शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे चिंतन आणि चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 01:17 IST

वयाची पन्नाशी उलटल्यावर रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार जडण्याची भीती असते.

वयाची पन्नाशी उलटल्यावर रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार जडण्याची भीती असते. त्यामुळे डोके शांत ठेवून पथ्यपाणी पाळून राहावे, असा सल्ला डॉक्टर देतात. अर्थात माणसाला जे लागू आहे ते राजकीय पक्षाला जसेच्या तसे लागू होत नाही. मात्र ५२ वा वर्धापन दिन साजरा करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलेली भाषणे पाहिल्यावर शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण करण्याकरिता ही भाषा योग्य असली तरी वस्तुस्थिती बरीच भिन्न आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात ते बोलणार असतील तर उद्धव व राज ठाकरे भाषण करीत नसत. आदित्य यांनी वडिलांचे भाषण होण्यापूर्वीच स्वबळाचा शंख फुंकून टाकला, हा शिवसेनेतील लक्षणीय बदल आहे. अर्थात आदित्य जेव्हा स्वबळाचा नारा देत होते तेव्हा समोर बसलेल्या मंत्री व आमदारांनी टाळ्या पिटल्या नाहीत. कारण स्वबळावर सत्ता प्राप्त करण्यापासून शिवसेना कित्येक कोस दूर आहे, याची जाणीव त्यांना आहे. उद्धव यांनीही स्वबळाचा नारा देत पुत्राची री ओढली. मात्र सध्या भाजपासोबत असलेली सत्ता बिलकूल सोडणार नाही हे जाहीर केले. सत्तेतून बाहेर पडा शिकवणारे हे कोण टिकोजीराव, असा त्यांचा विरोधकांबाबत सूर होता. महाराष्ट्रात भाजपा हा आपला मोठा भाऊ झाला आहे हे स्वीकारण्यास शिवसेनेचे मन तयार नाही. मुंबईत विधानसभा निवडणुकीत भाजपाला शिवसेनेपेक्षा अधिक यश मिळाले, याची सल कायम आहे. सत्ता सोडली तर शिवसेना फुटण्याची भीती आणि सत्तेत राहिलो तर बदनाम व अपमानित होण्याची अपरिहार्यता, अशा कात्रीत सापडलेल्या उद्धव यांनी आपल्याच सरकारविरोधात उच्चरवात टीका करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक मग ती कल्याण-डोंबिवली महापालिकेची असो की पालघरची लोकसभा पोटनिवडणूक भाजपा-शिवसेना या सत्ताधारी पक्षांनी एकमेकांची उणीदुणी काढायची आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य पक्षांना चर्चेतून हद्दपार करायचे, अशी ही रणनीती आहे. स्वबळावर यश दिसले तर एकमेकांच्या उरावर बसायचे आणि विरोधकांची एकजूट दिसताच परस्परांच्या गळ्यात गळे घालायचे, असे हे संधिसाधू राजकारण शिवसेना-भाजपा करीत आहे. मात्र यापूर्वी युतीचे सरकार सत्तेवर असताना एकमेकांची धुणी धुतल्यामुळे नाराज मतदार मतदान केंद्रावर गेला नाही आणि त्यामुळे अवघ्या पाच वर्षांत युती सरकार अरबी समुद्रात बुडाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे शिवसेनेला लवकरात लवकर ही कोंडी फोडावी लागेल व चिंतामुक्त व्हावे लागेल. मात्र खरा महत्त्वाचा मुद्दा प्रा. मनोहर जोशी यांनी उपस्थित केला. अन्य राज्यांत प्रादेशिक पक्ष सत्तेवर आले पण महाराष्ट्रात शिवसेनेला स्वबळावर सत्ता का मिळाली नाही, हा त्यांचा रास्त सवाल आहे. मुस्लीम लीगचा द्वेष करायचा आणि बनातवालांशी हातमिळवणी करायची, काँग्रेसविरोध खुंटीला अडकवून आणीबाणीला समर्थन द्यायचे, अशा चुकांमुळे शिवसेना संपूर्ण सत्ता हाती घेऊ शकली नाही, हेच जोशींच्या प्रश्नाचे उत्तर आहे. आताही भाजपाबाबत शिवसेनेची भूमिका संदिग्ध आहे. भावनेचे राजकारण करणाऱ्या पक्षांचे मतदार पक्ष नेतृत्वाने अचानक यू टर्न घेतला तर गोंधळतात, निराश होतात हे सांगायला खरे तर जोशीबुवांची गरज नाही.