शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

पक्षहित धाब्यावर

By admin | Updated: December 27, 2016 04:24 IST

प्रश्न जेव्हां व्यक्तिगत स्वार्थाचा किंवा स्वत:स अनुकूल असलेल्या राजकारणाचा असतो, तेव्हां पक्षाचे व्यापक हित कसे सरळ सरळ धाब्यावर बसविले जाते याचे एकाच वेळी दोन

प्रश्न जेव्हां व्यक्तिगत स्वार्थाचा किंवा स्वत:स अनुकूल असलेल्या राजकारणाचा असतो, तेव्हां पक्षाचे व्यापक हित कसे सरळ सरळ धाब्यावर बसविले जाते याचे एकाच वेळी दोन अनुभव काँग्रेस पक्षाला सध्या घ्यावे लागत आहेत. दोन्ही अनुभव देणारे पुन्हा त्याच पक्षाचे माजी मुख्यमंत्री आहेत. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना तब्बल ५२ कोटी रुपये लाचेच्या स्वरुपात मिळाले असा अत्यंत गंभीर आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकताच केला असून या आरोपांची शहानिशा केली जावी आणि खुद्द मोदींनी आरोपांची चौकशी करण्याचे धार्ष्ट दाखवावे, अशी मागणी काँग्रेस पक्ष करीत आहे. तथापि ज्या कागदपत्रांच्या आधारे राहुल यांनी आरोप केले आहेत, त्या कागदपत्रांच्या सत्यतेबाबत काँग्रेस पक्षाच्या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतील त्याच पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवार शीला दीक्षित यांनीच शंका उपस्थित केली आहे. याचे महत्वाचे कारण ज्या रोजनिशीत ‘सहारा’ समूहाने मोदी यांना ४० कोटी रुपये दिल्याची नोंद आढळून येते त्याच रोजनिशीत शीला दीक्षित यांनादेखील एक कोटी रुपये दिल्याची नोंद आहे. आपल्यावरील हे किटाळ टळावे म्हणून शीला दीक्षित यांनी संबंधित नोंदीच विश्वासार्ह नसल्याचे म्हटल्याने एकप्रकारे पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जी भूमिका घेतली आहे तिलाच छेद दिला गेला आहे. अर्थात ज्या नोंदींच्या आधारे राहुल यांनी मोदींच्या विरोधात आरोप केला आहे, त्या नोंदी सर्वोच्च न्यायालयानेही अग्राह्य ठरविल्या आहेत, हे आणखीनच वेगळे. पक्षहित नजरेआड केला जाणारा दुसरा प्रकार आहे पंजाब विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भात. पंजाब, हरयाणा आणि आणखी काही राज्यांचा ज्याच्याशी संबंध आहे त्या सतलज-यमुना पाणी करारास पंजाबचा कडाडून विरोध आहे. या करारान्वये हरयाणाला पंजाबने जे पाणी द्यावयाचे आहे ते देण्यास पंजाबची तयारी नाही. त्याबाबत त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे भावी उमेदवार कॅप्टन अमरिंदरसिंग यांची भूमिका अत्यंत टोकाची आहे. ती तशी असल्यानेच हरयाणाचे काँग्रेस पक्षाचेच माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांनी पंजाबात जाऊन काँग्रेस पक्षाचा प्रचार करण्याचे स्वच्छ शब्दात नाकारले आहे. पण त्यांची मनधरणी करण्यासाठी पंजाबचे पाणी वाटून घेण्याबाबत घेतलेली टोकाची भूमिका पातळ करण्यास कॅप्टन अमरिंदरसिंग हेदेखील अजिबात तयार नाहीत. सबब व्यक्तिगत इभ्रतीसाठी शीला दीक्षित यांनी तर प्रादेशिक राजकारणासाठी कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पक्षाचे व्यापक हित नजरेआड केले आहे.