शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

स्त्रिया आपली संधी हिरावून घेतात, असे पुरुषांना वाटू शकते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2024 07:44 IST

सर्वपक्षीय महिला नेत्यांशी केलेल्या संवादाची मालिका : नेत्री ! या प्रकल्पात माजी खासदार सुनीता दुग्गल यांच्याशी केलेली बातचीत.

शायना एन. सी., भाजप नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या

महसूल सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन आपण राजकारणात आलात. केवळ हरयाणातीलच नव्हे, तर देशातील महिलांसाठी आपण एक प्रेरक व्यक्तिमत्त्व आहात. हरयाणातील महिलांना आपण काय सांगाल? 

महिला, मुलींना काही सांगण्यासाठीच मला राजकारणात यावे लागले. माझ्याकडे पाहून, माझे उदाहरण समोर ठेवून त्या पुढे जाऊ शकतात. आपण चुकत नसू, तर कोणी तुमच्याकडे बोट दाखवण्याचा प्रश्नच येत नाही. आपले चारित्र्य उत्तम असेल आणि आपल्याकडे आत्मविश्वास असेल, तर आपल्याला कोणी काही म्हणू शकत नाही. कुटुंबाचा पाठिंबा मात्र आवश्यक आहे. आपण जर एखादे चांगले काम हाती घेतले असेल, तर भोवतालची प्रत्येक गोष्ट आपल्या पाठीशी उभी राहते. महिलांना थोडा जास्त संघर्ष करावा लागतो. समाज पुरुषसत्ताक आहे. राजकारणातही पुरुषांचे वर्चस्व आहे. स्त्रिया आपली संधी हिरावून घेत आहेत, असे पुरुषांना वाटू शकते, पण त्यामुळे विचलित न होता आपण कामावर लक्ष केंद्रित करून पुढे गेले पाहिजे.

राजकारणात येणे हेच आपले लक्ष्य होते की, एखादा अनुभव या निर्णयाच्या मागे होता? 

महसुली सेवेत काम करत असताना, मी अनेक सामाजिक कार्यांशी जोडलेले होते. मग, ते रक्तदान शिबिर असो वा प्रौढशिक्षण कार्यक्रम. या कामातून मला प्रेरणा मिळाली. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि नंतर केंद्रामध्ये केलेले काम पाहून मी प्रभावित झाले आणि राजकारणाकडे वळले.

हरयाणाच्या संदर्भात प्रदूषणाचा मुद्दा गंभीर झालेला आहे. राज्यात आणि केंद्रात तुमच्या पक्षाचे सरकार असताना, या विषयाच्या बाबतीत काय केले पाहिजे? 

पर्यावरणाच्या बाबतीत पुष्कळ काही करता येण्यासारखे आहे. हवेतील कार्बनचे प्रमाण कमी करण्याची गरज आहे. तसे पाहिले, तर प्रदूषणाच्या संदर्भात भारताची परिस्थिती पुष्कळ चांगली आहे. लोकांमध्ये या विषयावर जागृतीही दिसते. पंतप्रधानांनी कच्छमध्ये १८,००० मेगावाट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प सुरू केला. असे प्रकल्प वाढत गेले, शेतकऱ्यांनी सौरऊर्जेचा वापर सुरू केला, तर त्यांना पुष्कळ फायदा होऊ शकतो. पर्यावरण रक्षणाचे काम सगळ्यांचेच आहे.

केंद्राच्या कोणत्या योजना हरयाणात महिलांसाठी राबवल्या जातात? 

हरयाणात महिला बचत गटांचे काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. पंतप्रधानांनी ‘अटल किसान मजदूर कँटीन’ योजना आणली. अनेक जिल्ह्यांत ती सुरू आहे. तालुका पातळीवर अशी कँटिन्स सुरू व्हावीत, असा आमचा प्रयत्न आहे. केवळ १० रुपयांत चार पोळ्या, भात, भाजी या कँटीनमध्ये उपलब्ध करून दिली जाते. अन्न शिजवण्यापासून वाढण्यापर्यंत महिला काम करतात. अशा विविध योजनांतून महिला आत्मनिर्भर होत आहेत. देश आत्मनिर्भर होण्यात महिलांचा मोठा वाटा असेल.

२०१४ साली विधानसभा निवडणूक हरल्यानंतर २०१९ साली आपण लोकसभेसाठी दिग्गज उमेदवाराविरुद्ध निवडून आलात. काय अनुभव होता?

२०१४ साली मी महसुली सेवेचा राजीनामा दिला, तेव्हाच सिरसा मतदारसंघातून मी लोकसभेला उभी राहणार होते, परंतु राजीनामा मंजुरीच्या प्रक्रियेत विलंब झाल्याने माझी संधी हुकली. थोडक्यात माझे तिकीट आणि नोकरी दोन्ही गेले होते, परंतु मला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले. पण, केवळ ४३५ मतांनी मी पराभूत झाले. पुढे सिरसातून लोकसभा निवडणूक लढताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माझ्याविरुद्ध उभे होते. मला असे वाटते कोणीही दिग्गज नसतं. लोक तुम्हाला दिग्गज करतात. लोक माझ्याबरोबर असल्यामुळे माझ्यावर कुठलेही दडपण नव्हते. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे होते. लोकांमध्ये उत्साह होता. मी निवडून आले.

 

टॅग्स :BJPभाजपाHaryanaहरयाणा