शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

‘म्हणून काय झाले’?

By admin | Updated: July 28, 2016 04:22 IST

केन्द्र सरकारच्या प्रस्तावित वस्तू आणि सेवा कर विधेयकास पाठिंबा देण्यासाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी ज्या भरमसाठ अटी लादल्या होत्या त्यातील ‘जलिकट्टू’ला मान्यता

केन्द्र सरकारच्या प्रस्तावित वस्तू आणि सेवा कर विधेयकास पाठिंबा देण्यासाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी ज्या भरमसाठ अटी लादल्या होत्या त्यातील ‘जलिकट्टू’ला मान्यता मिळवून देण्याच्या ज्या अटीवर केन्द्र सरकारदेखील डोलायला लागले होते त्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने केन्द्र आणि राज्य या दोहोंचे कान चांगलेच उपटले आहेत. बैलगाड्यांची शर्यत आणि त्यासाठी बैलांच्या वंशाचे संवर्धन असा हेतू समोर ठेऊन म्हणे तामिळनाडूत पोंगलच्या सणाच्या निमित्ताने जलिकट्टूचा सोहळा साजरा केला जातो. पण त्यात बैलांवर अत्याचार होत असल्याचे कारण पुढे करुन काही प्राणीमित्र संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या व त्या न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी जलिकट्टूवर बंदी लागू केली. हीच बंदी उठवावी म्हणून केन्द्र सरकारचे पर्यावरण आणि जंगल मंत्रालय केवळ जयललितांना उपकृत करण्यासाठी रदबदली करीत आहे. या सोहळ्याला प्राचीन परंपरा असल्याचा युक्तिवाद जेव्हां केला गेला तेव्हां न्यायालयाने प्रतिप्रश्न केला की, ‘कायदा करण्यापूर्वीपर्यंत बाल विवाहालाही प्राचीन परंपरा होती, म्हणून काय झाले’? केन्द्र सरकारच्या वतीने स्वत:च्या समर्थनार्थ महाभारतातील काही दाखलेदेखील दिले. उधळलेल्या बैलाला श्रीकृष्णाने कसे काबूत आणले याचा दाखला देऊन जलीकट्टूच्या कथित खेळाची सांगड थेट श्रीकृष्णाशी घातली गेली. पण न्यायालय काही प्रभावित झाले नाही. तामिळनाडूच्या वकिलाने तर हे प्रकरण सुनावणीसाठी मोठ्या खंडपीठाकडे सुपूर्द करावे अशीदेखील मागणी केली. त्यावर न्यायालय परखडपणे म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी ज्या द्विसदस्यीय खंडपीठाने जलिकट्टूवर बंदी लागू केली ते खंडपीठ न्यायदानाच्या दृष्टीने सक्षम नव्हते हे उभय पक्षांनी आधी सिद्ध करुन दाखवावे. केन्द्र सरकारला आपल्या तालावर नाचविण्यात तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता कशा पटाईत आहेत हेच यातून पुन्हा एकदा दिसून येते.