शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मीमांसा पुरेशी नाही

By admin | Updated: August 31, 2015 22:43 IST

नुकत्याच जाहीर झालेल्या कृषीविषयक खानेसुमारीच्या आकडेवारीने महाराष्ट्रातील शेतीक्षेत्राचे जे चित्र उभे केले आहे, ते फारसे उत्साहवर्धक नाही पण ते तसे असणे धक्कादायक वा अनपेक्षितही नाही

नुकत्याच जाहीर झालेल्या कृषीविषयक खानेसुमारीच्या आकडेवारीने महाराष्ट्रातील शेतीक्षेत्राचे जे चित्र उभे केले आहे, ते फारसे उत्साहवर्धक नाही पण ते तसे असणे धक्कादायक वा अनपेक्षितही नाही. राज्यातील जमीनधारक शेतकरी कुटुंबांच्या संख्येत पाच वर्षांच्या कालावधीत दोन लाखांनी घट झाली असून आता ती १.३५ कोटी झाली आहे. दिवसेंदिवस शेती करणे हा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरत चालल्याने वर्षानुवर्षे केवळ शेतीवर अवलंबून असलेले लोक उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करु लागले आहेत. जमीनधारक शेतकरी कुटुंबांपैकी ९० लाख कुटुंबे अल्प वा अत्यल्प भूधारक आहेत व केवळ ४५ लाख कुटुंबांकडेच मध्यम वा मोठ्या आकाराच्या जमिनी आहेत आणि त्यांच्यावरच राज्यातील कृषी उत्पादनाची सारी भिस्त आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि रस्ते, धरणे, रेल्वे यासारखी विकासात्मक कामे यामुळे शेतजमिनीचा संकोच होत चालला आहे व ही प्रकिया अव्याहत सुरुच राहणार आहे. राज्यातील उपजाऊ जमिनीमध्येही घट होताना दिसते आहे. पाच वर्षापूर्वी दोन कोटी हेक्टर्स असलेल्या लागवडीखाली जमिनीत आता तीन लाखांनी घट झाली आहे. या आकडेवारीच्या आधारे जी काही मीमांसा केली जाते आहे, ती मात्र पुरेशी नाही. राज्यातील सिंचनाखालील जमिनीचे प्रमाण केवळ १४ टक्के असल्याने शेतकऱ्यांना शेती करण्यात स्वारस्य वाटत नाही, असे एक मीमांसा म्हणते. मुळात देशातील एकूणच शेती पावसाच्या पाण्यावर जास्ती करुन अवलंबून आहे. हा पाऊसदेखील लहरीच आहे. आज जे १४ टक्के सिंचन आहे, ते काही वर्षांपूर्वी पाच टक्क््यांच्या आतच होते. खते, आधुनिक बियाणे, कीडनाशके, दळणवळणाची साधने, वीज या साऱ्यांचा अभावच होता. तरीही लोक सुखाने शेती करीत होते. संपन्न नसतील पण आत्महत्त्याही करीत नव्हते. त्यामुळे आजच्या शेतीच्या स्थितीमागे एक महत्वाचे सामाजिक कारणदेखील आहे. एकत्र वा संयुक्त कुटुंब रचना हे देशाच्या विशेषत: ग्रामीण भागातील समाजाचे एक व्यवच्छेदक लक्षण होते. कुटुंब नियोजनाचे तत्त्वदेखील रुजले गेले नव्हते. तरीही भल्यामोठ्या एकत्र कुटुंबांची गुजराण शेतीवर होत होती. कारण त्यांच्यापाशी अखंड, सलग आणि आकारविल्हे मोठी जमीन असे. कालांतराने विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली. छोट्या कुटुंबाची संकल्पनाही स्वीकृत होत गेली. पण प्रत्येक पिढीमागे वाटण्या होत होत जमिनीचा आकार संकुचित होत गेला. अल्प वा अत्यल्प भूधारकांची संख्या ९० लाखांच्या घरात जाण्याचे हे एक महत्वाचे कारण आहे. दिवसेंदिवस शेती करणे कठीण होत चाललेले असतानाही काही बडे भांडवलदार याच व्यवसायातून संपत्ती निर्माण करीत आहेत. तुरळक प्रमाणातील सामूहिक शेतीचे प्रयोगदेखील यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळेच विद्यमान दुरवस्थाची केली जाणारी मीमांसा अपुरी वाटते.