शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
4
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
5
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
6
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
7
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
8
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
9
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
10
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
11
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
12
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
13
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
14
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
15
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
16
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
17
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
18
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
19
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
20
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ

लज्जा

By admin | Updated: June 24, 2015 00:39 IST

लज्जा हा मनुष्याचा एक सहज स्वभाव आहे. मनुष्याच्या ठिकाणी असलेली लज्जा ही एक अशी गोष्ट आहे की, ती चांगल्या गोष्टीबद्दल असू शकते व ती वाईट गोष्टीबद्दलही असू शकते.

अ‍ॅड. जयवंत महाराज बोधलेलज्जा हा मनुष्याचा एक सहज स्वभाव आहे. मनुष्याच्या ठिकाणी असलेली लज्जा ही एक अशी गोष्ट आहे की, ती चांगल्या गोष्टीबद्दल असू शकते व ती वाईट गोष्टीबद्दलही असू शकते. मनुष्य जीवनामध्ये लाज असणे हे एक नैतिकतेचे अंग मानले जाते. म्हणून समाजामध्ये वावरत असताना जर एखादा मनुष्य अनैतिकतेने वागू लागला तर मोठी माणसे म्हणतात की अरे ‘‘जनाची नाही तरी मनाची लाज असावी’’ या म्हणीवरूनच असे लक्षात येते की लज्जा ही एक मनात निर्माण होणारी ऊर्मी आहे. तिचा योग्य तो वापर समाजजीवनामध्ये असला पाहिजे.समाजामध्ये अशी परिस्थिती दिसून येते की, माणसे जिथे लाजायला पाहिजे तिथे लाजत नाहीत व जिथे लज्जा सोडायला पाहिजे तिथे लाजत राहतात. समाजामध्ये काही माणसे लाज सोडून वागत असलेली दिसून येतात. ती माणसे सामाजिक परिस्थितीचे कोणतेही भान आपल्या मनात न ठेवता त्यांचे वागणे सुरू असलेले दिसून येते. याउलट काही माणसे मंदिरात जायला लाजतात. असा उलटचा प्रवास चालू असलेला दिसून येतो आहे. म्हणून लज्जा या सद्गुणाचा वापर कोठे करायचा व कोठे करायचा नाही हे कळाले पाहिजे. संत तुकाराम महाराज तर म्हणतात की, परमार्थामध्ये ज्याला प्रगती करायची आहे त्याने लाज सोडली पाहिजे.लाज भय शंका दुराविला मान।न कळे साधन यापरते।।आता प्रश्न असा की ही परमार्थामध्ये लाज सोडणे म्हणजे नेमके काय? संत ज्ञानेश्वर महाराज ‘लज्जा’ या सद्गुणाची व्याख्या अशी करतात की,हे बहु असो देवपणे।नावारूपासि येणे।नाही लाजिरवाणे। याहुनि।।‘मी देह आहे’ असे समजून नामरूप यांचा अंगीकार करणे यासारखी लाजिरवाणी गोष्ट दुसरी कोणतीही नाही. असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. जी वस्तू आपली नाहीच ती वस्तू आपली म्हणू लागतो. तर ती क्रिया लाजिरवाणी होय. परमार्थामध्ये ही लाज सोडणे खूप महत्त्वाचे आहे. संत तुकाराम महाराजांना काही कुटिल लोकांनी त्रास द्यायचा ठरविले आणि त्यांना गाढवावर बसवून गावात मिरवू लागले. तरी महाराज अतिशय आनंदात भजन करीत निघाले होते. त्यांच्या बायकोने हे पाहिले तेव्हा ती विचारू लागली, महाराज हे काय आहे? तेव्हा तुकाराम महाराज म्हणू लागले अगं आवले! आपल्या लग्नाची वरात निघाली नव्हती ना ! म्हणून आज वरात निघाली आहे. तेव्हा त्यांची बायको म्हणू लागली, अहो वरातीकरिता घोडा लागतो ना, तेव्हा महाराज म्हणााले, गाढवाचे घोडे। आम्ही करू दृष्टीपुढे।।‘मी देह आहे’ ही आसक्ती सोडल्यानंतरच या अवस्थेपर्यंत जाता येते. या सर्व विचाराचे सार हेच की ‘लज्जा’ हा एक सगुण आहे व त्यांचा योग्य तो वापर मनुष्य जीवनामध्ये होत रहावा.