शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

सेवा सुधार संकल्प

By admin | Updated: February 26, 2016 04:38 IST

भाडेवाढ केली किंवा टाळली आणि आपल्या विशिष्ट भूप्रदेशाला नवे काही दिले अथवा न दिले याच निकषांवर सामान्यत: रेल्वेच्या अर्थसंकल्पाकडे किमान सामान्य प्रवासी तरी पाहात

भाडेवाढ केली किंवा टाळली आणि आपल्या विशिष्ट भूप्रदेशाला नवे काही दिले अथवा न दिले याच निकषांवर सामान्यत: रेल्वेच्या अर्थसंकल्पाकडे किमान सामान्य प्रवासी तरी पाहात असतो आणि याच निकषांचा विचार केला तर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कोकणपुत्र आणि मुंबईकर असूनही दोहोंच्या पदरी निराशा टाकली पण आहे त्या भाड्यात वाढ केली नाही हे नशीब, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाणे स्वाभाविक आहे. केन्द्रातील रालोआ सरकारचा संपूर्ण वर्षाचा हा पहिला अर्थसंकल्प. रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाची गरज काय आणि ब्रिटीशांनी सुरु केलेल्या परंपरेचे पालन सुरु ठेवण्याची आवश्यकता काय अशी चर्चा रालोआ सत्तेत आल्यानंतर सुरु झाली होती. पण प्रभू यांनी लागोपाठ दुसरा अर्थसंकल्प सादर केल्याने त्या चर्चेला विराम मिळाला असावा असे गृहीत धरायला हरकत नाही. त्यांच्या आधीच्या अर्थसंकल्पाप्रमाणेच आगामी वर्षाच्या संकल्पातदेखील आहे तीच सेवा अधिक सुदृढ, सुरक्षित, जलद आणि ‘यूजर फ्रेन्डली’ कशी करता येईल यावर भर दिलेला दिसतो. त्यासाठी त्यांनी योजलेले उपाय सर्वसामान्य प्रवाशांना अगदी नजीकच्या काळात थेट लाभ मिळवून देतीलच असे या प्रवाशांना वाटत नसल्याने अर्थसंकल्प चटकदार नाही. त्यातच अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमाद्वारे काही वाढीव सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्या तरी एकूण प्रवाशांपैकी किती टक्क््यांचे अशा आधुनिक उपकरणांशी सख्य आहे, हा एक प्रश्नच आहे. रेल्वेचा प्रवास अनेकांच्या अंगावर येतो त्याचे महत्वाचे कारण म्हणजे डब्यांमधील आणि रेल्वे स्थानकांमधील स्वच्छतागृहे. ती स्वच्छ असावी म्हणून प्रभूंनी काही विशेष तरतुदी केल्या आहेत. तरतुदी भले स्मार्ट असल्या तरी त्यांच्या माध्यमातून प्रवाशांचा ज्यांच्याशी संबंध येणार ते रेल्वे कामगार आणि कर्मचारी किती स्मार्ट बनतात त्यावर या योजनांचे यश अवलंबून राहील. फलाटावरील हमालाना पोर्टर म्हणण्याऐवजी सहाय्यक संबोधले जाण्याने व त्यांच्या गणवेशात बदल करण्याने संबंधिताना सामाजिक प्रतिष्ठा काहीशी उंचावल्याचे मानसिक समाधान मात्र जरुर मिळू शकेल. चटकदार आणि चमकदार घोषणा टाळून सेवा सुधार करण्याचा संकल्प गरजेचाच असला तरी तो सिद्धीस नेण्यातच खरे कौशल्य असून गुरुवारी सादर झालेल्या या संकल्पाचे खरे मूल्यमापन वर्षभराने करणेच अधिक योग्य होईल.