शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

मैदाने वाचवा; खेळ जगवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 04:27 IST

टॅब, मोबाइल यांनी खेळाची हौस भागविता येईल, परंतु तंदुरुस्त शरीरासाठी, मनस्थिती आणि युवकांच्या समृद्धीसाठी मैदानांवरील अतिक्रमणे रोखणे हिताचे आहे.

- भास्कर सावंतटॅब, मोबाइल यांनी खेळाची हौस भागविता येईल, परंतु तंदुरुस्त शरीरासाठी, मनस्थिती आणि युवकांच्या समृद्धीसाठी मैदानांवरील अतिक्रमणे रोखणे हिताचे आहे. आधुनिकीकरणाच्या धुक्यात हरवणारी मैदाने वाचवायला हवीत. जगात सर्वात कमी मोकळी जागा असणारे शहर म्हणून मुंबईकडे पाहिले जाते हे खरे असले, तरी असलेली मैदाने टिकविणे ही काळाची गरज आहे.आपला देश स्वतंत्र होऊन ७२ वर्षे झाली, तरी खेळ हा विषय भारतात कोणाच्याच अजेंड्यावर नाही. तरीही आम्ही ऑलिम्पिक विजयाची स्वप्ने बघतो. पदकांच्या दुष्काळी अंधारात मग एखाद दुसऱ्या पदकांच्या कमाईने आम्ही सुखावतो. या साºयात माझा महाराष्ट्र कुठे आहे? त्याची दखल घेत आम्ही आमच्या बालयुवकांवर मेहनत घेत ऑलिम्पिकच्या मार्गावर त्यांना आणणार आहोत का? हा शोध घेतला तर त्यातही क्रीडारत्न सापडणे कठीण नाही.महाराष्ट्रात सुमारे दीड लाख शैक्षणिक संस्था आहेत, यातील किती संस्थांकडे स्वत:ची मैदाने आहेत? यातून किमान शेकडाभर दर्जेदार खेळाडू घडविणे अशक्यप्राय नाही, त्यासाठी संस्थाचालक, संघटना आणि सरकारची इच्छाशक्ती हवी. मैदान ही आॅलिम्पिकमध्ये मिळणाºया यशाची पहिली पायरी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात असलेली मैदाने २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत खेळाने, सांस्कृतिक उपक्रमाने बहरलेली होती़ १९८२ च्या गिरणी संपानंतर परिस्थितीत बदल होत गेला़ विविध वाहिन्यांच्या आगमनाने मैदानावरील गर्दी ओसरायला लागली़ शालेय अभ्यास पद्धतीच्या चढाओढीत शिकवण्यांचे फॅड वाढत गेले़ मार्कांच्या चढाओढीत बालकांचे पाय मैदानापासून दुरावायला लागले़ या सवयी मोडल्याने खेळासाठी तरुणाईची संख्याही घटत गेली़ शाळेतही शारीरिक शिक्षणाच्या तासिका घटत गेल्याने मैदानी खेळांची गुणवत्ता घटत चालली़ शासनाच्या पटलावर पाउणशेच्या जवळपास खेळांची संख्या असली, तरी समूहाने खेळल्या जाणाºया मैदानी खेळांची संख्या किती? कालांतराने आट्यापाट्या लोप पावला, मातीतील कुस्ती, चपळतेचे दर्शन घडविणारा खो-खो घटू लागला, यामागे उपयुक्त मैदानांचा अभाव हेही एक कारण आहे़काँक्रिटच्या जंगलात हरवत चाललेले शहर उपनगरातील शेतजमिनी नष्ट होऊन उभे राहिलेले हाउसिंग कॉम्प्लेक्स, टोलेजंग इमारती यात मैदानांचा बळी जाऊ लागला़ शहरात किमान मोकळा श्वास घेता यावा, या दृष्टीने मैदान बचाव चळवळ उभी राहिली़ त्यालाही आता ४५ वर्षे झाली़ मैदान बचाव लढ्याचा सकारात्मक परिणाम झाला. कुर्ला पश्चिमेकडील गांधी मैदान, माहीमच्या मोरी रोड परिसरातील दत्त मंदिर, करी रोडचे गोदरेज, व्रिकोळीचे राजेसंभाजी, घाटकोपरचे माणिकलाल, नेहरूनगरचे छत्रपती शिवाजी महाराज, माटुंग्याचे दडकर ही खेळाने बहरलेली मैदाने अतिक्रमणापासून वाचविली गेली. काही संस्थांनी जागरूक होत शाळांची मैदाने खेळती ठेवली. मैदान हा विषय एवढा विस्तारित आहे, याची कल्पना जनमानसात नव्हती़ मात्र, जागृती होऊन या विषयावर लोक आता किमान चर्चा करू लागले आहेत़ऐतिहासिक परंपरा असलेले आझाद मैदान, प्रभादेवीचे नर्दुल्ला टँक मैदान, मेट्रो रेल्वेच्या उभारणीत नष्ट होतेय़ मुंबईसारख्या शहरात पार्र्किंगसाठी मैदानांचाही बळी देण्याचे प्रकार ऐरणीवर येत आहेत. किमान जनता या विषयावर दबाव, आमिषे याला न जुमानता विरोध करू लागली आहे.(लेखक मैदान बचाव समितीचे अध्यक्ष आहेत.)