शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

शरीफ आणि शरीफजादे!

By admin | Updated: December 30, 2014 23:14 IST

शेजाऱ्यांनाच चावावेत म्हणून स्वत:च्या घरात भरपूर साप पाळायचे़... त्यांना मोठं करायचं... यासारखा कोणताच मूर्खपणा नाही़ कारण शेजारी आहे, की आपल्याला पाळणारा मालक, असं साप बघत नाही़

शेजाऱ्यांनाच चावावेत म्हणून स्वत:च्या घरात भरपूर साप पाळायचे़... त्यांना मोठं करायचं... यासारखा कोणताच मूर्खपणा नाही़ कारण शेजारी आहे, की आपल्याला पाळणारा मालक, असं साप बघत नाही़ त्याच्या जिवाशी खेळणाऱ्या प्रत्येकाला तो डंख करतोच़ पाकिस्तानने हाच मूर्खपणा गेल्या अनेक वर्षांपासून चालवला आहे़ शेजारी देशाला (म्हणजेच भारताला) कायम दहशतीखाली ठेवण्यासाठी, त्यांच्या सुरक्षा यंत्रणा कायम अस्थिर ठेवण्यासाठी पाकिस्तानने गेल्या काही वर्षांमध्ये असे अनेक साप पाळले़ त्यांना मोठे केले़ पण तेच साप आता पाकिस्तानच्या जिवावर उठले आहेत, त्यांनाच चावत आहेत़ पेशावर हल्ल्यानंतर पाकिस्तानला आपण पाळलेले दहशतवादी साप किती घातक आहेत, याचा साक्षात्कार झाला आहे. पाकिस्तानमध्ये ३५ हून अधिक अशा दहशतवादी संघटना आहेत, ज्यांनी त्यांच्याच भूमीत गेल्या दहा वर्षांमध्ये सुमारे ५५ हजार लोकांचा बळी घेतला आहे. गेल्या तीन दशकांचा इतिहास पाहिला, तर पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना कसे मोठे होऊ दिले, हे स्पष्टपणे लक्षात येते. १९८०च्या दशकात पाकिस्तानमध्ये हरकत-उल-जिहाद अल इस्लामी अर्थात हुजी, हरकत-उल-मुजाहिद्दीन आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटना सक्रिय होत्या. यातील हुजी आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटना अजूनही धुमाकूळ माजवत आहेत. त्यानंतर १९९०च्या दशकात उदयास आली ती आतापर्यंत सर्वाधिक घातक ठरलेली लष्कर-ए-तय्यबा. या संघटनेचे सर्वांत मोठे टार्गेट ठरली ती अमेरिका. या संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला मारण्यात अमेरिकेला यश आले असले, तरी ही संघटना समूळ नष्ट करणे या महासत्तेलाही जमले नाही़ त्यासोबतच जमियत उल मुजाहिद्दीन, मुताहिदा जेहाद कौन्सिल, तहरिक उल मुजाहिद्दीन, अल बद्र आणि तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनांनी धुमाकूळ घालणे सुरू केले. २००० नंतर जैश-ए-मोहम्मदचा जन्म झाला. या साऱ्या कुरापतखोर दहशतवादी संघटनांना पाठीशी घालण्याचे काम वेळोवेळी पाकिस्तानमधील तत्कालिन सरकारांनी केले आहे. मुंबईत १९९३ साली झालेला हल्ला, संसदेवर झालेला हल्ला, मुंबईवरील २६/११ चा हल्ला या साऱ्या कुरापती पाकिस्तानने पाळलेल्या दहशतवादी संघटनांनीच केल्याचे तपासाअंती सिद्ध झाले आहे. पाकिस्तानने हाफीज सईदसारख्या म्होरक्याला मोकाट सोडून आपण दहशतवाद्यांच्या पाठीशी असल्याचेच अनेकदा दाखवून दिले आहे. पेशावर हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दहशतवाद्यांविरोधात लढा उभारण्याची मोठी गर्जना केली. पण दुसऱ्याच दिवशी मुंबई हल्ल्यामागचा मास्टरमाइंड झकीउर रहेमान लख्वीची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर लाजेखातर पाकिस्तानने त्याला पुन्हा ताब्यात घेतले. तालिबानी संघटनांच्या तळांवर हल्ले सुरू केले. शिवाय फाशीची बंदी उठवून दहशतवाद्यांना फासावर लटकवणेही सुरू केले. सहा दहशतवाद्यांना फासावर लटकवल्यानंतर आता आणखी ५०० दहशतवाद्यांना फासावर लटकवणार असल्याचे जाहीर करून टाकले. तसेच, दहशतवाद्यांवरील खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी लष्करी न्यायालय सुरू करण्याची घोषणाही केली. ही सर्व पावले म्हणजे पाकिस्तान सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. कारण ‘गुड तालिबानी’ म्हणत पाळलेला हा साप आपल्याच अंगावर धावून आल्यानंतर त्याला मारण्यासाठी काठी शोधण्यासाठी धावाधाव करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळेच पाक सरकारने सुरू केलेल्या कारवाईतून फारसे काही निष्पन्न होईल, असे वाटत नाही. कारण ही कारवाई म्हणजे पेशावरमध्ये शाळेवर झालेल्या हल्ल्याची क्षणिक प्रतिक्रिया आहे. दीडशेहून अधिक तालिबानी दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी केला आहे. मात्र, ही केवळ एका दहशतवादी संघटनेवरील कारवाई आहे. पण, तालिबानसारख्या आणि त्याहीपेक्षा भयंकर दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये धुमाकूळ माजवत आहेत, यांच्यावर कारवाई करायची असेल, तर पाकिस्तानला आपली लष्करी शक्ती खर्ची घालावी लागेल. ता.क. - पेशावर हल्ला हा भारतासाठी मोठा धडा आहे. आपल्या देशात छुप्या पद्धतीने वावरणारे दहशतवादी आणि जिहादसाठी तयार होणारे तरुण ‘साप’ वेळीच ठेचावे लागणार आहेत. आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी ७५ हून अधिक आदिवासींचे बळी घेतले. या कारवायांना प्रत्युत्तर देण्यास उशीर लावून, भारत सरकारही ‘शरीफजादे’च ठरले आहे. आता या भारतीय शरीफजाद्यांनी फक्त ‘गुड बोडो अँड बॅड बोडो’ किंवा ‘गुड नक्षल अँड बॅड नक्षल’ असेच म्हणणे बाकी राहिले आहे.

पवन देशपांडे

(लेखक हे लोकमतच्या मुंबई आवृत्तीचेउपमुख्य उपसंपादक आहेत.)