शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

सात-बारा कोरा कराच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2017 10:24 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना नवा नाही. मराठवाड्याच्या लातूर, उस्मानाबाद, बीड आणि शेजारच्या सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले

राजेंद्र दर्डा, एडीटर- इन- चिफ,  लोकमत वृत्तपत्र समूह
 
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना नवा नाही. मराठवाड्याच्या लातूर, उस्मानाबाद, बीड आणि शेजारच्या सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. बीडमध्ये पाच जणांचा जीव गेला. याशिवाय हाता-तोंडाशी आलेला गहू, हरभरा, ज्वारीची दाणादाण झाली. आंबा गेला आणि शेतकरी पुन्हा नागवा झाला. अशा नियमित येणाऱ्या संकटांना सामोरे जात शेती करावी लागते व पीक हाती आलेच तर बाजार पडलेला असतो. कधी दुष्काळ भाजून काढतो. अर्थ एकच शेतकऱ्याची अवस्था पीक हाती येऊन आणि न येऊन सारखीच असते. महाराष्ट्रात १९८६ साली यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याने पत्नी आणि चार मुलांसह आत्महत्या केली. ही पहिली घटना होती. तेव्हापासून सुरू झालेले सत्र तीस वर्षांत थांबले नाही. गेल्या सोळा वर्षांत महाराष्ट्रात तेरा हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी केवळ कर्जबाजारीपणामुळे जीवन संपविले. आपण कोणाचे तरी देणे लागतो; पण परतफेड करू शकत नाही. त्यामुळे होणारी मानहानी आणि घुसमटीतून तो मरण पत्करतो. ही घटनाच ‘शेतकरी राजा’ मानणाऱ्या महाराष्ट्रात भयानक आहे. आता शेतकऱ्याची आत्महत्या गंभीरपणे कोणी घेत नाही इतक्या संवेदना बोथट झाल्या. या दुष्टचक्रातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी २००८ साली केंद्रातील काँग्रेसच्या पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारने कर्जमाफी दिली तब्बल ६० हजार कोटींची! उत्पादन खर्च आणि बाजारभाव यातील असमतोलामुळे परिस्थिती काही सुधारली नाही. शेती व शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी पुन्हा एकदा सरकारने त्याचा सात-बारा कोरा करण्याची गरज निर्माण झाली आहे. या मुद्यावर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष आक्रमक असतानाच सरकारमधील घटक पक्ष असलेली शिवसेनाही आक्रमक झाली आहे. सत्ताधारी भाजपचाही विरोध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारही तेवढेच संवेदनशील आहेत, त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या जवळून पाहिल्या आहेत. उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. पंतप्रधानांचा शब्द असल्याने ते पूर्ण होईलच. महाराष्ट्रात तर सरकार आणि विरोधी पक्ष साऱ्यांचीच ही मनोधारणा असताना शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास कोणती आडकाठी आहे? देशातील दहा बड्या उद्योगपतींकडे असलेल्या थकीत कर्जाचा आकडा पाहता यातील एकाच्या थकबाकीएवढेच महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज असेल. आजही ६० टक्के रोजगार शेतीवरच अवलंबून आहे; सरकारने या अधिवेशनातच कर्जमाफीची घोषणा करून शेती व शेतकऱ्याला उभारी दिली तर दोघेही वाचतील. उत्तर प्रदेशात सात-बारा कोरा होत असेल तर पुरोगामी महाराष्ट्रात का नाही?