शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तोंड दाखवून अवलक्षण

By admin | Updated: May 26, 2017 01:32 IST

बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमावर्ती भागातील समस्त मराठीभाषिक मुलुख महाराष्ट्रात सामील झाला पाहिजे, ही महाराष्ट्राची गेली पन्नासहून अधिक वर्षे जुनी मागणी.

बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमावर्ती भागातील समस्त मराठीभाषिक मुलुख महाराष्ट्रात सामील झाला पाहिजे, ही महाराष्ट्राची गेली पन्नासहून अधिक वर्षे जुनी मागणी. त्यासाठी अनेकदा आंदोलनं झाली. आजही महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमाभागातील काही संघटना या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. दोन्ही बाजूंची तिथेच खरी कसोटी लागणार आहे. असे असताना उगीच बेटकुळ्या दाखविण्यात अर्थ नाही. कर्नाटकचे एक तोंडाळ मंत्री रोशन बेग यांनी एकलेचे तारे तोडले म्हणून त्यांना ‘जय महाराष्ट्र’ घालण्याचा उठवळपणा करण्याची दिवाकर रावते आणि दीपक सावंत या शिवसेना नेत्यांना काही गरज नव्हती. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावात आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी व्हायचेच होते, तर गनिमीकावा करता आला असता. मात्र, रावतेंना प्रसिद्धीचा सोस भारी ! कोल्हापुरात पोहोचताच त्यांनी ‘बातमी’ देऊन कर्नाटकची पोलीस यंत्रणा जागी केली. निपाणीच्या अलीकडेच त्यांना अडविले गेले. तिथेच ‘जय महाराष्ट्र’ ठोकून रावते परतले ! कधीकाळी सीमाप्रश्न हा शिवसेनेचा अस्मितेचा विषय होता. बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रश्नावर नेहमीच सडेतोड भूमिका घेतली. इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, यांची गय केली नाही. स्वत: आंदोलनात उतरले. १९६९ साली मुंबईत आलेले उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांची गाडी शिवसैनिकांनी अडविली. पोलिसांनी लाठीमार केला आणि ठिणगी पडली. बाळासाहेबांना अटक झाली. मुंबई पेटली. १९८७ साली छगन भुजबळांनी बेळगावात केलेलं आंदोलन तर आजही स्मरणात आहे. बाळासाहेब ठाकरे, एस. एम. जोशी, एन. डी. पाटील, शरद पवार हे नेते बेळगावात सत्याग्रह करणार होते. पूर्वतयारीची जबाबदारी भुजबळांकडे होती. पण भुजबळांना बेळगावामध्ये पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका कर्नाटक सरकारने घेतली. सीमाभागात प्रचंड पोलीस फाटा तैनात करण्यात आला. भुजबळांनी शक्कल लढवली. वेशांतर करून आणि लोखंडी पाइपचा कारखानदार बनून त्यांनी बेळगावात प्रवेश मिळवला. पोलिसांच्या नाकावर टिच्चून त्यांनी तिथं मोठं आंदोलन केलं. अटक झाल्यानंतर त्यांची खरी ओळख पटली. भुजबळांच्या तोडीचा एकही नेता सध्या शिवसेनेत उरलेला नाही. त्यामुळे तोंडदाखले आंदोलन करून नामुष्की ओढावून घेण्याची पाळी आली. वाघांचे वाघरू झाले की असेच होते !