शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

समुद्र-मंथन

By admin | Updated: January 31, 2017 05:01 IST

भारतीय पौराणिक कथेमध्ये ‘समुद्रमंथन’ हा एक महत्त्वाचा अध्याय आहे. दुर्वास ऋषींच्या शापामुळे इंद्र व सर्व देव बलहीन झाले. दानवराज बळीने पृथ्वी व स्वर्गावर आपले राज्य

- डॉ. भूषणकुमार उपाध्यायभारतीय पौराणिक कथेमध्ये ‘समुद्रमंथन’ हा एक महत्त्वाचा अध्याय आहे. दुर्वास ऋषींच्या शापामुळे इंद्र व सर्व देव बलहीन झाले. दानवराज बळीने पृथ्वी व स्वर्गावर आपले राज्य प्रस्थापित केले. त्यानंतर सर्व देव भगवान विष्णू यांच्याकडे गेले. त्यांनी देवांना राक्षसांच्या साहाय्याने समुद्रमंथन करून अमृत प्राशन करण्याचा सल्ला दिला. अमृत प्राशन केल्यानंतर अमरत्व प्राप्त करून देव असुरांवर विजय प्राप्त करतील, असे भगवान विष्णूंनी देवांना सांगितले. त्यासाठी मंदराचल पवर्ताचा रवि आणि नागराज वासुकीचा दोरीच्या रूपात उपयोग केला गेला. भगवान विष्णू यांनी कासवाचे रूप धारण करून मंदराचल पवर्ताला आधार दिला. समुद्रमंथनातून चौदा रत्नं बाहेर आली. सर्वात प्रथम हलाहल हे विष निघाले. ज्याला प्राशन करून भगवान शंकरांनी ब्रह्मांड वाचविले. त्यानंतर कामधेनु, कल्पवृक्ष, कौस्तुभमणी, ऐरावत हत्ती, उच्चै:श्रवा घोडा, अप्सरा व वारुणी (मद्याची देवता) इ.रत्ने बाहेर पडली. सर्वात शेवटी अमृतकलश हातात घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. अमृतासाठी देवता व राक्षसांमध्ये युद्ध झाले. भगवान विष्णू यांनी मोहिनीचे रूप धारण करून राक्षसांना भ्रमीत करून अमृत प्राशन केले. त्यामुळे सर्व देव पुन्हा शक्तिशाली झाले. समुद्रमंथनाची व्याख्या विद्वानांनी अनेक प्रकारे केली आहे. त्या सर्व व्याख्या व समुद्रमंथनाचा उद्देश लक्षात घेता असे म्हणता येईल की समुद्र मानवी मनाचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे समुद्र अनंत व अगाध आहे, त्याचप्रमाणे मानवी मनालाही समजणे कठीण आहे. जसे समुद्रात सतत असंख्य लाटा उठत असतात, तसेच मनातसुद्धा क्षणाक्षणाला असंख्य विचार उत्पन्न होत असतात. ‘देव’ चांगल्या विचारांचे प्रतीक असून, ‘राक्षस’ वाईट विचारांचे. दोन्ही प्रकारचे विचार माणसाच्या मनात सतत घोळत असतात. या मंथनाचा उद्देश अमरत्व किंवा शाश्वत आनंद प्राप्त करणे हा आहे. समुद्रमंथनात दाखविलेला मंदराचल पर्वत हा गंभीरता व एकाग्रतेचे प्रतीक असून, एकाग्रतेशिवाय मानवी मनात खोलवर आपण पोहचू शकत नाही. कासव हा संयमाचे प्रतीक आहे. तसे पाहिले तर संयमाशिवाय मनाचे मंथनही होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे नागराज वासुकीला बांधून मंदराचल पवर्ताला हलवले गेले, त्याचप्रमाणे साधक जीवन ऊर्जेच्या साहाय्याने एकाग्रतेला धरून ठेवतो. जर ऊर्जेची कमतरता असेल तर एकाग्रता राहणार नाही. अशाप्रकारे मनाच्या मंथनामध्ये साधकाला खूप वेदना होतात. हलाहल विष हे याच त्रासाचे प्रतीक आहे. हा त्रास सोसूनच साधक भगवान शंकराप्रमाणे होतो. जसजशी मन मंथनाची साधना पुढे जाते, तसतशा अनेक सिद्धी रत्नांच्या रूपात प्राप्त होतात आणि शेवटी त्याला अमृत प्राप्त होते. अर्थातच साधक आपल्या शाश्वत रूपाला प्राप्त करतो.