शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

नऊपैकी सहा दिवे विझलेत अन् सातवाही फडफडतोय...!

By shrimant mane | Updated: November 11, 2023 08:36 IST

दहा हजार वर्षांत हिमयुग संपल्यानंतर पृथ्वीची तब्येत खालावतच गेली. औद्योगिक क्रांतिपूर्व काळाशी तुलना केली तर पृथ्वीच्या आजारांची परिस्थिती गंभीर आहे.

- श्रीमंत माने(संपादक, लोकमत, नागपूर)

दिल्ली-मुंबई महानगरांसह उत्तर व मध्य भारतातील वायुप्रदूषणाच्या बातम्या थरकाप उडविणाऱ्या आहेत. लाखोंचे श्वास कोंडलेत. कोरोना महामारीपेक्षा गंभीर स्थिती आहे. उपाय शोधताना सरकारे मेटाकुटीला आलीत. फटाके, बांधकामांवर बंधने घातली आहेत. वाहनांसाठी सम-विषम प्रणाली अंमलात आलीय. शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या आधीच दिल्या आहेत. धुळीसाठी कृत्रिम पावसाचा उपाय विचारात आहे.  काहीही करा; पण लोकांचे प्राण वाचवा, अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने दिली. दिल्ली हे जगातले सर्वाधिक प्रदूषित शहर असून, त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागत आहेत. प्रदूषणामुळे राजधानीतल्या रहिवाशांचे आयुष्य सरासरी बारा वर्षांनी, तिच्याभोवतीच्या शहरांमधील नागरिकांचे आयुष्य अकरा-बारा वर्षांनी, तर मुंबईकरांचे आयुष्यही दहा वर्षांनी कमी होते.  

तथापि, दिवा फडफडत असला तरी अजून तो पूर्णपणे विझलेला नाही. आधीचे असे सहा दिवे मात्र विझलेत. होय, पृथ्वीच्या आरोग्याच्या ठळक नऊपैकी सहा चाचण्यांचा रिपोर्ट चिंताजनक आहे. संशोधनाच्या भाषेत त्यांना प्लॅनेटरी बाउंड्रीज म्हणतात. हवामानबदल, बायोस्फिअर इंटेग्रिटी (यात जैवविविधता आलीच), शुद्ध पेयजल उपलब्धता, जमिनीचा वापर आणि पोषण द्रव्यांमधील प्रदूषण तसेच नॉव्हेल एंटिटीज अर्थात थेट मातेच्या दुधातून अपत्याच्या शरीरात प्रवेश करणारे मायक्रोप्लॅस्टिक तसेच किरणोत्सर्गी कचरा या मानवनिर्मित संकटांनी धोक्याची पातळी कधीच ओलांडली आहे. नऊपैकी सहा चाचण्यांचे निष्कर्ष चिंताजनक असणे म्हणजे रुग्ण व्हेंटिलेटरवरच आहे. दिलासा इतकाच, की प्रिय वसुंधरेच्या आरोग्याची तीन लक्षणे थोडी ठीक आहेत. वायुप्रदूषण, ओसियन ॲसिडिफिकेशन व ओझोन डिप्लेशन या तीन चाचण्यांची स्थिती सध्या अगदीच चिंताजनक नसली तरी निश्चिंत राहण्यासारखीही नाही. 

जगभरातील हजारो अभ्यासकांनी एकत्र येऊन पृथ्वीचे आरोग्य तपासले. त्यासाठी तब्बल दोन हजार अभ्यास केले. या संशोधनाचे निदान सायन्स ॲडव्हान्सेस नियतकालिकात गेल्या सप्टेंबरमध्ये प्रकाशित झाले. डेन्मार्कमधील कोपेनहेगेन विद्यापीठाच्या कॅथरिन रिचर्डसन त्याच्या मुख्य लेखिका आहेत. त्या म्हणतात, नऊपैकी सहा गोष्टींमध्ये नापास असलो तरी सारे काही संपलेले नाही. हे रक्तदाब व हृदयविकाराच्या परस्पर संबंधासारखे आहे. रक्तदाब वाढला की हृदयविकाराचा झटका येतोच असे नाही. परंतु, त्याची शक्यता कैकपटीने वाढते. थोडक्यात, प्रयत्न केले तर विझलेले दिवेही पेटू शकतात. जागतिक तापमान वाढ व ओझोन थरासाठी जग एकत्र येणे आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसणे यातून हेच स्पष्ट होते. 

कारण, बिघडले ते काल-परवाचे नाही. ही दहा हजार वर्षांची प्रक्रिया आहे. हिमयुग संपून होलोसीन युग प्रारंभ झाले तेव्हाच शेतीचा शोध लागला. एकेका टप्प्यावर पृथ्वीची तब्येत खालावत चालली. आजाराच्या कुरबुरी वाढल्या. औद्योगिक क्रांतिपूर्व काळाशी तुलना केली तर या आजारांची परिस्थिती गंभीर आहे. आजारांची कारणे एकमेकांशी निगडित आहेत. हवामान बदल व जैवविविधतेचा ऱ्हास किंवा खतांच्या अतिरेकी वापरातून जमिनीत फॉस्फरस व नायट्रोजनचा मारा, इंधन व खाद्यान्नासाठी प्लान्ट बायोमासचा अतिरेकी वापर, समुद्रात शैवालाचे थर, महासागराच्या काही भागात जीवसृष्टी संपुष्टात येणे, ओसियन डेड झोन तयार होणे, अशी ही दुष्परिणामांची गुंतागुंत आहे.

प्लॅनेटरी बाउंड्रीज नावाची संकल्पना २००९ साली पहिल्यांदा जगापुढे आली. २०१५ च्या अहवालाने जगाला सावधगिरीचा इशारा दिला. यंदा तुलनेसाठी आकडेवारीचा आधार घेतला गेला. अर्थातच थोडा सैल. उदा. पृथ्वीतलावर शेतीला सुरुवात झाली आणि तिच्या माध्यमातून निसर्ग ओरबाडला जाऊ लागला, संसाधनांची होरपळ सुरू झाली तेव्हा हवेत कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण २८० पीपीएम होते. संशोधनासाठी ते ३५० पीपीएम गृहीत धरले. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जगात हे प्रमाण सरासरी ४१९ पीपीएम होते. अर्थात, ही जगाची सरासरी आहे. दिल्ली-मुंबईची स्थिती त्याहून कितीतरी गंभीर आहे. हा सातवा दिवा विझू नये यासाठी आडोसा धरण्याची नितांत गरज आहे.  

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023