शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गती की मंदी?

By admin | Updated: June 16, 2016 03:49 IST

सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेली बातमी अखेर आली आहे. त्यांना येत्या १ आॅगस्टपासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींनुसार वाढीव वेतन आणि सोबतच सहा

सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेली बातमी अखेर आली आहे. त्यांना येत्या १ आॅगस्टपासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींनुसार वाढीव वेतन आणि सोबतच सहा महिन्यांची थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. प्रारंभी केंद्र सरकारचे ४७ लाख कर्मचारी आणि ५२ लाख निवृत्तीवेतनधारकांना याचा लाभ होणार असला तरी, लवकरच विविध राज्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही तो द्यावाच लागणार आहे. एकट्या केंद्र सरकारलाच वाढीव वेतन, भत्ते व निवृत्तीवेतनापोटी दरवर्षी तब्बल एक लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागणार आहे. स्वाभाविकच आता सरकारी खजिन्यावरील भार आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, या मुद्यांसोबतच सरकारी कर्मचाऱ्यांचे फाजील लाड केले जात असल्याची चर्चा नव्याने सुरू होईल. वेतन आयोगाच्या शिफारसी लागू केल्याने सरकारी खजिन्यावर अतिरिक्त बोजा पडणार असला तरी, त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त पैसा आल्याने बाजारात मागणी वाढेल आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती लाभेल, असे गृहीतक त्यामागे आहे. परिणामी गृहनिर्माण, वाहन, बँका, आदी क्षेत्रांना सुगीचे दिवस दिसू शकतात. मात्र दुसरीकडे वित्तीय तूट मर्यादित ठेवताना सरकार मेटाकुटीस येऊ शकते. गत दोन वर्षात खनिज तेलाच्या घसरत्या दरानी सरकारला चांगलाच हात दिला. पण आता पुन्हा या दराने चढता प्रवास सुरू केल्याचे दिसत आहे. तो तसाच कायम राहिल्यास, अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर सरकारला दुहेरी मार बसू शकतो आणि त्याचा परिणाम विकास प्रकल्पांमधील गुंतवणुकीवर होऊन, अर्थव्यवस्था मंदावू शकते. थोडक्यात, एकाच निर्णयाचे सकारात्मक व नकारात्मक असे दोन्ही परिणाम संभवू शकतात. जे आधीच सुस्थितीत आहेत, त्यांच्या पदरात अधिक पडेल, तर सरकारची आर्थिक स्थिती नाजुक झाल्याने ‘नाही रे’ वर्गासाठीच्या सरकारी योजनांवर कपातीची कुऱ्हाड कोसळेल. याचा दृश्य परिणाम असा असेल, की समाजातील आर्थिक दरी अधिक रुंदावेल. मुक्त अर्थव्यवस्थेचा हा अपरिहार्य भाग असला तरी, ‘आहे रे’ व ‘नाही रे’ या दोन वर्गांमधील दरी सांधता येण्यापलीकडे रुंदावणे, हे अराजकाला निमंत्रण ठरू शकते. सरकारसोबतच ‘आहे रे’ वर्गानेदेखील याचे भान बाळगणे गरजेचे आहे; अन्यथा एकदा वणवा पेटला, तर ‘आहे रे’चे ‘होत्याचे नव्हते झाले रे’ होण्यास वेळ लागायचा नाही!