शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
4
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
5
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
6
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
7
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
8
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
9
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
10
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली
11
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
12
आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!
13
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
14
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
15
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
16
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
17
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
18
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
19
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
20
KL Rahul Captain, IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?

विज्ञान आणि तंत्रज्ञानात रमलेला खेळीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 02:09 IST

पाकिस्तानातील झांझ या गावी २६ नोव्हेंबर, १९२६ रोजी जन्मलेले प्रा. यश पाल वयाची नव्वदी पार केल्यानंतर गेले. प्रा. यश पाल परिपूर्ण जीवन जगलेले, सर्वांना प्रिय असलेले, उमदे व्यक्तिमत्त्व. जबलपूरहून पाकिस्तानच्या फैझलाबादमधील लैलापुराच्या कॉलेजात इंटर सायन्स (आताची बारावी) करायला आले होते.

अ. पां. देशपांडेपाकिस्तानातील झांझ या गावी २६ नोव्हेंबर, १९२६ रोजी जन्मलेले प्रा. यश पाल वयाची नव्वदी पार केल्यानंतर गेले. प्रा. यश पाल परिपूर्ण जीवन जगलेले, सर्वांना प्रिय असलेले, उमदे व्यक्तिमत्त्व. जबलपूरहून पाकिस्तानच्या फैझलाबादमधील लैलापुराच्या कॉलेजात इंटर सायन्स (आताची बारावी) करायला आले होते. नंतर लाहोरच्या सरकारी कॉलेजातून त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी घेण्यासाठी प्रवेश घेतला, पण दरम्यान भारताला स्वातंत्र्य मिळाले. अनेकांना पाकिस्तान सोडून भारतात यावे लागले. यश पाल हे त्यातील एक. मग त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पुरे केले दिल्ली विद्यापीठात. १९४९ मध्ये यश पाल मुंबईला नुकत्याच सुरू झालेल्या टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च अर्थात टीआयएफआरमध्ये आले. यशपाल यांनी प्रा. पीटर्स बर्नार्ड यांच्याबरोबर विश्वकिरणांवर (कॉस्मिक किरण) काम केले. विश्वकिरण वातावरणात कसे प्रवास करतात, यावर त्यांनी केलेले काम महत्त्वपूर्ण आहे. १९५४ साली यशपाल मेसेचूसेटस येथील एमआयटीमध्ये पीएच.डी. करायला गेले. यश पाल यांना संगीताची आवड होती. त्यांनी एकदा एमआयटीमध्ये रविशंकर यांच्या सतारवादनाचा कार्यक्रमही आयोजित केला होता. पीएच.डी. करून यश पाल १९५८ मध्ये परत टीआयएफआरला आले.टीआयएफआरला यश पाल असतानाच प्रा. भा. मा. उदगावकर आणि प्रा. वि. गो. कुलकर्णी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे विज्ञान शिक्षण सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या या प्रयत्नात प्रा. यश पालही होते. ते या शालेय मुलांना शिकवत. गरीब मुलांचे शिक्षण चांगले व्हावे याची कळकळ त्यांनाही प्रा. उदगावकर व कुलकर्णी यांच्या एवढीच प्रकर्षाने होती. नंतर १९७३ मध्ये यश पाल अहमदाबादला इस्रोच्या स्पेस अ‍ॅप्लीकेशन सेंटरमध्ये दाखल झाले. यश पाल यांच्या गटाला सॅटेलाईट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपिरीमेंट (साईट) कार्यक्रमाची जबाबदारी दिली होती. याद्वारे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान व बिहार येथील चार राज्यातील ग्रामीण मुलांचे शिक्षण सॅटेलाईटद्वारा करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. यावेळी लागणारी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे कुठे बाजारात मिळत नसत. वर्ष-दोन वर्षांपूर्वी अमेरिकेने ती विकसित केली होती. त्यामुळेच ही उपकरणे शिकण्यासाठी अमेरिकेला पाठवा, अशी मागणी त्या त्या खात्यातील लोक यशपालांकडे करत. यश पाल यांचा त्याला विरोध होता. ते म्हणत, अमेरिकेने काय केले? त्यांच्या वेळी जगात ती कोणालाही माहीत नव्हते. आता ती अमेरिकनांना माहीत आहेत. मग तुम्ही स्वत: ती विकसित का करत नाही? मी नाही कुणाला अमेरिकेत पाठवणार. असे करून त्यांनी आपल्या वैज्ञानिकांना ती उपकरणे येथे भारतात विकसित करायला लावली. त्यामुळे या वैज्ञानिकांमध्ये आत्मविश्वास प्रफुल्लित केला. यश पाल सोबत काम करणाºया लोकांबरोबर चर्चा करून त्यांना सतत नवनवीन कल्पना देत. नावीन्यपूर्ण कामासाठी उद्युक्त करत. साईट कार्यक्रमाच्या वेळी ते नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ डिझाईनच्या विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान समजावून देत. अवघड विषय सोपा करून सांगण्यात त्यांची हातोटी होती. यामुळेच ते या संस्थेचे काही वर्षे अध्यक्षही झाले होते. ते मोठ्यांबरोबर शालेय विद्यार्थ्यांतही चांगले रमत. त्यांना हिंदी बोलण्याची विलक्षण हौस होती. पॅशन म्हणा. त्यामुळे ते इंग्रजीत बोलत असताना कधी हिंदीत शिरतील हे त्यांनाही समजत नसेल, इतकी ती भाषा त्यांच्या रक्तात भिनली होती.१९८१ पासून दोन वर्षे प्रा. यश पाल युनेस्कोमध्ये गेले व यूएन कॉन्फरन्स आॅन आऊटर स्पेससाठी प्रमुख बनले. नंतर ते नियोजन आयोगात प्रमुख सल्लागार होते. पुढे ते भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या खात्याचे सेक्रेटरी झाले. तेथून ते बाहेर पडून विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष झाले. या काळात त्यांनी भारतभर चार आंतरविद्यापीठीय केंद्रे स्थापन केली. डॉ. जयंत नारळीकरांची आयुका ही त्यातलीच एक संस्था. त्याच वेळी विज्ञान-तंत्रज्ञान खात्याने भारत जन विज्ञान जाथा या नावाचा एक भारतव्यापी कार्यक्रम आखला होता व त्यांना त्याचे अध्यक्ष केले होते. या विज्ञान प्रसाराच्या कार्यक्रमात ते पुरते रमले. त्यांना इतक्या विषयात रस होता की ती यादी संपायची नाही. भौतिक शास्त्रज्ञ स्ट्रिंग थिअरीबद्दल बोलत असो, गाववाले लोक दुष्काळ, पूर, वाया गेलेले पीक, बालविवाहाचा विषय असो की सतीची चाल असो किंवा एखाद्या नाटकाची चर्चा, शालेय विद्यार्थी त्यांच्या एखाद्या प्रकल्पाबद्दल बोलत असू देत, समाजविज्ञान शास्त्रज्ञ एखाद्या सर्वेक्षणाची प्रश्नावली तयार करत असू देत की आणखी काही, यश पाल त्या त्या लोकांना काही तरी न सुचलेले सांगून त्यांच्यात एक चैतन्य निर्माण करत असत. यश पाल यांची एक समिती मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी होती. दूरदर्शनच्या टर्निंग पॉर्इंटमधील अथवा खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळची त्यांची कॉमेंट्री कोण विसरेल? ते गेले. पण त्यांच्याबद्दलच्या अशा अनंत आठवणी मनामनात आहेत. त्यामुळेच कदाचित विज्ञान आणि तंत्रज्ञानात इतका रमलेला खेळीया परत होणे नाही.(लेखक मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह आणि प्रसिद्ध विज्ञान प्रसारक आहेत.)