शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

तोंड दाखवून अवलक्षण

By admin | Updated: May 26, 2017 01:32 IST

बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमावर्ती भागातील समस्त मराठीभाषिक मुलुख महाराष्ट्रात सामील झाला पाहिजे, ही महाराष्ट्राची गेली पन्नासहून अधिक वर्षे जुनी मागणी.

बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमावर्ती भागातील समस्त मराठीभाषिक मुलुख महाराष्ट्रात सामील झाला पाहिजे, ही महाराष्ट्राची गेली पन्नासहून अधिक वर्षे जुनी मागणी. त्यासाठी अनेकदा आंदोलनं झाली. आजही महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमाभागातील काही संघटना या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. दोन्ही बाजूंची तिथेच खरी कसोटी लागणार आहे. असे असताना उगीच बेटकुळ्या दाखविण्यात अर्थ नाही. कर्नाटकचे एक तोंडाळ मंत्री रोशन बेग यांनी एकलेचे तारे तोडले म्हणून त्यांना ‘जय महाराष्ट्र’ घालण्याचा उठवळपणा करण्याची दिवाकर रावते आणि दीपक सावंत या शिवसेना नेत्यांना काही गरज नव्हती. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावात आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी व्हायचेच होते, तर गनिमीकावा करता आला असता. मात्र, रावतेंना प्रसिद्धीचा सोस भारी ! कोल्हापुरात पोहोचताच त्यांनी ‘बातमी’ देऊन कर्नाटकची पोलीस यंत्रणा जागी केली. निपाणीच्या अलीकडेच त्यांना अडविले गेले. तिथेच ‘जय महाराष्ट्र’ ठोकून रावते परतले ! कधीकाळी सीमाप्रश्न हा शिवसेनेचा अस्मितेचा विषय होता. बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रश्नावर नेहमीच सडेतोड भूमिका घेतली. इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, यांची गय केली नाही. स्वत: आंदोलनात उतरले. १९६९ साली मुंबईत आलेले उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांची गाडी शिवसैनिकांनी अडविली. पोलिसांनी लाठीमार केला आणि ठिणगी पडली. बाळासाहेबांना अटक झाली. मुंबई पेटली. १९८७ साली छगन भुजबळांनी बेळगावात केलेलं आंदोलन तर आजही स्मरणात आहे. बाळासाहेब ठाकरे, एस. एम. जोशी, एन. डी. पाटील, शरद पवार हे नेते बेळगावात सत्याग्रह करणार होते. पूर्वतयारीची जबाबदारी भुजबळांकडे होती. पण भुजबळांना बेळगावामध्ये पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका कर्नाटक सरकारने घेतली. सीमाभागात प्रचंड पोलीस फाटा तैनात करण्यात आला. भुजबळांनी शक्कल लढवली. वेशांतर करून आणि लोखंडी पाइपचा कारखानदार बनून त्यांनी बेळगावात प्रवेश मिळवला. पोलिसांच्या नाकावर टिच्चून त्यांनी तिथं मोठं आंदोलन केलं. अटक झाल्यानंतर त्यांची खरी ओळख पटली. भुजबळांच्या तोडीचा एकही नेता सध्या शिवसेनेत उरलेला नाही. त्यामुळे तोंडदाखले आंदोलन करून नामुष्की ओढावून घेण्याची पाळी आली. वाघांचे वाघरू झाले की असेच होते !