शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पशुपक्ष्यांना फटका!

By admin | Updated: December 21, 2014 00:23 IST

जसा फटका जमिनीला, पिकाला आणि शेतकरी वर्गाला बसतो, तसाच किंवा तेवढाच गारपिटीचा फटका पशुपक्ष्यांनाही बसतो.

वातावरणातील बदलामुळे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात दरवर्षी गारपीट होते आहे. त्याचा जसा फटका जमिनीला, पिकाला आणि शेतकरी वर्गाला बसतो, तसाच किंवा तेवढाच गारपिटीचा फटका पशुपक्ष्यांनाही बसतो. दुर्दैवाने गारपिटीमध्ये ज्यांना स्वत:चे संरक्षण करता येत नाही, अशा पशुपक्ष्यांचा मृत्यू होतो आहे.रपीट होण्यापूर्वी वातावरणात बदल होत असतात. हे बदल काही प्रमाणात पशुपक्षी, किटक, सरपटणारे जीव यांना कळत असतात. कालांतराने पशू गुहेचा आसरा घेतात आणि सरपटणारे जीव बिळांचा आसरा घेतात. शिवाय काही पक्षी वातावरणातील बदल लक्षात येताच संबंधित ठिकाणांहून उडून जातात. परंतु जे पक्षी झाडांवर घरटी करून राहतात. उदा. बगळे, कावळे, मैना, पोपट आणि करकोचा अशा पक्ष्यांचा गारपिटीच्या फटक्याने मृत्यू होतो. कारण हे पक्षी घरट्यातील अंडी, आपली पिल्ले यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातच त्यांचा मृत्यू होतो. तर काही पक्षी शेकडोच्या संख्येने झाडावरच रात्र काढतात. अशावेळी या गारपिटीचा त्यांना देखील वाईट फटका बसतो. नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांत स्थलांतरित पक्षी आपल्याकडे येत असतात. हजारो मैलांचा प्रवास करून हे पक्षी आपल्याकडे दाखल होत असतात. एवढ्या मोठ्या प्रवासाने ते थकलेले आणि भुकेलेले असतात. या पक्ष्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणपक्ष्यांचा समावेश असतो. याच काळात ते विश्रांतीसाठी एखाद्या तलावात उतरले आणि रात्रीच्या वेळेस गारपीट झाली तर त्यांना गारांच्या माऱ्यामुळे उडता येत नाही. वातावरणातील बदलाचा परिणाम सहन न झाल्याने काही कीटकांच्या प्रजातींचा अंत होतो. काही फुलपाखरे सुद्धा अशा बदलत्या वातावरणात तग धरू शकत नाहीत. गारपिटीचा परिणाम जसा मनुष्य प्राण्यावर होतो तसा तो पशुपक्ष्यांवर आणि जैविक विविधतेवरही होत असतो.(लेखक निसर्गमित्र आहेत.)विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात फेब्रुवारी ते मे २०१४ दरम्यान गारपीट झाली. या गारपिटीमुळे पशुपक्ष्यांनाही जीव गमवावा लागला. विविध प्रकारच्या २६ पक्ष्यांच्या प्रजाती आणि ९ प्रकारच्या सस्तन प्राण्यांना या गारपिटीचा फटका बसला, असे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या अहवालात नमूद करण्यात आले. या गारपिटीच्या तडाख्यात ६५ हजारांपेक्षा अधिक पक्षी आणि शेकडो सस्तन प्राण्यांचा मृत्यू झाला. अनेक पक्षी जखमी झाले गारांचा आकार १-२ इंच इतका होता. मैना, चिमण्या, पोपट या पक्ष्यांच्या मृत्यूची संख्या अधिक होती. मोकळ्या जागेत राहणाऱ्या भारतीय प्रकारच्या काळविटांचाही गारपिटीने मृत्यू झाल्याची नोंद अहवालात आहे. मानवी वास्तव्याच्या परिसरात आढळणाऱ्या मैना, घुबड यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला. कोकिळा, बुलबुल, बगळा आणि मधमाशा यांच्या मृत्यूची संख्या मोठी आहे.- विजय अवसरे