शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

खडसेंचा अहेर...

By admin | Updated: March 31, 2017 00:10 IST

कालपरवापर्यंत स्वपक्षाची ध्येय धोरणं आणि सत्तेचे गोडवे गाणारे भाजपाचे नेते एकनाथ खडसे परवा एकदम स्वपक्षाच्या सरकारवर घसरले

कालपरवापर्यंत स्वपक्षाची ध्येय धोरणं आणि सत्तेचे गोडवे गाणारे भाजपाचे नेते एकनाथ खडसे परवा एकदम स्वपक्षाच्या सरकारवर घसरले. औद्योगिक क्षेत्रात राज्याची पीछेहाट झाली असल्याचा आरोप करत, आतापर्यंत राज्यात किती गुंतवणूक झाली, राज्यातीेल शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. रात्री आठनंतर वीज मिळते. रात्रीतून कोणी पेरणी करतं का? अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी केली. अर्थातच, त्यांचा रोख उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्यावर होता. उद्योग खात्यावरील खडसे यांचा राग समजू शकतो, पण त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील बावनकुळे यांना का टार्गेट केले? भोसरी एमआयडीतील भूखंड नातवाइकांच्या नावे खरेदी केल्याचा आरोप झाल्यानंतर खडसेंना महसूल मंत्रिपद सोडावे लागले. विरोधकांनी धारेवर धरण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या चतुराईने खडसेंवरील आरोपांच्या चौकशीसाठी न्या. झोटिंग आयोग नेमून टाकला. आणि त्याचे कार्यालय नागपुरात ठेवले. शिवाय, याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सरकार पक्ष आपली बाजू कणखरपणे मांडत नाही, असे कदाचित खडसे यांना वाटत असावे. त्यामुळे थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर शरसंधान साधण्याऐवजी खडसे यांनी बावनकुळेंवर नेम साधून ‘लेकी बोले, सुने लागे’ म्हणीचा प्रत्यय आणून दिला. खडसेंचे राजकीय पुनर्वसन होईल की नाही, हे सर्वस्वी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असेल. झोटिंग आयोगाने काहीही निष्कर्ष काढला तरी न्यायालयापुढे तो टिकेल की नाही, याची शाश्वती नाही. या गोष्टी तर पुढच्या. मुळात मोदी, शाह आणि फडणवीसांना खडसे मंत्रिमंडळात हवेत का, हा खरा प्रश्न आहे. राजकारणाला उपयुक्तावादाचा सिद्धान्त लागू पडतो. खडसेंना तो सध्यातरी लागू पडतो, असे दिसत नाही. तेव्हा त्यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेत सहभागी होऊन शेतकऱ्यांवरील आणि पर्यायाने स्वत:वरील अन्यायाला जनतेच्या दरबारात वाचा फोडावी. विरोधक स्वागत करतील आणि पक्षश्रेष्ठी दखल घेतील!