शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

सोशल युद्धखोर

By admin | Updated: May 17, 2017 12:51 IST

कुलदीप जाधव यांच्या फाशीविरुद्ध भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाने पाकिस्तानला फटकारले असल्याचे भारतीय माध्यमांत म्हटले आहे.

- विजय बाविस्कर
 
कुलभूषण जाधव यांच्या फाशीविरुद्ध भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाने पाकिस्तानला फटकारले असल्याचे भारतीय माध्यमांत म्हटले आहे. परंतु, पाकिस्तानी माध्यमांतून मात्र पाकिस्तानच्या आरोपांना भारताला उत्तर देता आले नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचा आजपर्यंतचा इतिहास पाहता, कदाचित निकाल लागायच्या आधीच फाशीची अंमलबजावणी होऊ शकते. आत्ताच भारतीय सोशल मीडियावर युद्धखोरीची भाषा सुरू झाली आहे. काही विपरित घडले, तर ही भाषा आणखी कडवट होऊ शकते. मुळात गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडिया अभिव्यक्तीचे साधन बनताना परिणामांचा विचार करण्याची सवयच मोडून गेली आहे. त्या क्षणी अभिव्यक्त होताना केवळ भावनेचा विचार होतो. आताच्या राज्यकर्त्यांना मुख्य प्रवाहातील माध्यमांपेक्षा सोशल मीडिया अधिक भावत असल्याने तेदेखील त्याबरोबर वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंतप्रधानांना एका सैनिकाच्या पत्नीने ५६ इंची ब्लाऊज भेट पाठविला, याबाबत ज्या पद्धतीने सोशल मीडियामध्ये कमेंट्स येत आहेत, त्या खरोखरच विचार करायला लावणा-या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणुकीपूर्वीच्या वक्तव्यांचा आधार घेऊन त्यांच्यावर टीका होत आहे. ही गोष्ट खरी, की संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार असताना भाजपाच्या सगळ्या धोरणकर्त्यांनी ‘अत्यंत दुबळे पंतप्रधान’ अशी मनमोहनसिंग यांची प्रतिमा बनविली. ‘पाकिस्तान को उनकी भाषामें जवाब देंगे’ असे पंतप्रधानांचे वक्तव्यही प्रसिद्ध झाले होते. नरेंद्र मोदी यांनी गुजरातची विधानसभा निवडणूक लढविताना याही पुढे जाऊन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची पोस्टर लावून ‘तुम्हाला कोण पाहिजे?’ असे विचारत आपणच पाकिस्तानला सडेतोड उत्तर देऊ शकतो, असे भासवले होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ‘छप्पन इंच की छाती’ हा मुद्दा पाकिस्तानला उत्तर देण्यासाठीच असल्याचे म्हटले गेले होते. परंतु, विरोधात असणे वेगळे आणि प्रत्यक्ष सत्ता राबविताना निर्णयांवर जबाबदारीचे ओझे असते. देशाच्या सुदैवाने मोदी आणि अमित शहा यांच्या भूमिकेत सत्तेवर आल्यावर बदल झाला आहे; पण सोशल मीडियावरील तज्ज्ञांना ही समज कशी येणार, हा प्रश्न आहे. भारताने पाकिस्तानबरोबर १९६५ आणि १९७१ मध्ये दोन युद्धे केली. कारगिलमध्ये घुसखोरी मोडून काढली; परंतु त्याला सर्वंकष युद्धाचे स्वरूप आले नव्हते. पण, एका ठराविक भागात लढल्या गेलेल्या या युद्धाचा खर्च ५०० कोटींहून अधिक आला होता. त्यापेक्षा ५००हून अधिक जवानांचा मृत्यू झाला. आताच्या काळात सर्वंकष युद्धाचे परिणाम याहून अधिक भयानक असतील. याशिवाय जागतिक लोकमत आपल्याच बाजूने असेल, याचीही खात्री देता येत नाही. १९७१च्या बांगलादेश युद्धात एक कोटींहून अधिक शरणार्थी भारतात आले असताना आणि त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत असतानाही संयुक्त राष्ट्रसंघातील १० टक्के राष्ट्रांनीही भारताला पाठिंबा दिला नव्हता. सुरक्षा समितीमध्येही रशियाला भारतविरोधी प्रस्तावावर नकाराधिकार वापरावा लागला होता. आताच्या जागतिक परिस्थितीत रशिया त्या पद्धतीने भारताबरोबर राहीलच, याची खात्री देता येत नाही. पूर्व सीमेवर भारताने विजय मिळविला, तरी पश्चिम आघाडीवर भारताला निर्विवाद विजय मिळविता आला नव्हता. उलट, पाकिस्तानच्या आक्रमणाविरुद्ध बचावात्मक भूमिका घ्यावी लागली होती. पण तरीही पाकिस्तानचे वर्णन करताना सगळीच माध्यमे ‘टिचभर देश’, ‘फुंकर मारली तरी उडून जाईल’ अशा पद्धतीची वर्णने करतात. लष्करी सामर्थ्य या गोष्टींवर अवलंबून असते, तर भारतातील एखाद्या राज्याएवढेही क्षेत्रफळ असणा-या इंग्लंडने दीडशे वर्षे भारतावर राज्य केले नसते. जपानसारख्या चिमुकल्या देशाने रशियावर विजय मिळविला नसता. त्यामुळेच राष्ट्रवादाचा अर्थ युद्धखोरी घेऊन त्या पद्धतीने जनमानस तयार होण्यापासून वाचविण्याची जबाबदारी सरकारबरोबरच विचारवंतांनी घेण्याची गरज आहे. युद्ध सुरू झाल्यावर जीडीपीमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण होईल, महागाई प्रचंड वाढेल, विकासकामांसाठी पैसे राहणार नाहीत, कल्याणकारी योजना बंद कराव्या लागतील. या सगळ्याला आपण तयार आहोत का? या सगळ्याचा अर्थ भारत खूप दुबळा आहे, असाही नाही. परंतु, आत्ताच्या काळात प्रत्यक्ष युद्ध केवळ सीमेपुरते मर्यादित राहत नाही. दोन देशांपुरतेही ते राहत नाही, तर त्याचे जागतिक परिणाम होतात. त्यामुळेच जागतिक पातळीवर जनमत संघटित करून पाकिस्तानला एकटे पाडण्याची रणनीती आखणे आवश्यक आहे. पण, सोशल मीडियावरच्या लाटांवर तरंगणा-या नेत्यांना ‘देश की आवाज’ ऐकू येईल आणि त्यांच्याकडून आक्रस्ताळेपणाने निर्णय घेतले जाऊ शकतात. शहिदांच्या त्यागाचा सन्मान व्हायलाच हवा. पाकिस्तानने ज्या पद्धतीने शहिदांची विटंबना केली, त्याला उत्तर देणेही गरजेचे आहे. पण, हे करताना ‘जंग तो एक दिन की होती है, जिंदगी बरसों तक रोती है’ हेदेखील लक्षात ठेवायला हवे.