शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

तोंड दाखवून अवलक्षण

By admin | Updated: May 26, 2017 01:32 IST

बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमावर्ती भागातील समस्त मराठीभाषिक मुलुख महाराष्ट्रात सामील झाला पाहिजे, ही महाराष्ट्राची गेली पन्नासहून अधिक वर्षे जुनी मागणी.

बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमावर्ती भागातील समस्त मराठीभाषिक मुलुख महाराष्ट्रात सामील झाला पाहिजे, ही महाराष्ट्राची गेली पन्नासहून अधिक वर्षे जुनी मागणी. त्यासाठी अनेकदा आंदोलनं झाली. आजही महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमाभागातील काही संघटना या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. दोन्ही बाजूंची तिथेच खरी कसोटी लागणार आहे. असे असताना उगीच बेटकुळ्या दाखविण्यात अर्थ नाही. कर्नाटकचे एक तोंडाळ मंत्री रोशन बेग यांनी एकलेचे तारे तोडले म्हणून त्यांना ‘जय महाराष्ट्र’ घालण्याचा उठवळपणा करण्याची दिवाकर रावते आणि दीपक सावंत या शिवसेना नेत्यांना काही गरज नव्हती. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावात आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी व्हायचेच होते, तर गनिमीकावा करता आला असता. मात्र, रावतेंना प्रसिद्धीचा सोस भारी ! कोल्हापुरात पोहोचताच त्यांनी ‘बातमी’ देऊन कर्नाटकची पोलीस यंत्रणा जागी केली. निपाणीच्या अलीकडेच त्यांना अडविले गेले. तिथेच ‘जय महाराष्ट्र’ ठोकून रावते परतले ! कधीकाळी सीमाप्रश्न हा शिवसेनेचा अस्मितेचा विषय होता. बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रश्नावर नेहमीच सडेतोड भूमिका घेतली. इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, यांची गय केली नाही. स्वत: आंदोलनात उतरले. १९६९ साली मुंबईत आलेले उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांची गाडी शिवसैनिकांनी अडविली. पोलिसांनी लाठीमार केला आणि ठिणगी पडली. बाळासाहेबांना अटक झाली. मुंबई पेटली. १९८७ साली छगन भुजबळांनी बेळगावात केलेलं आंदोलन तर आजही स्मरणात आहे. बाळासाहेब ठाकरे, एस. एम. जोशी, एन. डी. पाटील, शरद पवार हे नेते बेळगावात सत्याग्रह करणार होते. पूर्वतयारीची जबाबदारी भुजबळांकडे होती. पण भुजबळांना बेळगावामध्ये पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका कर्नाटक सरकारने घेतली. सीमाभागात प्रचंड पोलीस फाटा तैनात करण्यात आला. भुजबळांनी शक्कल लढवली. वेशांतर करून आणि लोखंडी पाइपचा कारखानदार बनून त्यांनी बेळगावात प्रवेश मिळवला. पोलिसांच्या नाकावर टिच्चून त्यांनी तिथं मोठं आंदोलन केलं. अटक झाल्यानंतर त्यांची खरी ओळख पटली. भुजबळांच्या तोडीचा एकही नेता सध्या शिवसेनेत उरलेला नाही. त्यामुळे तोंडदाखले आंदोलन करून नामुष्की ओढावून घेण्याची पाळी आली. वाघांचे वाघरू झाले की असेच होते !