शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

सुरक्षा महत्त्वाची की...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 04:14 IST

चालत्या रेल्वेत चढणे गुन्हा नाही, असा काहीसा अनाकलनीय वाटणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. एक प्रवासी रेल्वे

चालत्या रेल्वेत चढणे गुन्हा नाही, असा काहीसा अनाकलनीय वाटणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. एक प्रवासी रेल्वे स्थानकावर टुथब्रश खरेदीसाठी उतरला. दरम्यान, रेल्वेगाडी सुरू झाली. चालत्या रेल्वेगाडीत बसण्याच्या प्रयत्नात तो पाय घसरून खाली पडला. त्यामुळे त्याचा डावा पाय मांडीपासून कापावा लागला. असे हे प्रकरण होते. वरकरणी पाहिले तर यात त्या प्रवाशाने काही गुन्हा केला नव्हता. न्यायालयाने नेमक्या याच बाबीवर बोट ठेवून त्याला रेल्वेकडून नुकसानभारपाई मिळवून दिली. येथे पीडिताला पैसा मिळाला ही चांगलीच गोष्ट झाली पण, रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आखून दिलेल्या नियमांचे काय? यावर मात्र न्यायालयाने भाष्य केले नाही. प्रत्येक आस्थापनात सुरक्षेच्या दृष्टीने नियम केले जातात. चालत्या रेल्वेत चढणे किंवा उतरणे, डब्याच्या छतावरून प्रवास करणे, डब्याच्या पायरीवर उभे राहून प्रवास करणे रेल्वेने निषिद्ध मानले असून त्यासाठी फौजदारी शिक्षेची तरतूदही केली आहे. पण अनेक प्रवासी या नियमांना जुमानत नाहीत. काही अतिउत्साही तरुण तर स्टंटबाजीच्या नादात आपल्यासोबतच इतरांचेही जीव धोक्यात टाकताना दिसतात. एकट्या मुंबईत रेल्वेशी संबंधित अपघातांत दरवर्षी तीन हजारांहून अधिक बळी जातात असा अहवाल आहे. न्यायालयानेच जर नियम न पाळणाऱ्यांना अभय दिले तर बेशिस्त लोकांना रोखणार कोण? योगायोग म्हणजे हा निर्णय झाला त्याच दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने दहिहंडीच्या संदर्भात एक महत्त्वाचा खुलासा केला. पाच वर्षांच्या मुलाला एवढ्या उंचावर चढविण्यात कसले आले आहे साहस अशा शब्दात कोर्टाने दहिहंडीच्या आयोजकांना आणि त्याचे समर्थन करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासनाला चांगलेच फटकारले. दहिहंडीचे मोठमोठे मनोरे रचविले जातात. सर्वात वर लहान मुलांना ठेवले जाते. अशा या ‘साहसी’ खेळात मोठ्यांचे मनोरंजन होते आणि त्या लहान मुलांचा जीव टांगणीला लागतो. हा साहसी क्रीडा प्रकार आहे असे काहीसे सांगून सरकार त्याचे समर्थन करू पाहत आहे. पण न्यायालयाने येथे सुरक्षा महत्त्वाची मानली हे येथे उल्लेखनीय आहे. त्याच्याच नागपूर खंडपीठाने मात्र चालत्या रेल्वेत चढणे किंवा उतरणे गुन्हा नाही असा निकाल देऊन प्रवाशांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. आता या निकालाच्या अनुषंगाने रेल्वेनेही जाहीर करून टाकावे, ‘चालत्या गाडीत बसणे, उतरणे किंवा टपावर बसून प्रवास करणे गुन्हा नसून ते साहसाचे काम आहे. यात दुर्दैवाने काही घडलेच तर आम्ही नुकसानभरपाई देण्यास बांधील आहोत.’