शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

समुद्र-मंथन

By admin | Updated: January 31, 2017 05:01 IST

भारतीय पौराणिक कथेमध्ये ‘समुद्रमंथन’ हा एक महत्त्वाचा अध्याय आहे. दुर्वास ऋषींच्या शापामुळे इंद्र व सर्व देव बलहीन झाले. दानवराज बळीने पृथ्वी व स्वर्गावर आपले राज्य

- डॉ. भूषणकुमार उपाध्यायभारतीय पौराणिक कथेमध्ये ‘समुद्रमंथन’ हा एक महत्त्वाचा अध्याय आहे. दुर्वास ऋषींच्या शापामुळे इंद्र व सर्व देव बलहीन झाले. दानवराज बळीने पृथ्वी व स्वर्गावर आपले राज्य प्रस्थापित केले. त्यानंतर सर्व देव भगवान विष्णू यांच्याकडे गेले. त्यांनी देवांना राक्षसांच्या साहाय्याने समुद्रमंथन करून अमृत प्राशन करण्याचा सल्ला दिला. अमृत प्राशन केल्यानंतर अमरत्व प्राप्त करून देव असुरांवर विजय प्राप्त करतील, असे भगवान विष्णूंनी देवांना सांगितले. त्यासाठी मंदराचल पवर्ताचा रवि आणि नागराज वासुकीचा दोरीच्या रूपात उपयोग केला गेला. भगवान विष्णू यांनी कासवाचे रूप धारण करून मंदराचल पवर्ताला आधार दिला. समुद्रमंथनातून चौदा रत्नं बाहेर आली. सर्वात प्रथम हलाहल हे विष निघाले. ज्याला प्राशन करून भगवान शंकरांनी ब्रह्मांड वाचविले. त्यानंतर कामधेनु, कल्पवृक्ष, कौस्तुभमणी, ऐरावत हत्ती, उच्चै:श्रवा घोडा, अप्सरा व वारुणी (मद्याची देवता) इ.रत्ने बाहेर पडली. सर्वात शेवटी अमृतकलश हातात घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. अमृतासाठी देवता व राक्षसांमध्ये युद्ध झाले. भगवान विष्णू यांनी मोहिनीचे रूप धारण करून राक्षसांना भ्रमीत करून अमृत प्राशन केले. त्यामुळे सर्व देव पुन्हा शक्तिशाली झाले. समुद्रमंथनाची व्याख्या विद्वानांनी अनेक प्रकारे केली आहे. त्या सर्व व्याख्या व समुद्रमंथनाचा उद्देश लक्षात घेता असे म्हणता येईल की समुद्र मानवी मनाचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे समुद्र अनंत व अगाध आहे, त्याचप्रमाणे मानवी मनालाही समजणे कठीण आहे. जसे समुद्रात सतत असंख्य लाटा उठत असतात, तसेच मनातसुद्धा क्षणाक्षणाला असंख्य विचार उत्पन्न होत असतात. ‘देव’ चांगल्या विचारांचे प्रतीक असून, ‘राक्षस’ वाईट विचारांचे. दोन्ही प्रकारचे विचार माणसाच्या मनात सतत घोळत असतात. या मंथनाचा उद्देश अमरत्व किंवा शाश्वत आनंद प्राप्त करणे हा आहे. समुद्रमंथनात दाखविलेला मंदराचल पर्वत हा गंभीरता व एकाग्रतेचे प्रतीक असून, एकाग्रतेशिवाय मानवी मनात खोलवर आपण पोहचू शकत नाही. कासव हा संयमाचे प्रतीक आहे. तसे पाहिले तर संयमाशिवाय मनाचे मंथनही होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे नागराज वासुकीला बांधून मंदराचल पवर्ताला हलवले गेले, त्याचप्रमाणे साधक जीवन ऊर्जेच्या साहाय्याने एकाग्रतेला धरून ठेवतो. जर ऊर्जेची कमतरता असेल तर एकाग्रता राहणार नाही. अशाप्रकारे मनाच्या मंथनामध्ये साधकाला खूप वेदना होतात. हलाहल विष हे याच त्रासाचे प्रतीक आहे. हा त्रास सोसूनच साधक भगवान शंकराप्रमाणे होतो. जसजशी मन मंथनाची साधना पुढे जाते, तसतशा अनेक सिद्धी रत्नांच्या रूपात प्राप्त होतात आणि शेवटी त्याला अमृत प्राप्त होते. अर्थातच साधक आपल्या शाश्वत रूपाला प्राप्त करतो.