शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

तोंड दाखवून अवलक्षण

By admin | Updated: May 26, 2017 01:32 IST

बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमावर्ती भागातील समस्त मराठीभाषिक मुलुख महाराष्ट्रात सामील झाला पाहिजे, ही महाराष्ट्राची गेली पन्नासहून अधिक वर्षे जुनी मागणी.

बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमावर्ती भागातील समस्त मराठीभाषिक मुलुख महाराष्ट्रात सामील झाला पाहिजे, ही महाराष्ट्राची गेली पन्नासहून अधिक वर्षे जुनी मागणी. त्यासाठी अनेकदा आंदोलनं झाली. आजही महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमाभागातील काही संघटना या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. दोन्ही बाजूंची तिथेच खरी कसोटी लागणार आहे. असे असताना उगीच बेटकुळ्या दाखविण्यात अर्थ नाही. कर्नाटकचे एक तोंडाळ मंत्री रोशन बेग यांनी एकलेचे तारे तोडले म्हणून त्यांना ‘जय महाराष्ट्र’ घालण्याचा उठवळपणा करण्याची दिवाकर रावते आणि दीपक सावंत या शिवसेना नेत्यांना काही गरज नव्हती. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावात आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी व्हायचेच होते, तर गनिमीकावा करता आला असता. मात्र, रावतेंना प्रसिद्धीचा सोस भारी ! कोल्हापुरात पोहोचताच त्यांनी ‘बातमी’ देऊन कर्नाटकची पोलीस यंत्रणा जागी केली. निपाणीच्या अलीकडेच त्यांना अडविले गेले. तिथेच ‘जय महाराष्ट्र’ ठोकून रावते परतले ! कधीकाळी सीमाप्रश्न हा शिवसेनेचा अस्मितेचा विषय होता. बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रश्नावर नेहमीच सडेतोड भूमिका घेतली. इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, यांची गय केली नाही. स्वत: आंदोलनात उतरले. १९६९ साली मुंबईत आलेले उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांची गाडी शिवसैनिकांनी अडविली. पोलिसांनी लाठीमार केला आणि ठिणगी पडली. बाळासाहेबांना अटक झाली. मुंबई पेटली. १९८७ साली छगन भुजबळांनी बेळगावात केलेलं आंदोलन तर आजही स्मरणात आहे. बाळासाहेब ठाकरे, एस. एम. जोशी, एन. डी. पाटील, शरद पवार हे नेते बेळगावात सत्याग्रह करणार होते. पूर्वतयारीची जबाबदारी भुजबळांकडे होती. पण भुजबळांना बेळगावामध्ये पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका कर्नाटक सरकारने घेतली. सीमाभागात प्रचंड पोलीस फाटा तैनात करण्यात आला. भुजबळांनी शक्कल लढवली. वेशांतर करून आणि लोखंडी पाइपचा कारखानदार बनून त्यांनी बेळगावात प्रवेश मिळवला. पोलिसांच्या नाकावर टिच्चून त्यांनी तिथं मोठं आंदोलन केलं. अटक झाल्यानंतर त्यांची खरी ओळख पटली. भुजबळांच्या तोडीचा एकही नेता सध्या शिवसेनेत उरलेला नाही. त्यामुळे तोंडदाखले आंदोलन करून नामुष्की ओढावून घेण्याची पाळी आली. वाघांचे वाघरू झाले की असेच होते !