शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

दुसरा दंतहीन वाघ

By admin | Updated: June 3, 2016 02:19 IST

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांच्याच पावलावर पाऊल टाकीत त्याच न्यायालयातून निवृत्त झालेले आणि देशाचे माजी सरन्यायाधीश राहिलेले

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांच्याच पावलावर पाऊल टाकीत त्याच न्यायालयातून निवृत्त झालेले आणि देशाचे माजी सरन्यायाधीश राहिलेले एच.एल.दत्तू यांनीदेखील भारतातील आणखी एका दंतहीन वाघाचा शोध लावला आहे. निवृत्तीनंतर काटजू यांची केन्द्र सरकारने प्रेस कौन्सीलच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. देशातील समस्त प्रसार माध्यमांवर वचक ठेवण्यासाठी निर्माण झालेली ही संस्था. परिणामी नियुक्ती झाली तेव्हां काटजू खूप उत्साहात होते. पण कामकाजास प्रारंभ केल्यानंतर हळूहळू त्यांचा उत्साह मावळत गेला आणि अखेरशेवटी तर त्यांनी प्रेस कौन्सीलला दंतहीन व्याघ्राचीच उपमा दिली. विविध माध्यमांच्या आणि विशेष करुन मुद्रित माध्यमांच्या विरोधातील तक्रारींचा निपटारा करण्याचे काम या कौन्सीलकडे असते. हे काम काहीसे न्यायिक पद्धतीचे असल्याचा स्वत: काटजू यांनी समज करुन घेतला असावा. प्रत्यक्षात मात्र ते केवळ एक कारकुनी काम आहे आणि एखादे माध्यम दोषी आढळले तरी आपण त्याला ना शिक्षा करु शकतो ना दंड करु शकतो व केवळ कोरडी समज देऊ शकतो (जिला कोणीही भीक घालीत नाही) हे त्यांच्या लक्षात आले. आणि मग त्यांनी जाहीरपणे (अर्थात पदावरुन पायउतार झाल्यानंतर) प्रेस कौन्सीलच्या अध्यक्षपदाला दात आणि नखे काढलेल्या वाघाची उपमा दिली. न्या. एच.एल.दत्तू सरन्यायाधीश पदावरुन निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष बनले. पण हा आयोगदेखील दात आणि नखे काढलेल्या वाघासमान असल्याचे जाहीर उद्गार आता त्यांनी काढले आहेत. मुळात सदरहू आयोग हा कायमच वादात राहिला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे आयोगाकडे केल्या जाणाऱ्या तक्रारी अनेकदा कायदे मोडणाऱ्या किंवा गुन्हेगारांच्या मानवी हक्कांसाठी झगडा देणाऱ्या असतात. अर्थात गुन्हेगार असले तरी त्यांचेही काही मानवी हक्क असतात आणि त्यांची जपणूक केली जाणे अनिवार्य मानले जाते. सबब आयोग अशा तक्रारींची दखल घेते, चौकशी करते, कोणी दोषी असेल तर त्याचा दोष दाखवून देते पण त्यापुढे काहीही करु शकत नाही. आयोगाने एखाद्या व्यक्तीला वा संघटनेला दोषी मुक्रर केले तरी स्वत: शिक्षा करु शकत नाही. ती ज्यांनी करावी हे अपेक्षित असते, तेही ती करीत नाहीत आणि त्यांनी ती का केली नाही याचा जाबदेखील आयोग विचारु शकत नाही, यासारखे आक्षेप दत्तू यांनी नोंदविले आहेत. आयोगात बसणारे सारे सदस्य निवृत्त न्यायाधीश असल्याने त्यांचा निवाडा सर्वमान्य झाला पाहिजे पण तसे होत नाही ही त्यांची खंत आहे. पण येथे मुळातच काटजू आणि दत्तू या न्यायाधीशद्वयाचा काही तरी घोटाळा झालेला दिसतो. त्यांनी धारण केलेली आणि तत्सम आणखीही काही पदे केवळ शोभेची आहेत आणि सरकारबरोबर ज्यांचे मनैक्य आणि मतैक्य जुळलेले असते त्यांच्या पुनर्वसनासाठी राखीव आहेत अशीच सर्व सरकारांची समजूत असते वा त्यांनी ती करुन घेतलेली असते. त्यामुळे पदावर राहा, भत्ते घ्या, सुखसोयींचा लाभ घ्या इतकीच माफक अपेक्षा सरकार त्यांच्याकडून ठेवीत असते. काटजू आणि दत्तू यांनी हे मर्म जाणून घेतले असते तर त्यांना झालेला मनस्ताप निश्चितच टळला असता.