शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सत्याची व विवेकाची कास न धरता सर्व प्रकारच्या भोंदूपणाचे जीवन जगतात असा समाज वैचारिकदृष्ट्या खुजाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:11 IST

सर्व प्रकारच्या भोंदूपणाचे जीवन जगतात असा समाज वैचारिकदृष्ट्या खुजाच राहणे स्वाभाविक असते.

ज्या समाजातील लोक आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी सत्याची व विवेकाची कास न धरता आपण आधुनिक विचारांचे आणि विज्ञानवादी असल्याचा आव आणतात; परंतु प्रत्यक्षात सर्व प्रकारच्या भोंदूपणाचे जीवन जगतात असा समाज वैचारिकदृष्ट्या खुजाच राहणे स्वाभाविक असते. वैचारिकदृष्ट्या तसेच समाजसुधारणेच्या बाबतीत सर्वात प्रगत राष्ट्र म्हणून भारताकडे पाहिले जाते. यासाठी समाजसुधारकांच्या अनेक पिढ्याही खर्ची पडल्याचे दाखले इतिहासात नमूद आहेत. असे असतानाही या समाजातील काही घटक आजही शेकडो वर्षांपूर्वीच्या मानसिकतेतच गुरफटून राहताना दिसणार असेल तर समाजधुरीणींचे प्रयत्न निष्फळ ठरले की लोकांची ओंजळ थिटी पडली, असा प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहू नये.महाराष्ट्राची भूमी तशी साधुसंतांच्या वास्तव्याने संपन्न झालेली आहे. या प्रदेशाला पुरातन रूढी-परंपरांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी, अंधश्रद्धेला कायमस्वरूपी मूठमाती देण्यासाठी अनेक सुधारकांनी आयुष्य वेचले. राष्टÑ, राज्य सुसंस्कृत व्हावे, वैचारिक संपन्नता वाढीस लागावी आणि मानवजात गुण्यागोविंदाने नांदावी, हाच त्यांचा निर्मळ उद्देश त्यामागे होता. हा उद्देश अपवाद वगळता सर्वांच्याच मनात झिरपू न शकल्यानेच आजही बहुतांशी वर्गजादूटोणा, करणी, मूठ मारणे, चेटकीण असणे अशा भ्रामक कल्पनांना चिटकून बसलेला दिसून येतो. त्यात खतपाणी घालण्याचे काम संशयी वृत्तीने केले आहे. वास्तविक संशय ही एक पीडाच असून, यापायी अनेकांची घरे उद्ध्वस्त झालेली आहेत. काहींना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एका वृद्धाने केलेली आत्महत्यादेखील याच प्रकारात मोडणारी आहे. धामणकुंड गावातील मोलमजुरी करून गुजराण करणाºया पांडू धर्मा चौधरी या ७७ वर्षीय इसमावर भुताटकीचे देव असल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून गावातील माणसे व जनावरांचे अकाली मृत्यू होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. गावकºयांकडून होणाºया या मानसिक जाचाला वैतागून गाव सोडून निघून गेलेल्या त्या वृद्धाला गावदेवाच्या पूजेच्या निमित्ताने गावात पुन्हा बोलावले गेले असता संयोगाने त्याच दिवशी गावातील एक रेडा मृत्युमुखी पडला. त्याचेही खापर या वृद्धावर फोडण्यात आल्याने त्याने अखेर आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. एकीकडे महाराष्टÑ विचारांनी आणि संस्कारांनी प्रगत होत असल्याच्या हाकाट्या पिटल्या जात असताना दुसरीकडे त्याउलट घटना जर घडत राहणार असतील तर या वृद्धाचा मृत्यू हा अप्रागतिक विचारांचाच बळी म्हणावा लागेल. २०१३ मध्ये राज्य शासनाने जादूटोणाविरोधी विधेयक संमत करूनही हे प्रकार थांबू शकलेले नाहीत. याचा अर्थ या विधेयकाच्या कठोर अंमलबजावणीत काही त्रुटी राहिल्या की हा कायदा अद्याप लोकांपर्यंत पोहचलाच नाही, अशी शंका यावी.जादूटोण्याच्या संशयामुळे केवळ या चौधरी नामक वृद्धालाच त्रास झाला असे नव्हे, अशा घटना महाराष्टÑात अनेक ठिकाणी घडल्या असून, आजही ती शृंखला कायम आहे. कोठे भुतीण असल्याच्या संशयावरून महिलांना विवस्र करून मारहाण करण्यात आली आहे, तर कोणावर झाडाला बांधून अमानुषपणे अत्याचार करण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या घटना म्हणजे पुरोगामी आणि प्रगत म्हणवल्या जाणाºया राज्यासाठी शोभादायी म्हणता येऊ नयेत.