शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुसरा सामना

By admin | Updated: March 28, 2015 23:54 IST

एखाद्या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीस त्या शहराच्या पलीकडे फारसे कोणी महत्त्व देत नसते. मात्र वांद्रे पूर्वच्या निवडणुकीकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

एखाद्या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीस त्या शहराच्या पलीकडे फारसे कोणी महत्त्व देत नसते. मात्र वांद्रे पूर्वच्या निवडणुकीकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एक तर ती ‘मातोश्री’च्या परिसरातच होत असून, त्यामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे काँग्रेसच्या वतीने आपली आर या पार की लढाई लढत आहेत. राणे यांनी राज्याचे नेतृत्व केले असून, ते विकासपुरुष असल्याने, जनता त्यांनाच निवडून देईल, असा दावा केला जात आहे. वास्तविक यापूर्वी १९६७ साली मद्रास प्रांतात (तामिळनाडू) माजी मुख्यमंत्री के. कामराज यांचा पराभव द्रमुकचा विद्यार्थी नेता पी. सीनिवासनने केला, तर काँग्रेसचे मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांना द्रमुकच्याच उमेदवाराने चारीमुंड्या चीत केले. २०११ साली पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा त्यांच्याच माजी सचिवाने पराभव केला. तर १९६७ साली त्याच राज्याचे मुख्यमंत्री पी. सी. सेन यांना हार पत्करावी लागली होती. गेल्या वर्षी झारखंड विधानसभा निवडणुकीत अर्जुन मुंडा, बाबूलाल मरांडी व मधू कोडा हे तीन माजी मुख्यमंत्री पडले होते. थोडक्यात राज्याचे नेतृत्व केले म्हणजे कोणी अपयशी ठरतच नाही, असे नव्हे. २०१४ साली कुडाळ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला २२ हजार मतांची आघाडी मिळाली होती. तेथील विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गचा विकासपुरुष पराभूत झाला. सिंधुदुर्गमध्ये राणेंनी एकही प्रकल्प आणला नाही व त्यामुळे रोजगारही निर्माण झाला नाही, अशी तोफ डागत शिवसेनेचे वैभव नाईक विजयी झाले.दोन आठवड्यांपूर्वी राणे पक्ष सोडणार, भाजपामध्ये जाणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची निवड झाल्यानंतरची राणेंची नाराजी लपून राहिली नाही आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांची करण्यात आलेली निवडही चुकीची असल्याचे मत त्यांनी प्रकट केले होते. त्यानंतर चीनला जाऊन आल्यावरच काय तो निर्णय घेऊ, असे सांगून प्रत्यक्षात त्यांनी पक्षातच राहण्याचे ठरवले! गेल्या वर्षी त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावर तोफ डागून मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ते पक्षत्याग करणार, अशीच चिन्हे होती. बाबांच्या जागी कार्यसम्राटास मुख्यमंत्री करावे, अशी इच्छा त्यांच्या समर्थकांतर्फे व्यक्त झाली. मात्र निवडणूक प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती होताच राणेंचे तथाकथित बंड शमले. सफाया झाल्यावर त्यांनी पुन्हा एकदा बाबांवर तोंडसुख घेतले. आता वांद्र्यात राणेंच्या मागे काँग्रेस पक्ष किती ताकदीने उभा राहतो, हा प्रश्न आहे. तसे न झाल्यास व परत पदरी पराभव आल्यास राणे प्रदेश नेतृत्वावर तोंडसुख घेतील, याची खात्री बाळगावी!दिवंगत बाळा सावंत यांच्या पत्नीस सहानुभूतीचा लाभ होऊ शकतो. गेल्या वेळी मतांबाबत दुसऱ्या क्रमांकावर भाजपाचे पारकर होते. या वेळी भाजपा सेनेमागे मनापासून उभे राहील काय, हे पाहावे लागेल. याचे कारण ‘मातोश्री’वरून आणि ‘सामना’मधून रोजच्या रोज मोदी व फडणवीस सरकारला इशारे दिले जात आहेत. मोदी-शहा व शरद पवार यांचे इतके मेतकूट जमले आहे की महायुती सरकारमधून आपण बाहेर पडायचीच हे त्रिकूट वाट बघत आहे, अशी सेनेची भावना झाली आहे.वांद्र्यात एमआयएमला एकूण ८० हजार मुस्लीम मतांपैकी २३ हजार मते मिळाली होती. घरवापसी आणि राज्यातील गोवधबंदी यामुळे मुस्लीम मते महायुतीकडे जाणे कठीण आहे. त्यांचे विभाजन कसे होते, यावर बरेच काही अवलंबून असेल. मनसेने निवडणूक न लढवून कोणालाच पाठिंबा दिला नसला, तरी मराठी मते मुख्यत: महायुतीकडेच वळतील. जनार्दन चांदूरकर निवडून येत असतानाची दलित मते या वेळी काँग्रेसच्या पारड्यात कितपत पडतील, हे सांगता येत नाही.या निवडणुकीत तृप्ती सावंत यांचा पराभव झाल्यास, सेना-भाजपा यांच्यातील संबंध बिघडतील. त्या जिंकल्यास सेनेचा आत्मविश्वास वाढेल. उलट राणेंचा विजय झाल्यास विधानसभेत जरी राधाकृष्ण विरोधी पक्षनेते असले, तरी डिफॅक्टो नेते आपणच असल्याच्या थाटात राणे वावरतील. तसे झाल्यास विधानसभेत सेना विरु द्ध राणे हा दुसरा सामना रंगात येईल. या सगळ्यामध्ये वांद्र्यातील शासकीय वसाहतीचे पुनर्वसन, झोपडपट्ट्यांतील सुविधा इत्यादी समस्या मात्र पूर्वीपमाणेच दुर्लक्षित राहतील!नरेंद्र मोदींनी वाराणसीतून निवडणूक लढवली, तेव्हा त्यांचा त्या शहराशी काय संबंध, असा सवाल काँग्रेसच्या वतीने विचारण्यात आला. राणेंचे २५ वर्षे कोकणातच कार्यक्षेत्र राहिले असले, तरी आता ते माझे बालपण कसे खेरवाडीत गेले आहे, वगैरे सांगू लागले आहेत... वांद्र्यात एमआयएमला एकूण ८० हजार मुस्लीम मतांपैकी २३ हजार मते मिळाली होती. घरवापसी आणि राज्यातील गोवधबंदी यामुळे मुस्लीम मते महायुतीकडे जाणे कठीण आहे. त्यांचे विभाजन कसे होते, यावर बरेच काही अवलंबून असेल.हेमंत देसाई