शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

सेवा सुधार संकल्प

By admin | Updated: February 26, 2016 04:38 IST

भाडेवाढ केली किंवा टाळली आणि आपल्या विशिष्ट भूप्रदेशाला नवे काही दिले अथवा न दिले याच निकषांवर सामान्यत: रेल्वेच्या अर्थसंकल्पाकडे किमान सामान्य प्रवासी तरी पाहात

भाडेवाढ केली किंवा टाळली आणि आपल्या विशिष्ट भूप्रदेशाला नवे काही दिले अथवा न दिले याच निकषांवर सामान्यत: रेल्वेच्या अर्थसंकल्पाकडे किमान सामान्य प्रवासी तरी पाहात असतो आणि याच निकषांचा विचार केला तर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कोकणपुत्र आणि मुंबईकर असूनही दोहोंच्या पदरी निराशा टाकली पण आहे त्या भाड्यात वाढ केली नाही हे नशीब, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाणे स्वाभाविक आहे. केन्द्रातील रालोआ सरकारचा संपूर्ण वर्षाचा हा पहिला अर्थसंकल्प. रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाची गरज काय आणि ब्रिटीशांनी सुरु केलेल्या परंपरेचे पालन सुरु ठेवण्याची आवश्यकता काय अशी चर्चा रालोआ सत्तेत आल्यानंतर सुरु झाली होती. पण प्रभू यांनी लागोपाठ दुसरा अर्थसंकल्प सादर केल्याने त्या चर्चेला विराम मिळाला असावा असे गृहीत धरायला हरकत नाही. त्यांच्या आधीच्या अर्थसंकल्पाप्रमाणेच आगामी वर्षाच्या संकल्पातदेखील आहे तीच सेवा अधिक सुदृढ, सुरक्षित, जलद आणि ‘यूजर फ्रेन्डली’ कशी करता येईल यावर भर दिलेला दिसतो. त्यासाठी त्यांनी योजलेले उपाय सर्वसामान्य प्रवाशांना अगदी नजीकच्या काळात थेट लाभ मिळवून देतीलच असे या प्रवाशांना वाटत नसल्याने अर्थसंकल्प चटकदार नाही. त्यातच अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमाद्वारे काही वाढीव सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्या तरी एकूण प्रवाशांपैकी किती टक्क््यांचे अशा आधुनिक उपकरणांशी सख्य आहे, हा एक प्रश्नच आहे. रेल्वेचा प्रवास अनेकांच्या अंगावर येतो त्याचे महत्वाचे कारण म्हणजे डब्यांमधील आणि रेल्वे स्थानकांमधील स्वच्छतागृहे. ती स्वच्छ असावी म्हणून प्रभूंनी काही विशेष तरतुदी केल्या आहेत. तरतुदी भले स्मार्ट असल्या तरी त्यांच्या माध्यमातून प्रवाशांचा ज्यांच्याशी संबंध येणार ते रेल्वे कामगार आणि कर्मचारी किती स्मार्ट बनतात त्यावर या योजनांचे यश अवलंबून राहील. फलाटावरील हमालाना पोर्टर म्हणण्याऐवजी सहाय्यक संबोधले जाण्याने व त्यांच्या गणवेशात बदल करण्याने संबंधिताना सामाजिक प्रतिष्ठा काहीशी उंचावल्याचे मानसिक समाधान मात्र जरुर मिळू शकेल. चटकदार आणि चमकदार घोषणा टाळून सेवा सुधार करण्याचा संकल्प गरजेचाच असला तरी तो सिद्धीस नेण्यातच खरे कौशल्य असून गुरुवारी सादर झालेल्या या संकल्पाचे खरे मूल्यमापन वर्षभराने करणेच अधिक योग्य होईल.