शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

सुरक्षा महत्त्वाची की...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 04:14 IST

चालत्या रेल्वेत चढणे गुन्हा नाही, असा काहीसा अनाकलनीय वाटणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. एक प्रवासी रेल्वे

चालत्या रेल्वेत चढणे गुन्हा नाही, असा काहीसा अनाकलनीय वाटणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. एक प्रवासी रेल्वे स्थानकावर टुथब्रश खरेदीसाठी उतरला. दरम्यान, रेल्वेगाडी सुरू झाली. चालत्या रेल्वेगाडीत बसण्याच्या प्रयत्नात तो पाय घसरून खाली पडला. त्यामुळे त्याचा डावा पाय मांडीपासून कापावा लागला. असे हे प्रकरण होते. वरकरणी पाहिले तर यात त्या प्रवाशाने काही गुन्हा केला नव्हता. न्यायालयाने नेमक्या याच बाबीवर बोट ठेवून त्याला रेल्वेकडून नुकसानभारपाई मिळवून दिली. येथे पीडिताला पैसा मिळाला ही चांगलीच गोष्ट झाली पण, रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आखून दिलेल्या नियमांचे काय? यावर मात्र न्यायालयाने भाष्य केले नाही. प्रत्येक आस्थापनात सुरक्षेच्या दृष्टीने नियम केले जातात. चालत्या रेल्वेत चढणे किंवा उतरणे, डब्याच्या छतावरून प्रवास करणे, डब्याच्या पायरीवर उभे राहून प्रवास करणे रेल्वेने निषिद्ध मानले असून त्यासाठी फौजदारी शिक्षेची तरतूदही केली आहे. पण अनेक प्रवासी या नियमांना जुमानत नाहीत. काही अतिउत्साही तरुण तर स्टंटबाजीच्या नादात आपल्यासोबतच इतरांचेही जीव धोक्यात टाकताना दिसतात. एकट्या मुंबईत रेल्वेशी संबंधित अपघातांत दरवर्षी तीन हजारांहून अधिक बळी जातात असा अहवाल आहे. न्यायालयानेच जर नियम न पाळणाऱ्यांना अभय दिले तर बेशिस्त लोकांना रोखणार कोण? योगायोग म्हणजे हा निर्णय झाला त्याच दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने दहिहंडीच्या संदर्भात एक महत्त्वाचा खुलासा केला. पाच वर्षांच्या मुलाला एवढ्या उंचावर चढविण्यात कसले आले आहे साहस अशा शब्दात कोर्टाने दहिहंडीच्या आयोजकांना आणि त्याचे समर्थन करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासनाला चांगलेच फटकारले. दहिहंडीचे मोठमोठे मनोरे रचविले जातात. सर्वात वर लहान मुलांना ठेवले जाते. अशा या ‘साहसी’ खेळात मोठ्यांचे मनोरंजन होते आणि त्या लहान मुलांचा जीव टांगणीला लागतो. हा साहसी क्रीडा प्रकार आहे असे काहीसे सांगून सरकार त्याचे समर्थन करू पाहत आहे. पण न्यायालयाने येथे सुरक्षा महत्त्वाची मानली हे येथे उल्लेखनीय आहे. त्याच्याच नागपूर खंडपीठाने मात्र चालत्या रेल्वेत चढणे किंवा उतरणे गुन्हा नाही असा निकाल देऊन प्रवाशांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. आता या निकालाच्या अनुषंगाने रेल्वेनेही जाहीर करून टाकावे, ‘चालत्या गाडीत बसणे, उतरणे किंवा टपावर बसून प्रवास करणे गुन्हा नसून ते साहसाचे काम आहे. यात दुर्दैवाने काही घडलेच तर आम्ही नुकसानभरपाई देण्यास बांधील आहोत.’