकरात लवकर सौर औष्णिक उर्जा प्रकल्पांची वाट चोखाळावीच लागेल.