शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शेवग्याचं झाड आणि म्हातारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:54 IST

​​​​​​​दादासाहेब मोठे गोष्टीवेल्हाळ. सतत गोष्टी सांगण्याचा त्यांना शौक. आजही ते असेच मावशीकडे आले.

- अतुल कुलकर्णीदादासाहेब मोठे गोष्टीवेल्हाळ. सतत गोष्टी सांगण्याचा त्यांना शौक. आजही ते असेच मावशीकडे आले. म्हातारी दिसली की तिला म्हणाले, चला तुम्हाला एक गोष्ट सांगतो. म्हातारीला पण काम नव्हते. ती म्हणाली सांगा आणि दादासाहेब सुरू झाले. एका गावात एक सुखी कुटुंब राहत होते. सगळे भाऊ-बहीण गुण्यागोविंदाने नांदत होते. त्या घरात एकेदिवशी एक साधू आला. त्याने घरात दोन-चार दिवस मुक्काम केला. घरातले कर्ते पुरुष सकाळी उठायचे. परसबागेत शेवग्याच्या शेंगाचे झाड होते. घरातल्या तरुणांचा एकच कार्यक्रम असे. सकाळी उठून झाडाजवळ जायचे. शेंगा तोडायचे. बाजारात नेऊन शेंगा विकायच्या आणि येणाऱ्या पैशात घरचं सामानसुमान घेऊन ते परत यायचे. ते पाहून साधूने त्या तरुणाला विचारले...बाबारे हे किती दिवस चालूयं?- अनेक वर्षांपासून चालूयं.पण तुम्हाला दुसरं नवीन काही करावं असं वाटत नाही का? किती दिवस याच झाडाच्या शेंगा तोडत आयुष्य काढणार? त्यावर त्या तरुणाकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तो म्हणाला, चालूयं. आता तर माझा मुलगादेखील याच झाडाच्या शेंगा तोडायला मदत करतो आणि तो पण माझ्यासोबत बाजारात येतो. तोही या झाडावरच गुजराण करतो. साधू काही बोलला नाही. रात्री सगळे झोपल्यावर साधूने शेवग्याच्या झाडाखाली अ‍ॅसिड टाकले. झाड उभ्या उभ्या जळून गेले. सकाळी सगळे उठले. शेंगा तोडायला गेले तर झाडं कोसळले. होत्या तेवढ्या शेंगा सगळ्यांनी तोडून घेतल्या आणि दुसºया दिवसापासून सगळे काम शोधायला लागले. कुणी कुठे तर कुणी कुठे काम शोधू लागले. कालांतराने तोच साधू पुन्हा त्या गावात आला. तरुणांनी त्या साधूला ओळखले. प्रेमाने घरी नेले आणि सांगितले, तुम्ही झाड तोडले म्हणून आम्ही हातपाय हलवू शकलो. नाही तर आम्ही आहे त्याच ठिकाणी राहिलो असतो...तात्पर्य काय माहिती आहे का म्हातारे... असं म्हणत दादासाहेब म्हणाले, म्हातारे, कलियुगातही असचं आहे. साचलेल्या संचितावर किती दिवस काढायचे...? कधी ना कधी साचलेले धन संपते, जमा केलेले पाणी संपते... मात्र वाहते पाणी आणि सतत येणारे धन कधी संपत नाही. हे त्यांना कळाले नाही म्हणून त्या साधूने ते झाडंच तोडून टाकले. पण झाड तोडणं हा काही उपाय नाही ना म्हातारे... तूच सांग बरं...त्यावर म्हातारी हसली आणि म्हणाली, गोष्ट चांगली, तात्पर्यही चांगले पण आपल्याकडे कोणत्या राजकीय पक्षाला हे लागू होते सांग बरं... दादासाहेब हसले आणि म्हणाले, तूच सांग... त्यावर म्हातारी हसत हसत म्हणाली, काँग्रेसला लागू होते का रे ही गोष्ट...? त्यांच्या पक्षातले लोकही असेच भारी. नवीन काही करायचे नाही, त्यांना वाटते अजूनही लोक हातावरच ठप्पा मारतात. म्हणून ते दुसरं काही नवीन करण्याची इच्छाच ठेवत नाहीत. जे आहेत तेही आपापसात एकमेकांना कसं कोंडीत पकडता येईल त्याच कामावर असतात... म्हणून विचारते... त्यावर दादासाहेब म्हणाले, म्हातारे, ही गोष्ट राष्टÑवादी पक्षाला लागू होते की नाही...? तेही तसेच असं नाही वाटत... त्यावर म्हातारी म्हणाली, मी काय बोलणार...? काही लोकांना स्वत:च झाड आहे असं वाटतं....

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस