शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवशाही’ची बाजारगाडी होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 03:31 IST

परिवहन महामंडळात ४६० शिवशाही बस दाखल होणार आहेत. त्यासाठी महामंडळाने १७५ कोटी रुपये खर्चाची तयारी केली आहे.

परिवहन महामंडळात ४६० शिवशाही बस दाखल होणार आहेत. त्यासाठी महामंडळाने १७५ कोटी रुपये खर्चाची तयारी केली आहे. महामंडळाने बसची गुणवत्ता तसेच सेवा आणि वाजवी तिकीट दर याचा मेळ बसवला तर शिवशाही महामंडळाला उर्जितावस्था आणू शकते पण याचा मेळ बसवला नाही तर शिवशाहीची अवस्थाही हिरकणीसारखी होऊन ती बाजारगाडी होऊ शकते.राज्य परिवहन महामंडळाने शिवनेरी बसचा प्रयोग करून पाहिला पण तो फसल्यानंतर आता शिवशाही बस आणली असून, ती बºयापैकी परवडणारी व आरामदायी आहे. केवळ लालपरीच्या पलीकडे न जाणाºया राज्य परिवहन महामंडळाला १९८२ साली मिळालेल्या एशियाड बसनंतर परिवहन महामंडळाने आरामदायी सेवा देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या बसेसनाही चांगला प्रतिसाद मिळाला. पण कालांतराने मोडकळीस आलेल्या बसचा केवळ रंगच आरामदायी राहिला. तरीही त्याच गाड्या आरामदायी गाड्या म्हणून प्रवाशांकडून आरामदायीचे भाडे घेतले जाऊ लागले. तेव्हा प्रवाशांनी अशा आरामदायीकडे पाठ फिरवली. मग त्यांचा लाल रंग करण्यात आला आणि कालांतराने त्या गाड्या खेडेगावात बाजारगाड्या म्हणून धावू लागल्या. आजही त्या गाड्या काही ठिकाणी धावत असून त्यांच्या सीट आरामदायी आहेत. त्यानंतर महामंडळाने कोकणातील एका खासगी कंपनीकडून हिरकणी गाड्या बांधून घेतल्या. त्या गाड्या तर अक्षरश: पाच वर्षांतच बाजारगाडीपेक्षा कुचकामी निघाल्या. १९८२ साली महामंडळाला मिळालेल्या गाड्यांचा सांगाडा दणकट आणि सीट आजही आरामदायी वाटतात. पण हिरकणी गाड्यामधून प्रवास करताना प्रवाशांना कधीच आराम वाटला नाही. अगदी दगडावर बसून प्रवास केल्यासारखे वाटते. रात्रीच्या वेळी या गाडीतून प्रवासी डोके टेकवून न झोपता खांदा टेकून झोपतात. त्यामुळे या गाड्यांकडे प्रवाशांनी अक्षरश: पाठ फिरवली. हिरकणीच्या तुलनेत आता महामंडळाने शिवशाही ही खºया अर्थाने आरामदायी आणि वातानुकूलित बस आणली आहे. राज्यात ज्या मार्गावर ही बस धावते आहे तिला बºयापैकी उत्पन्न मिळत आहे. खासगीच्या आणि हिरकणीच्या तुलनेत तिचे तिकीट दरही परवडणारे आहेत. हीच सेवा हेच तिकीट दर कायम ठेवले तर प्रवासी तिच्यापासून दूर जाणार नाहीत. एशियाड गाडीने मिळवलेली प्रतिष्ठा हिरकणीने इतकी घालवली की एशियाड बाजारगाडी झाली तरी तिची सीट आरामदायी होती पण हिरकणीची नवीन आसनेही आरामदायी वाटली नाहीत. यापुढे हिरकणी बस बनवताना परिवहन महामंडळाचे अधिकारी व आरटीओचे अधिकारी यांना त्या गाडीतून रात्री २५० किलोमीटर प्रवास करण्याची सक्ती करावी म्हणजे आरामदायी कशाला म्हणतात ते कळेल. आता महामंडळात ४६० शिवशाही बस दाखल होणार आहेत. पण त्या खासगी कंपनीकडून बांधल्या जाणार आहेत. त्यासाठी महामंडळाने १७५ कोटी रुपये खर्चाची तयारी केली आहे. महामंडळाने बसची गुणवत्ता तसेच सेवा आणि वाजवी तिकीट दर याचा मेळ बसवला तर शिवशाही महामंडळाला उर्जितावस्था आणू शकते पण याचा मेळ बसवला नाही तर शिवशाहीची अवस्थाही हिरकणीसारखी होऊन ती बाजारगाडी होऊ शकते. तसे झाले तर लालपरीला मान वर करणे अवघड होऊन बसेल.