शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
4
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
5
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
6
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
7
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
8
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
9
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
10
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
11
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
12
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
13
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
14
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
15
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
16
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
17
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
18
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
19
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
20
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप

गती की मंदी?

By admin | Updated: June 16, 2016 03:49 IST

सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेली बातमी अखेर आली आहे. त्यांना येत्या १ आॅगस्टपासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींनुसार वाढीव वेतन आणि सोबतच सहा

सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेली बातमी अखेर आली आहे. त्यांना येत्या १ आॅगस्टपासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींनुसार वाढीव वेतन आणि सोबतच सहा महिन्यांची थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. प्रारंभी केंद्र सरकारचे ४७ लाख कर्मचारी आणि ५२ लाख निवृत्तीवेतनधारकांना याचा लाभ होणार असला तरी, लवकरच विविध राज्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही तो द्यावाच लागणार आहे. एकट्या केंद्र सरकारलाच वाढीव वेतन, भत्ते व निवृत्तीवेतनापोटी दरवर्षी तब्बल एक लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागणार आहे. स्वाभाविकच आता सरकारी खजिन्यावरील भार आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, या मुद्यांसोबतच सरकारी कर्मचाऱ्यांचे फाजील लाड केले जात असल्याची चर्चा नव्याने सुरू होईल. वेतन आयोगाच्या शिफारसी लागू केल्याने सरकारी खजिन्यावर अतिरिक्त बोजा पडणार असला तरी, त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त पैसा आल्याने बाजारात मागणी वाढेल आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती लाभेल, असे गृहीतक त्यामागे आहे. परिणामी गृहनिर्माण, वाहन, बँका, आदी क्षेत्रांना सुगीचे दिवस दिसू शकतात. मात्र दुसरीकडे वित्तीय तूट मर्यादित ठेवताना सरकार मेटाकुटीस येऊ शकते. गत दोन वर्षात खनिज तेलाच्या घसरत्या दरानी सरकारला चांगलाच हात दिला. पण आता पुन्हा या दराने चढता प्रवास सुरू केल्याचे दिसत आहे. तो तसाच कायम राहिल्यास, अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर सरकारला दुहेरी मार बसू शकतो आणि त्याचा परिणाम विकास प्रकल्पांमधील गुंतवणुकीवर होऊन, अर्थव्यवस्था मंदावू शकते. थोडक्यात, एकाच निर्णयाचे सकारात्मक व नकारात्मक असे दोन्ही परिणाम संभवू शकतात. जे आधीच सुस्थितीत आहेत, त्यांच्या पदरात अधिक पडेल, तर सरकारची आर्थिक स्थिती नाजुक झाल्याने ‘नाही रे’ वर्गासाठीच्या सरकारी योजनांवर कपातीची कुऱ्हाड कोसळेल. याचा दृश्य परिणाम असा असेल, की समाजातील आर्थिक दरी अधिक रुंदावेल. मुक्त अर्थव्यवस्थेचा हा अपरिहार्य भाग असला तरी, ‘आहे रे’ व ‘नाही रे’ या दोन वर्गांमधील दरी सांधता येण्यापलीकडे रुंदावणे, हे अराजकाला निमंत्रण ठरू शकते. सरकारसोबतच ‘आहे रे’ वर्गानेदेखील याचे भान बाळगणे गरजेचे आहे; अन्यथा एकदा वणवा पेटला, तर ‘आहे रे’चे ‘होत्याचे नव्हते झाले रे’ होण्यास वेळ लागायचा नाही!