शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

गांभीर्य आणि विनोदाची सरमिसळ!

By admin | Updated: November 28, 2015 01:06 IST

मनोरंजनात्मक चित्रपट करतानाच त्याला एखाद्या सामाजिक विषयाची जोड दिली, तर तो चित्रपट जास्त ‘अपील’ होऊ शकतो, असा प्रकार आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांनी हाताळला आहे.

मनोरंजनात्मक चित्रपट करतानाच त्याला एखाद्या सामाजिक विषयाची जोड दिली, तर तो चित्रपट जास्त ‘अपील’ होऊ शकतो, असा प्रकार आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांनी हाताळला आहे. ‘शिनमा’ हा चित्रपटही त्याहून वेगळा नाही. पण दुष्काळ आणि पाणी प्रश्नाची मांडणी करतानाच या चित्रपटात गांभीर्य आणि विनोदाची सरमिसळ झाली आहे. तसे झाले नसते, तर हा एक महत्त्वाचा सामाजिक चित्रपट ठरू शकला असता.‘सिनेमातला सिनेमा’ असा या चित्रपटाचा थाट आहे. के. वासू या मुळातल्या उत्तम माहितीपट बनवणाऱ्या दिग्दर्शकाच्या पुढे नियतीच्या फेऱ्यामुळे ‘सी-ग्रेड’चे चित्रपट बनवण्याची वेळ आलेली असते. त्यातच हिंदीतला ‘शोले’ हा चित्रपट मराठीत तयार करण्याची त्याला कल्पना सुचते. त्यानुसार तो व त्याचा सहकारी पंकज, एका निर्मात्याला पटवून चित्रपटाची सगळी टीम तयार करतात. धूळपाटी या दुष्काळी गावात चित्रपटाचे शूटिंग करायचे ठरते. पण तिथे शूटिंग करतानाच के. वासूच्या संपर्कात आलेला तिथला सामाजिक कार्यकर्ता गावातल्या पाणी प्रश्नाला चित्रपटातून वाचा फोडण्यासाठी गळ घालतो. आयत्या वेळी अंगावर आलेले हे प्रकरण के. वासू दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो; पण शेवटी तो हा प्रश्न चित्रपटात घेतो. शूटिंगच्या सेटवर निर्माण होणारे हलकेफुलके प्रसंग आणि सोबत पाणी प्रश्नाचा केलेला गंभीर ऊहापोह असा बाज या चित्रपटाने स्वीकारला आहे.चित्रपटाचा विषय तसा चांगला असला तरी कथा, पटकथा व दिग्दर्शन अशी जबाबदारी सांभाळणाऱ्या मिलिंद कवडे यांनी त्याला सिनेमाच्या शूटिंगचे जे कोंदण दिले आहे, त्याची आवश्यकता वाटत नाही. केवळ मनोरंजनाची पेरणी असावी म्हणून हा खटाटोप त्यांनी केला असावा. या चित्रपटातून दिग्दर्शकाला पाणी प्रश्नावरच ठामपणे बोलायचे आहे हे स्पष्ट होत असताना, त्याला विनोदाची फोडणी देण्याची गरज नव्हती. यातल्या व्यक्तिरेखांच्या तोंडून दिग्दर्शक दुष्काळाचे भीषण वास्तव वदवून घेत असताना, यात पेरलेले विनोद ओढूनताणून निर्माण केले गेल्याचे स्पष्ट होत जाते. यातले काही प्रसंग अनावश्यक वाटतात. या चित्रपटातले आयटम साँग कितीही चांगले झाले असले, तरी ती या चित्रपटाची गरज ठरू शकत नाही.या सिनेमातल्या सिनेमाचा दिग्दर्शक के. वासू याच्या भूमिकेत अजिंक्य देव याने एकहाती कामगिरी बजावली आहे आणि त्याने त्याच्या अनुभवाच्या जोरावर या भूमिकेला चांगला न्याय दिला आहे. त्याला विजय पाटकर यांची योग्य साथ लाभली आहे. यतीन कार्येकर, किशोरी शहाणे, आनंदा कारेकर, गुरलीन चोप्रा, गणेश यादव, अंशुमन विचारे, सौरभ गोखले या व अशा कलाकारांची मोठी फळी चित्रपटात आहे आणि त्यांनी त्यांचे योगदान या चित्रपटात दिले आहे. विनोद व सामाजिक प्रश्न या दोन बाबींत या चित्रपटाचा गोंधळ झाला आहे; अन्यथा दुष्काळ या विषयावर एक चांगला सामाजिक चित्रपट यातून निर्माण होणे अवघड नव्हते.