शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पक्षहित धाब्यावर

By admin | Updated: December 27, 2016 04:24 IST

प्रश्न जेव्हां व्यक्तिगत स्वार्थाचा किंवा स्वत:स अनुकूल असलेल्या राजकारणाचा असतो, तेव्हां पक्षाचे व्यापक हित कसे सरळ सरळ धाब्यावर बसविले जाते याचे एकाच वेळी दोन

प्रश्न जेव्हां व्यक्तिगत स्वार्थाचा किंवा स्वत:स अनुकूल असलेल्या राजकारणाचा असतो, तेव्हां पक्षाचे व्यापक हित कसे सरळ सरळ धाब्यावर बसविले जाते याचे एकाच वेळी दोन अनुभव काँग्रेस पक्षाला सध्या घ्यावे लागत आहेत. दोन्ही अनुभव देणारे पुन्हा त्याच पक्षाचे माजी मुख्यमंत्री आहेत. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना तब्बल ५२ कोटी रुपये लाचेच्या स्वरुपात मिळाले असा अत्यंत गंभीर आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकताच केला असून या आरोपांची शहानिशा केली जावी आणि खुद्द मोदींनी आरोपांची चौकशी करण्याचे धार्ष्ट दाखवावे, अशी मागणी काँग्रेस पक्ष करीत आहे. तथापि ज्या कागदपत्रांच्या आधारे राहुल यांनी आरोप केले आहेत, त्या कागदपत्रांच्या सत्यतेबाबत काँग्रेस पक्षाच्या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतील त्याच पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवार शीला दीक्षित यांनीच शंका उपस्थित केली आहे. याचे महत्वाचे कारण ज्या रोजनिशीत ‘सहारा’ समूहाने मोदी यांना ४० कोटी रुपये दिल्याची नोंद आढळून येते त्याच रोजनिशीत शीला दीक्षित यांनादेखील एक कोटी रुपये दिल्याची नोंद आहे. आपल्यावरील हे किटाळ टळावे म्हणून शीला दीक्षित यांनी संबंधित नोंदीच विश्वासार्ह नसल्याचे म्हटल्याने एकप्रकारे पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जी भूमिका घेतली आहे तिलाच छेद दिला गेला आहे. अर्थात ज्या नोंदींच्या आधारे राहुल यांनी मोदींच्या विरोधात आरोप केला आहे, त्या नोंदी सर्वोच्च न्यायालयानेही अग्राह्य ठरविल्या आहेत, हे आणखीनच वेगळे. पक्षहित नजरेआड केला जाणारा दुसरा प्रकार आहे पंजाब विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भात. पंजाब, हरयाणा आणि आणखी काही राज्यांचा ज्याच्याशी संबंध आहे त्या सतलज-यमुना पाणी करारास पंजाबचा कडाडून विरोध आहे. या करारान्वये हरयाणाला पंजाबने जे पाणी द्यावयाचे आहे ते देण्यास पंजाबची तयारी नाही. त्याबाबत त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे भावी उमेदवार कॅप्टन अमरिंदरसिंग यांची भूमिका अत्यंत टोकाची आहे. ती तशी असल्यानेच हरयाणाचे काँग्रेस पक्षाचेच माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांनी पंजाबात जाऊन काँग्रेस पक्षाचा प्रचार करण्याचे स्वच्छ शब्दात नाकारले आहे. पण त्यांची मनधरणी करण्यासाठी पंजाबचे पाणी वाटून घेण्याबाबत घेतलेली टोकाची भूमिका पातळ करण्यास कॅप्टन अमरिंदरसिंग हेदेखील अजिबात तयार नाहीत. सबब व्यक्तिगत इभ्रतीसाठी शीला दीक्षित यांनी तर प्रादेशिक राजकारणासाठी कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पक्षाचे व्यापक हित नजरेआड केले आहे.