शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

शहा मास्तरांचा तीन दिवसांचा क्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2017 00:55 IST

क्लास शांततेत सुरू आहे की नाही, मुले शिकवण्याकडे किती लक्ष देतात आणि मुख्य म्हणे शिक्षक चांगले शिकवत आहेत की नाही, हे बघण्यासाठी हेडमास्तर नेहमीच शाळेचा राऊंड घेत असतात

क्लास शांततेत सुरू आहे की नाही, मुले शिकवण्याकडे किती लक्ष देतात आणि मुख्य म्हणे शिक्षक चांगले शिकवत आहेत की नाही, हे बघण्यासाठी हेडमास्तर नेहमीच शाळेचा राऊंड घेत असतात. ते खिडकीबाहेर दिसले तरी मुले लगेच शिकण्यात मग्न असल्याचे भाव चेहऱ्यावर आणतात. हेडमास्तर निघून गेले की चुळबुळ, गोंधळ सुरू होतो. पण हेडमास्तर स्वत: क्लास घ्यायला येणार असतील तर? जाम टेन्शन येतं. असेच टेन्शन गेले तीन दिवस भाजपाच्या नेत्यांनी अनुभवले. हेडमास्तरी खाक्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांचा तीन दिवसांचा क्लास घेतला. क्लास टीचर देवेंद्र फडणवीस यांच्या शिकवण्यावर (कारभारावर) त्यांनी पूर्ण समाधान व्यक्त तर केलेच, शिवाय त्यांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असेही सांगून टाकले. भाजपा श्रेष्ठी फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे त्यावरून स्पष्ट झालं. शेतकरी आंदोलन नीट हाताळले नाही, तुरीच्या मुद्यावर सरकारची पंचाईत झाली असे ‘फीलर्स’ दिल्लीत गेले काही दिवस पाठविले जात होते. त्यामागे फडणवीस यांना हटवून अन्य कुणाला मुख्यमंत्री करा, हा उद्देश नव्हता. कारण सहावा मजला आपल्यासाठी दूर आहे, याची जाणीव भाजपातील सर्वांनाच आहे. पण गेल्या काही महिन्यांतील अशांत वातावरणासाठी फडणवीस यांना लक्ष्य करावे आणि त्यानिमित्ताने श्रेष्ठींच्या दरबारी त्यांना किमान नजर तरी लागावी, असा उद्देश होता. शहा यांनी फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे मुंबई भेटीत बिनदिक्कतपणे सांगत सर्वच शक्यतांवर पडदा टाकला. मुख्यमंत्री हे इतर मंत्र्यांना विश्वासात घेत नाहीत. सर्व ठिकाणी फक्त त्यांचेच फोटो असतात, अशा कुरबुरीदेखील दोन मंत्री दबलेल्या आवाजात करीत असतात. मात्र, फडणवीस यांचे टीम वर्क अतिशय चांगले आहे आणि ते सगळ्यांना घेऊन राज्याचा कारभार करीत असल्याचं प्रमाणपत्रही शहा यांनी देऊन फडणवीस यांना शाबासकी दिली. करडी नजर आणि शिस्तीच्या त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुणाची प्रशंसा करणे, हे दुरापास्तच असल्याचे भाजपाचे नेते सांगतात. या पार्श्वभूमीवर शहांनी केलेलं कौतुक महत्त्वाचे ठरते. राज्यात मध्यावधी निवडणुकीला आम्ही तयार असल्याचे विधान शहांच्या मुंबई भेटीच्या एक दिवस आधी करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली होती. तथापि, मध्यावधी होणार नाही, फडणवीस सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे अमित शहांनी त्याच्या तिसऱ्याच दिवशी सांगून टाकले. भाजपाशिवाय मध्यावधी निवडणूक आज कोणत्याही पक्षाला आर्थिकदृष्ट्या सोसणार नाही. आता मध्यावधीची खुमखुमी असलेले शिवसेना, राष्ट्रवादीसारखे पक्ष उद्या खरेच निवडणूक लागली तर अर्धे रिकामे झालेले दिसतील, हे लिहून ठेवा. एकदाची मध्यावधी निवडणूक घेऊनच टाकावी आणि पूर्ण बहुमत मिळवून शिवसेनेची साथ सोडावी, असे भाजपातील काही नेत्यांच्या मनात आहे. मात्र, मध्यंतरी संघर्ष यात्रेच्या प्रवासात एकमेकांच्या जवळ आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांनी उद्या मॅडम वा साहेब काहीही म्हणोत यापुढे विधानसभेची निवडणूक युती करूनच लढवायची, असे ठरवून टाकले आहे. उद्या मध्यावधी झालीच तर काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढतील. भाजपाने सर्वच मतदारसंघांमध्ये ताकद वाढविण्याची भूमिका घेतलेली आहे. याचा अर्थ शिवसेनेशी युती करण्याचा भाजपाचा मूड नाही. १२२ जागा जिंकलेल्या भाजपाला जागावाटपात शिवसेनेपेक्षा कमी वाटा कदापिही मान्य होणार नाही. शिवसेना लहान भाऊ होणे मान्य करणार नाही. त्यामुळे भाजपा-शिवसेना युतीची शक्यता नाही. म्हणजे हे दोघे एकमेकांविरुद्ध लढतील आणि त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रितपणे लढतील. या दोघांचे एकत्र येणे अपरिहार्य असले तरी त्याचा मोठा फटका भाजपाला बसेल. त्यामुळे आज हा पक्षदेखील मध्यावधीच्या मूडमध्ये नाही. निवडणूक कोणालाही नको आहे, असा त्याचा अर्थ आहे. - यदु जोशी