शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

खडसेंचा अहेर...

By admin | Updated: March 31, 2017 00:10 IST

कालपरवापर्यंत स्वपक्षाची ध्येय धोरणं आणि सत्तेचे गोडवे गाणारे भाजपाचे नेते एकनाथ खडसे परवा एकदम स्वपक्षाच्या सरकारवर घसरले

कालपरवापर्यंत स्वपक्षाची ध्येय धोरणं आणि सत्तेचे गोडवे गाणारे भाजपाचे नेते एकनाथ खडसे परवा एकदम स्वपक्षाच्या सरकारवर घसरले. औद्योगिक क्षेत्रात राज्याची पीछेहाट झाली असल्याचा आरोप करत, आतापर्यंत राज्यात किती गुंतवणूक झाली, राज्यातीेल शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. रात्री आठनंतर वीज मिळते. रात्रीतून कोणी पेरणी करतं का? अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी केली. अर्थातच, त्यांचा रोख उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्यावर होता. उद्योग खात्यावरील खडसे यांचा राग समजू शकतो, पण त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील बावनकुळे यांना का टार्गेट केले? भोसरी एमआयडीतील भूखंड नातवाइकांच्या नावे खरेदी केल्याचा आरोप झाल्यानंतर खडसेंना महसूल मंत्रिपद सोडावे लागले. विरोधकांनी धारेवर धरण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या चतुराईने खडसेंवरील आरोपांच्या चौकशीसाठी न्या. झोटिंग आयोग नेमून टाकला. आणि त्याचे कार्यालय नागपुरात ठेवले. शिवाय, याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सरकार पक्ष आपली बाजू कणखरपणे मांडत नाही, असे कदाचित खडसे यांना वाटत असावे. त्यामुळे थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर शरसंधान साधण्याऐवजी खडसे यांनी बावनकुळेंवर नेम साधून ‘लेकी बोले, सुने लागे’ म्हणीचा प्रत्यय आणून दिला. खडसेंचे राजकीय पुनर्वसन होईल की नाही, हे सर्वस्वी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असेल. झोटिंग आयोगाने काहीही निष्कर्ष काढला तरी न्यायालयापुढे तो टिकेल की नाही, याची शाश्वती नाही. या गोष्टी तर पुढच्या. मुळात मोदी, शाह आणि फडणवीसांना खडसे मंत्रिमंडळात हवेत का, हा खरा प्रश्न आहे. राजकारणाला उपयुक्तावादाचा सिद्धान्त लागू पडतो. खडसेंना तो सध्यातरी लागू पडतो, असे दिसत नाही. तेव्हा त्यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेत सहभागी होऊन शेतकऱ्यांवरील आणि पर्यायाने स्वत:वरील अन्यायाला जनतेच्या दरबारात वाचा फोडावी. विरोधक स्वागत करतील आणि पक्षश्रेष्ठी दखल घेतील!